शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

केंद्र सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST

श्रीरामपूर : केंद्रातील भाजप सरकार हे केवळ नफेखोर आणि भांडवलदारांसाठी काम करत असून त्यांना चले जाव म्हणण्याची वेळ आल्याचा ...

श्रीरामपूर : केंद्रातील भाजप सरकार हे केवळ नफेखोर आणि भांडवलदारांसाठी काम करत असून त्यांना चले जाव म्हणण्याची वेळ आल्याचा इशारा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदच्या हाकेला काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. त्यासाठी येथील प्रशासकीय इमारतीसमोर आयोजित धरणे आंदोलनप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी आ. लहू कानडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, अंकुश कानडे, ज्ञानदेव वाफारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शहराध्यक्ष संजय छल्लारे, इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, पं. स. सदस्य डॉ.वंदना मुरकुटे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी काँग्रेसचे मोजके पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, केंद्राने केलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांमुळे भांडवलदारांना नफेखोरीसाठी मोकळे रान मिळणार आहे. त्यामुळे शहरातील जनतेला जादा पैसे देऊन शेतमाल खरेदी करावा लागेल. पंजाब राज्यात धान्याच्या साठेबाजीसाठी मोठ-मोठी गोदामे बांधण्यात आली आहेत. मात्र, या कायद्यांमुळे शेतकऱ्यांवरील किमान आधारभूत दराचे छत हिरावून घेतले जाणार आहे.

या कायद्यांमुळे जर खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले तर प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागेल. न्यायालयात जाण्याचा शेतकऱ्यांचा अधिकार नष्ट करून त्यांचे संरक्षण काढण्यात आले आहे. आहे. बाजार समित्याही संपविण्याचा त्यामागे डाव आहे.

दिल्लीतील आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गामध्ये खिळे ठोकण्यापर्यंत सरकारची मजल गेली. या ऐतिहासिक आंदोलनाची जगभर दखल घेतली जात असताना पंतप्रधान मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाहीत, अशी टीकाही थोरात यांनी केली.

आ. कानडे यांनी काँग्रेस पक्षाने मिळवून दिलेले स्वातंत्र्य, समता व बंधुता भाजपने संपुष्टात आणल्याचा आरोप केला. केंद्र सरकार हे भांडवलदारांचे हस्तक व कष्टकऱ्यांचे शत्रू आहे. काँग्रेसने उभारलेले सरकारी उद्योग विकण्याचा त्यांनी घाट घातला आहे, असे ते म्हणाले.

यावेळी नगरसेवक मनोज लबडे, मुन्ना पठाण, राजेंद्र पाऊलबुद्धे, बाबासाहेब कोळसे, समीन बागवान, अभिजित लिप्टे आदी उपस्थित होते.

------------

ते आंदोलक कुठे आहेत?

केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये झालेल्या पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन करणारी मंडळी आता कुठे आहे? असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला. पेट्रोल शंभर रुपये तर सिलिंडर ९०० रुपयांवर गेला तरीही ती मंडळी आता शांत का? असा टोला थोरात यांनी लगावला.

------

२६संगमनेर आंदोलन

...