शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

दारु दुकाने उघडण्याच्या निर्णयावर टीकास्त्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 20:29 IST

अहमदनगर:  नागपूर आणि औरंगाबादमध्ये अधिकाºयांची स्वत:हून दारुची दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला. अशीच भूमिका अहमदनगरच्या जिल्हाधिकाºयांनी का घेतली नाही? दारु ही एवढी जीवनावश्यक बाब आहे का? अशी टीका नगर जिल्ह्यातून सुरु झाली आहे. 

अहमदनगर:  नागपूर आणि औरंगाबादमध्ये अधिकाºयांची स्वत:हून दारुची दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला. अशीच भूमिका अहमदनगरच्या जिल्हाधिकाºयांनी का घेतली नाही? दारु ही एवढी जीवनावश्यक बाब आहे का? अशी टीका नगर जिल्ह्यातून सुरु झाली आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकाºयांनी मंगळवारपासून दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. दारुबंदी आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी ‘लोकमत’शी बोलतना म्हणाले, ‘नगर जिल्हा आॅरेंजमधून रेडझोनमध्ये न्यायला दारु दुकानांतील गर्दी कारणीभूत ठरेल. प्रशासनाला हा निर्णय घेण्याची एवढी घाई का झाली आहे. नागपूरसारख्या ठिकाणी तेथील आयुक्तांनी दारुची दुकाने उघडू दिली नाहीत. नगरलाच अशी काय आणीबाणी आली होती? ’राष्टÑ सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांनीही या निर्णयाला विरोध व्यक्त केला आहे. ‘कोरोनाला अटकाव करण्यासाठी शाळा, प्रार्थनास्थळे, व्यापार बंद आहे. मात्र, केवळ महसूल मिळतो म्हणून दारु दुकाने सुरु करणे अयोग्य आहे’, असे ते म्हणाले. माहिती अधिकारी कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनीही प्रशासनावर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारु विक्री सुरु आहे. तेथे प्रशासन कारवाई करत नाही. एक पूर्ण स्पिरीटच्या टँकर पकडला त्याचाही तपास उत्पादन शुल्क विभाग लावत नाही. उलट दारुची दुकाने सुरु करण्याची प्रचंड घाई केली गेली. हॉटस्पॉट जेथे आहे तेथे लोकांना औषधे देखील मिळत नव्हती. आता दारु मात्र मुबलक मिळणार. हा विरोधाभास आहे. प्रशासनाने चुकीचा निर्णय घेतला आहे.’ ------------परवानाधारक व्यक्तींनाच दारु उपलब्ध व्हावीकोपरगाव : सरकारने दारू दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी दारू पिण्याचा परवानाधारक व्यक्तींनाच दारू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. नितीन पोळ यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. दीड महिन्यापासून दारू दुकाने बंद असल्यामुळे बºयाच अनुचित प्रकारांना आळा बसला आहे. असे असताना दारूची दुकाने सुरू केल्याने अनुचित प्रकार वाढून पोलीस प्रशासनावर ताण पडणार आहे. ज्यांच्याकडे थोडेफार पैसे शिल्लक आहे, ते दारू विकत घेतील मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत, असे मद्यपी दारू खरेदी करण्याकरिता कोणतेही अनुचित प्रकार करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. एवढे करूनही सरकारला दारू दुकाने सुरू करावी असे वाटत असेल तर ज्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे. अशा व्यक्तींना आधार लिंक केल्या शिवाय दारू उपलब्ध करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.ं