शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

केंद्र सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST

श्रीरामपूर : केंद्रातील भाजप सरकार हे केवळ नफेखोर आणि भांडवलदारांसाठी काम करत असून त्यांना चले जाव म्हणण्याची वेळ आल्याचा ...

श्रीरामपूर : केंद्रातील भाजप सरकार हे केवळ नफेखोर आणि भांडवलदारांसाठी काम करत असून त्यांना चले जाव म्हणण्याची वेळ आल्याचा इशारा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदच्या हाकेला काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. त्यासाठी येथील प्रशासकीय इमारतीसमोर आयोजित धरणे आंदोलनप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी आ. लहू कानडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, अंकुश कानडे, ज्ञानदेव वाफारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शहराध्यक्ष संजय छल्लारे, इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, पं. स. सदस्य डॉ.वंदना मुरकुटे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी काँग्रेसचे मोजके पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, केंद्राने केलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांमुळे भांडवलदारांना नफेखोरीसाठी मोकळे रान मिळणार आहे. त्यामुळे शहरातील जनतेला जादा पैसे देऊन शेतमाल खरेदी करावा लागेल. पंजाब राज्यात धान्याच्या साठेबाजीसाठी मोठ-मोठी गोदामे बांधण्यात आली आहेत. मात्र, या कायद्यांमुळे शेतकऱ्यांवरील किमान आधारभूत दराचे छत हिरावून घेतले जाणार आहे.

या कायद्यांमुळे जर खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले तर प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागेल. न्यायालयात जाण्याचा शेतकऱ्यांचा अधिकार नष्ट करून त्यांचे संरक्षण काढण्यात आले आहे. आहे. बाजार समित्याही संपविण्याचा त्यामागे डाव आहे.

दिल्लीतील आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गामध्ये खिळे ठोकण्यापर्यंत सरकारची मजल गेली. या ऐतिहासिक आंदोलनाची जगभर दखल घेतली जात असताना पंतप्रधान मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाहीत, अशी टीकाही थोरात यांनी केली.

आ. कानडे यांनी काँग्रेस पक्षाने मिळवून दिलेले स्वातंत्र्य, समता व बंधुता भाजपने संपुष्टात आणल्याचा आरोप केला. केंद्र सरकार हे भांडवलदारांचे हस्तक व कष्टकऱ्यांचे शत्रू आहे. काँग्रेसने उभारलेले सरकारी उद्योग विकण्याचा त्यांनी घाट घातला आहे, असे ते म्हणाले.

यावेळी नगरसेवक मनोज लबडे, मुन्ना पठाण, राजेंद्र पाऊलबुद्धे, बाबासाहेब कोळसे, समीन बागवान, अभिजित लिप्टे आदी उपस्थित होते.

------------

ते आंदोलक कुठे आहेत?

केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये झालेल्या पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन करणारी मंडळी आता कुठे आहे? असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला. पेट्रोल शंभर रुपये तर सिलिंडर ९०० रुपयांवर गेला तरीही ती मंडळी आता शांत का? असा टोला थोरात यांनी लगावला.

------

२६संगमनेर आंदोलन

...