शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

केंद्र सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST

श्रीरामपूर : केंद्रातील भाजप सरकार हे केवळ नफेखोर आणि भांडवलदारांसाठी काम करत असून त्यांना चले जाव म्हणण्याची वेळ आल्याचा ...

श्रीरामपूर : केंद्रातील भाजप सरकार हे केवळ नफेखोर आणि भांडवलदारांसाठी काम करत असून त्यांना चले जाव म्हणण्याची वेळ आल्याचा इशारा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदच्या हाकेला काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. त्यासाठी येथील प्रशासकीय इमारतीसमोर आयोजित धरणे आंदोलनप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी आ. लहू कानडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, अंकुश कानडे, ज्ञानदेव वाफारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शहराध्यक्ष संजय छल्लारे, इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, पं. स. सदस्य डॉ.वंदना मुरकुटे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी काँग्रेसचे मोजके पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, केंद्राने केलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांमुळे भांडवलदारांना नफेखोरीसाठी मोकळे रान मिळणार आहे. त्यामुळे शहरातील जनतेला जादा पैसे देऊन शेतमाल खरेदी करावा लागेल. पंजाब राज्यात धान्याच्या साठेबाजीसाठी मोठ-मोठी गोदामे बांधण्यात आली आहेत. मात्र, या कायद्यांमुळे शेतकऱ्यांवरील किमान आधारभूत दराचे छत हिरावून घेतले जाणार आहे.

या कायद्यांमुळे जर खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले तर प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागेल. न्यायालयात जाण्याचा शेतकऱ्यांचा अधिकार नष्ट करून त्यांचे संरक्षण काढण्यात आले आहे. आहे. बाजार समित्याही संपविण्याचा त्यामागे डाव आहे.

दिल्लीतील आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गामध्ये खिळे ठोकण्यापर्यंत सरकारची मजल गेली. या ऐतिहासिक आंदोलनाची जगभर दखल घेतली जात असताना पंतप्रधान मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाहीत, अशी टीकाही थोरात यांनी केली.

आ. कानडे यांनी काँग्रेस पक्षाने मिळवून दिलेले स्वातंत्र्य, समता व बंधुता भाजपने संपुष्टात आणल्याचा आरोप केला. केंद्र सरकार हे भांडवलदारांचे हस्तक व कष्टकऱ्यांचे शत्रू आहे. काँग्रेसने उभारलेले सरकारी उद्योग विकण्याचा त्यांनी घाट घातला आहे, असे ते म्हणाले.

यावेळी नगरसेवक मनोज लबडे, मुन्ना पठाण, राजेंद्र पाऊलबुद्धे, बाबासाहेब कोळसे, समीन बागवान, अभिजित लिप्टे आदी उपस्थित होते.

------------

ते आंदोलक कुठे आहेत?

केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये झालेल्या पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन करणारी मंडळी आता कुठे आहे? असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला. पेट्रोल शंभर रुपये तर सिलिंडर ९०० रुपयांवर गेला तरीही ती मंडळी आता शांत का? असा टोला थोरात यांनी लगावला.

------

२६संगमनेर आंदोलन

...