शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन तिखीराम निघाला उत्तरप्रदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 15:30 IST

गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व वाहने बंद आहेत. परराज्यातील मजूर अनेक ठिकाणी अडकून पडले असल्याने आपले घर जवळ करण्यासाठी तिखीराम आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन ओतूर ते उत्तर प्रदेश हा हजार मैल प्रवास करत आहे.   

मच्छिंद्र देशमुख

कोतूळ - गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व वाहने बंद आहेत. परराज्यातील मजूर अनेक ठिकाणी अडकून पडले असल्याने आपले घर जवळ करण्यासाठी तिखीराम आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन ओतूर ते उत्तर प्रदेश हा हजार मैल प्रवास करत आहे. 

   उत्तर प्रदेशातील बाडवाणी जिल्ह्यातील धावडी या गावातील एकाच कुटुंबातील पंधरा शेतमजूर पुणे जिल्ह्यात ओतूर या ठिकाणी कांदे काढण्यासाठी आले होते. गेल्या वीस ते पंचवीस दिवसांत लॉकडाऊनमुळे मजुरी बंद झाली. जवळचे पैसेही संपले. दहा ते पंधरा दिवसांत अनेक सेवाभावी लोकांनी अन्न पाण्याची सोय केली. मात्र आता आपले गाव गाठायचे या इराद्याने तिखीराम, त्याची पत्नी, आई ,भाऊ व नातेवाईक असे पंधरा लोक ओतूर ते उत्तरप्रदेशात पायी निघाले. 

दोन दिवसांपूर्वी कोतूळात तिखीराम रडत पायी चालताना दिसला. चौकशी केली असता त्याने आपबीती सांगितली.  तिखीरामचे कुटुंब पायी चार मैल पुढे गेले होते. मात्र लहान बाळ झोपलेले असल्याने त्याला कुटुंबासोबत पटपट चालता येत नव्हते. सकाळी सहा ते बारा या सहा तासात ते ओतूर ते कोतूळ हे चाळीस मैल अंतर पायी आले होते. कहाणी सांगितल्यावर त्याला फळे, बिस्कीटे दिली. संगमनेरपर्यंत अडचण येणार नाही, अशी व्यवस्था केली.  आम्ही दहा ते बारा दिवसांत घरी पोहचू असे तिखीराम सांगत होता.  

 

मला व माझ्या कुटुंबाला इथपर्यंत येईपर्यंत अनेकांनी जेवण, चहा तर कुणी फळे बांधून दिले. जोपर्यंत महाराष्ट्र आहे, तो पर्यंत आम्हाला पोटाची भिती नाही. मात्र आम्हाला आमच्या गावात घेतात की नाही हा प्रश्न आहे. – तिखिराम

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले