शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

पाणी सोडण्याच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ : जायकवाडीला जिल्ह्यातून जाणार ५.७५ टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 12:51 IST

नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला दिलेले आहेत.

अहमदनगर : नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला दिलेले आहेत. परंतु पाणी सोडण्याच्या पूर्वतयारीसाठी तीन ते चार दिवसांचा वेळ लागणार असल्याने त्याबाबत जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील धरणांतून ५.७५ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी जाणार आहे.नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात एकूण ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश मंगळवारीगोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला बजावला. त्यानंतर जिल्ह्यातून राजकीय, प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या.तातडीने पाणी सोडण्याचा आदेश असला तरी पाणी सोडण्याच्या पूर्वतयारीला व पाणी सोडण्याच्या नियोजनाला तीन ते चार दिवसांचा वेळ लागणार आहे. प्रवरा व मुळा नदीतून पाणी जाणार असून, यादरम्यान असलेल्या बंधाऱ्यांच्या फळ्या काढणे, पाणी सोडल्यानंतर अवैध उपसा होऊ नये म्हणून नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करणे, पाणीप्रश्नावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करणे, पाणीचोरी होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाचे पथक नेमणे आदी उपाययोजनांसाठी प्रशासन तयारी करत आहे.जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व आढळा या तिन्ही धरणांतून ३.८५ टीएमसी पाणी प्रवरा नदीतून जायकवाडीसाठी जाणार आहे. निळवंडे ते जायकवाडी हे अंतर १७२ किलोमीटर असून त्यात १५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. याशिवाय मुळा धरणातून १.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून मुळा ते जायकवाडी हे अंतर ६५ किलोमीटर आहे. यादरम्यान, ७ कोल्हापूर बंधारे आहेत. बंधाºयांच्या फळ्या काढण्यापासून सर्व तयारीसाठी पाटबंधारे विभाग नियोजन करत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पाणी सोडण्याबाबत निर्णय होणार आहे.पाणी सोडण्याचे आदेश आलेले आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाला तयारी करण्यासाठी वेळ लागेल. जिल्ह्यासाठी किती पाणी आरक्षित ठेवायचे, पाणी सोडण्यास कोणाचा विरोध आहे का? या सर्व बाबी विचारात घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय