शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पर्यटकांच्या गर्दीने भंडारदरा परिसर ओव्हर-फ्लो! नाताळनिमित्त सुट्यांची पर्वणी; दोन हजार कापडी तंबू सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 20:23 IST

नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांमधे जलाशयाच्या भोवती पर्यटकांच्या निवासासाठी जवळपास दोन हजार कापडी ‘तंबू’सज्ज झाले असून, नाताळनिमित्त ‘भंडारदरा-रंधा-घाटघर-रतनगड-साम्रद’ परिसरात पर्यटकांचा फुलोरा फुलला आहे.

हेमंत आवारीअकोले : नववर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रिंगरोडवरील आदिवासी पाड्यांमधे जलाशयाच्या भोवती पर्यटकांच्या निवासासाठी जवळपास दोन हजार कापडी ‘तंबू’सज्ज झाले असून, नाताळनिमित्त ‘भंडारदरा-रंधा-घाटघर-रतनगड-साम्रद’ परिसरात पर्यटकांचा फुलोरा फुलला आहे.‘तंबू’ हे यावर्षीचे खास नवे आकर्षण आहे. भंडारदरा जलाशयाभोवती ४५ किलोमीटरचा रिंगरोड असून, या परिसरात धरणाच्या काठावर आदिवासी युवकांनी पर्यटकांच्या निवासासाठी कापडी तंबू उभारले आहेत. भंडारदार शेंडी येथील पर्यटन विकास महामंडळाचे लेक व्ह्यू, आनंदवन, यश, अमीत, अमृत व्हिला आदींसह सर्व रिसोर्ट, हॉटेल व शासकीय विश्रामगृहे गर्दीने ओसंडल्याने पर्यटकांसाठी स्थानिक युवकांनी वन्यजीव व आदिवासी विभागाच्या मदतीने मिळालेल्या कापडी तंबंूच्या साहाय्याने तात्पुरती निवास व्यवस्था केली आहे.

मुरशेत, पांजरे-उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल या भागांतील शेकडो आदिवासी तरुणांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे येथील शेकडो तरुणाईला रोजगार उपलब्ध झाला आहे. साधारणपणे प्रतिव्यक्ती ४५० ते १२०० रुपयांपर्यंत एक दिवसाचा खर्च पर्यटकांकडून घेतला जातो. चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण, शेकोटी, बोटफेरी अशा सुविधा दिल्या जातात. जलाशयानजीक हे तंबू लावलेले असून, पाण्याच्या निळाईत शेकोटीची धग निवळताना दिसते. परिसरात आशिया खंडातील दोन नंबरची गूढरम्य सांधन दरी, शिखर स्वामिनी कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड, आज्या पर्वत, आलंग-मलंग-कुलंग गड, घनचक्कर, करंडा, खुंटा, कात्राईची खिंड आदी गड, डोंगर असून, येथे सलग सुट्यांमुळे पर्यटक व गिर्यारोहकांची मांदियाळी आहे. मुंबई-नाशिक भागातील पर्यटक तुलनेने जास्त आहे. एक दिवसाच्या कौटुंबिक सहलीपण मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावताना दिसत असून, नौकाविहराचा आनंद घेतात.भंडारदरा धरणाच्या ‘स्पिल वे’सांडवा गेट जवळ पाण्याच्या कडेला पर्यटकांना कॅम्पिंगचा आनंद मिळावा म्हणून जवळपास २५० तंबू लावण्यात आले आहेत. येथे सतत वाहतुकीची कोंडी अनुभवास येत असून, पर्यटक व वाहनांच्या गर्दीने हा परिसर फुलला आहे.

कळसूबाईगडावर अस्वच्छता आहे. येथील छोटे व्यावसायिकच सिगारेट, दारू पाहिजे का? असे विचारतात, मग स्वच्छाता कशी राहणार? गडाच्या पायथ्याला गाडी पार्क करतो. तेथेही गडावर यांना भेटा ते तुमची सर्व सोय करतील? असे सांगितले जाते. पोलिसांनी व वन विभागाने याची दखल घ्यावी.-सुहास कदम, चेंबूर, गिर्यारोहक.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले