शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आजपासून मुळातून रब्बीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:42 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यतून आवर्तन सोडण्याला मुहूर्त मिळाला आहे.

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यतून आवर्तन सोडण्याला मुहूर्त मिळाला आहे. मुंबईत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री विजय शिवथरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत  आज सकाळी ६ वाजता उजव्या कालव्यातून रब्बीसाठी आवर्तन सोडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धरणात उजव्या कालव्यासाठी ५५०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. दरम्यान, बैठकीला आमदार शिवाजी कर्डिले व अशासकीय ६ सदस्य गैरहजर होते. कालवा पाणी वाटप सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत मुळा धरणाच्या पाण्याचा आढावा घेण्यात आला.  २६००० दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात उपयुक्त पाणीसाठा ११००० दलघफू उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. उजव्या कालव्याखाली रब्बीचे २५००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे़ मुळा उजव्या कालव्याचे एकच आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे यावेळी जलसंपदा मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले़ मुळा उजवा कालवा सल्लागार समितीच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, सदस्य शिवाजी भिसे, सुभाष साठे, बापूसाहेब पाटेकर हे उपस्थित होते़ आमदार शिवाजी कर्डिले बैठकीला अनुपस्थित होते़ पाणी वापर संस्थेचे ९ सदस्य आहेत.मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत ६ अशासकीय सदस्यांनी दांडी मारली़ जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, उपअभियंता ए़ बी़ खेडकर, धरण अभियंता अण्णासाहेब आंधळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी