अहमदनगर : शाळा व महाविद्यालयाची प्रवेश प्रकियेसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांना तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र, तरी त्यांना वेळेत दाखले मिळत नसल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सध्या सर्व शाळा, महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी उत्पन्नाचा दाखले यासह अन्य दाखल्यांची आवश्यकता असून त्यासाठी तहसील कार्यालयात पालक आणि विद्यार्थ्यांना चकरा माराव्या लागत आहे. सेतू कार्यालयात महा-आॅनलाईन साफ्टवेअर बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याच्या निषधार्थ छावा संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शिवाजी सांगळे यांनी केले. नायब तहसीलदार चंद्रकांत नागवडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी योगेश बनकर, ज्ञोनश्वर बेल्हेकर, सुयोग दारकुंडे, किरण आडेप उपस्थित होते.
दाखल्यांसाठी छावाचा ठिय्या
By admin | Updated: June 13, 2014 01:15 IST