शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

तंबाखूजन्य पदार्थांमुळे ४० टक्के रुग्णांना कॅन्सर; सतीश सोनवणे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:36 IST

भारतात दरवर्षी निष्पन्न होणा-या एकूण कॅन्सर रुग्णांपैकी ४० टक्के रुग्णांना केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होत आहे. तोंडाचे व घश्याचा कॅन्सर अगदी सुरुवातीच्या स्तरावरच लक्षात येऊ शकतो़. अशावेळी वेळेत निदान करून उपचार केले तर या व्याधीचा पुढील धोका टळू शकतो, असे मत येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे यांनी मुख कर्करोग दिनानिमित्त ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अहमदनगर : कर्करोगाची अनेक कारणे आहेत. मात्र तंबाखूजन्य पदार्थ आणि दारु यामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. तोंडात पांढरा चट्टा  किंवा लाल चट्टा होणे किंवा तोंडाची उघडिप कमी होणे (सबम्यूकस फायब्रोसिस) आदी लक्षणे दिसत असल्यास भविष्यात कॅन्सरमध्ये रुपांतरीत होण्याचा धोका असतो. अशावेळी कॅन्सरतज्ज्ञांचा नियमित सल्ला घेणे आवश्यक आहे.

वेळेवर या व्याधींवर शस्त्रक्रिया झाल्यास कॅन्सरचा धोका ब-याच अंशी कमी होऊ शकतो. तोंडातील साधारण जखमा वेदनादायक असतात. परंतू ५ ते ७ दिवसांत भरतात. परंतु तोंडातील जखम २ आठवड्यांपेक्षा अधिक वेळेत भरत नसेल व अल्प वेदनादायी असेल तर वेळेवर तज्ज्ञांचा सल्ल घेता पाहिजे. दुर्लक्ष झाल्यास तोंडातील कॅन्सरचा शिरकाव मानेतील लसिकाग्रंथीमध्ये होऊन मानेतही गाठ हळूवारपणे वाढत जाते. ही गाठ सुध्दा दुखत नसल्याने पुन्हा दुर्लक्ष संभवू शकतो. 

कॅन्सरतज्ज्ञांच्या तपासणीत गाठ प्राथमिक स्तराची असेल तर स्कॅनची गरज नाही. परंतु वाढीव स्तरावर सिटी स्कॅन किंवा एमआरआय करण्याची गरज असते. कॅन्सर फुफ्फुसात पसरण्याचा धोका असल्याने सोबत फुफ्फुसात सिटी स्कॅनही केला जातो. स्तर जाणून घेण्यासाठी पेट स्कॅन करण्याची गरज नाही.

कॅन्सर मानेतील लसिकाग्रंथी मध्ये पसरलेला असतो आणि त्याचा उगम कळून येत नाही. तेव्हा पेट स्कॅन करणे गरजेचे असते़ प्रत्यक्षात कॅन्सर होऊच नये, यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळी घेणे गरजेचे आहे. व्यसमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे असे डॉ़. सोनवणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcancerकर्करोगdoctorडॉक्टरinterviewमुलाखत