शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

तंबाखूजन्य पदार्थांमुळे ४० टक्के रुग्णांना कॅन्सर; सतीश सोनवणे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:36 IST

भारतात दरवर्षी निष्पन्न होणा-या एकूण कॅन्सर रुग्णांपैकी ४० टक्के रुग्णांना केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होत आहे. तोंडाचे व घश्याचा कॅन्सर अगदी सुरुवातीच्या स्तरावरच लक्षात येऊ शकतो़. अशावेळी वेळेत निदान करून उपचार केले तर या व्याधीचा पुढील धोका टळू शकतो, असे मत येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे यांनी मुख कर्करोग दिनानिमित्त ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अहमदनगर : कर्करोगाची अनेक कारणे आहेत. मात्र तंबाखूजन्य पदार्थ आणि दारु यामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. तोंडात पांढरा चट्टा  किंवा लाल चट्टा होणे किंवा तोंडाची उघडिप कमी होणे (सबम्यूकस फायब्रोसिस) आदी लक्षणे दिसत असल्यास भविष्यात कॅन्सरमध्ये रुपांतरीत होण्याचा धोका असतो. अशावेळी कॅन्सरतज्ज्ञांचा नियमित सल्ला घेणे आवश्यक आहे.

वेळेवर या व्याधींवर शस्त्रक्रिया झाल्यास कॅन्सरचा धोका ब-याच अंशी कमी होऊ शकतो. तोंडातील साधारण जखमा वेदनादायक असतात. परंतू ५ ते ७ दिवसांत भरतात. परंतु तोंडातील जखम २ आठवड्यांपेक्षा अधिक वेळेत भरत नसेल व अल्प वेदनादायी असेल तर वेळेवर तज्ज्ञांचा सल्ल घेता पाहिजे. दुर्लक्ष झाल्यास तोंडातील कॅन्सरचा शिरकाव मानेतील लसिकाग्रंथीमध्ये होऊन मानेतही गाठ हळूवारपणे वाढत जाते. ही गाठ सुध्दा दुखत नसल्याने पुन्हा दुर्लक्ष संभवू शकतो. 

कॅन्सरतज्ज्ञांच्या तपासणीत गाठ प्राथमिक स्तराची असेल तर स्कॅनची गरज नाही. परंतु वाढीव स्तरावर सिटी स्कॅन किंवा एमआरआय करण्याची गरज असते. कॅन्सर फुफ्फुसात पसरण्याचा धोका असल्याने सोबत फुफ्फुसात सिटी स्कॅनही केला जातो. स्तर जाणून घेण्यासाठी पेट स्कॅन करण्याची गरज नाही.

कॅन्सर मानेतील लसिकाग्रंथी मध्ये पसरलेला असतो आणि त्याचा उगम कळून येत नाही. तेव्हा पेट स्कॅन करणे गरजेचे असते़ प्रत्यक्षात कॅन्सर होऊच नये, यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळी घेणे गरजेचे आहे. व्यसमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे असे डॉ़. सोनवणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcancerकर्करोगdoctorडॉक्टरinterviewमुलाखत