शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
3
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
4
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
5
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
6
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
7
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
8
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
9
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
10
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
11
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
12
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
13
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
14
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
15
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
16
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
17
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
18
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
19
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
20
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र

नगरसेवकांचा ठिय्या,घेराव

By admin | Updated: May 6, 2016 23:23 IST

ज्येष्ठ नेते अरुण लांडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव नगरपरिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी खंडोबामाळ जलशुद्धीकरण प्रकल्पावर ठाण मांडून प्र्रकल्पाचे कामकाज काहीकाळ बंद पाडले

शेवगाव : शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ नेते अरुण लांडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव नगरपरिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी खंडोबामाळ जलशुद्धीकरण प्रकल्पावर ठाण मांडून प्र्रकल्पाचे कामकाज काहीकाळ बंद पाडले.चर्चेसाठी आलेल्या ‘जिपलपा’ च्या सहायक अभियंत्यांनाही घेराव घालून त्यांना धारेवर धरले. येत्या दोन दिवसात शहराचा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार नगरसेवकांनी जाहीर केला. शेवगाव शहरासह प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या ५४ गावांना जायकवाडी बॅक वॉटरमधून पाणी पुरवठा होतो. दुष्काळाची तीव्रता वाढल्याने चराची रुंदी वाढवून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र, चराला अनेक ठिकाणी चढ-उतार असल्याने व लेव्हल नसल्याने जॅकवेलपर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी २४० अश्वशक्तीच्या २ मोटारींची आवश्यकता असताना गेल्या २ वर्षांपासून एकाच जुन्या मोटारीद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जॅकवेलवर पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पोल उभारण्यात आले असून त्यावर वीज कनेक्शन जोडण्यात आलेले नाही. मागील महिन्यात उपाययोजना हाती घेण्याची गरज असताना आता तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार सहन करण्यापलीकडचा असल्याची टीका नगरसेवकांनी केली. आंदोलनात कृष्णा ढोरकुले, साईनाथ आधाट, विनोद मोहिते, अशोक आहुजा, अरुण मुंडे, दिगंबर काथवटे, नितीन दहिवाळकर, कैलास तिजोरे, विकास फलके, वजीर पठाण, अंकुश कुसुळकर, सागर फडके, अजय भारस्कर, नंदकिशोर सारडा, महेश फलके आदींसह सर्व नगरसेवक सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)नगरसेवक आक्रमकनगरसेवकांच्या आंदोलनामुळे टँकरचे पाणी भरण्याचे कामही काही वेळ रेंगाळले. शेवगाव पंचायत समितीच्या ‘जिपलपा’ विभागाचे सहायक अभियंता सोपान घुले यांनी आंदोलनस्थळी येवून नगरसेवकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी खंडोबा माळ जलशुद्धीकरण प्रकल्पावरून माहिती घेतली असता ६ नव्हे तर केवळ ४ मोटारी सुरू असल्याचे व मोटारी जोडण्याचे काम सुरू असल्याने जलशुद्धीकरण प्रकल्पावरील वीज पुरवठा बंद असल्याने दिसून आले. तसेच केंद्रावरील वीज पुरवठा रोज दीर्घकाळ बंद राहत असल्याने आपोआपच शहराला कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याची वस्तुस्थिती दिसून आल्याने संतप्त नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.