शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन तिखीराम निघाला उत्तरप्रदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 15:30 IST

गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व वाहने बंद आहेत. परराज्यातील मजूर अनेक ठिकाणी अडकून पडले असल्याने आपले घर जवळ करण्यासाठी तिखीराम आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन ओतूर ते उत्तर प्रदेश हा हजार मैल प्रवास करत आहे.   

मच्छिंद्र देशमुख

कोतूळ - गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व वाहने बंद आहेत. परराज्यातील मजूर अनेक ठिकाणी अडकून पडले असल्याने आपले घर जवळ करण्यासाठी तिखीराम आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन ओतूर ते उत्तर प्रदेश हा हजार मैल प्रवास करत आहे. 

   उत्तर प्रदेशातील बाडवाणी जिल्ह्यातील धावडी या गावातील एकाच कुटुंबातील पंधरा शेतमजूर पुणे जिल्ह्यात ओतूर या ठिकाणी कांदे काढण्यासाठी आले होते. गेल्या वीस ते पंचवीस दिवसांत लॉकडाऊनमुळे मजुरी बंद झाली. जवळचे पैसेही संपले. दहा ते पंधरा दिवसांत अनेक सेवाभावी लोकांनी अन्न पाण्याची सोय केली. मात्र आता आपले गाव गाठायचे या इराद्याने तिखीराम, त्याची पत्नी, आई ,भाऊ व नातेवाईक असे पंधरा लोक ओतूर ते उत्तरप्रदेशात पायी निघाले. 

दोन दिवसांपूर्वी कोतूळात तिखीराम रडत पायी चालताना दिसला. चौकशी केली असता त्याने आपबीती सांगितली.  तिखीरामचे कुटुंब पायी चार मैल पुढे गेले होते. मात्र लहान बाळ झोपलेले असल्याने त्याला कुटुंबासोबत पटपट चालता येत नव्हते. सकाळी सहा ते बारा या सहा तासात ते ओतूर ते कोतूळ हे चाळीस मैल अंतर पायी आले होते. कहाणी सांगितल्यावर त्याला फळे, बिस्कीटे दिली. संगमनेरपर्यंत अडचण येणार नाही, अशी व्यवस्था केली.  आम्ही दहा ते बारा दिवसांत घरी पोहचू असे तिखीराम सांगत होता.  

 

मला व माझ्या कुटुंबाला इथपर्यंत येईपर्यंत अनेकांनी जेवण, चहा तर कुणी फळे बांधून दिले. जोपर्यंत महाराष्ट्र आहे, तो पर्यंत आम्हाला पोटाची भिती नाही. मात्र आम्हाला आमच्या गावात घेतात की नाही हा प्रश्न आहे. – तिखिराम

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले