शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तीन महिन्यात तिघींचा खून : प्रेमकहाणीचं दुर्दैव

By अरुण वाघमोडे | Updated: May 14, 2019 11:16 IST

आरती पांडुरंग सायगुडे, प्रतिभा देवेंद्र कोठावले व रुक्मिणी मंगेश रणसिंग या तिघी जणी... तसे यांच्या नावात काहीच साम्य नाही

अरुण वाघमोडेअहमदनगर : आरती पांडुरंग सायगुडे, प्रतिभा देवेंद्र कोठावले व रुक्मिणी मंगेश रणसिंग या तिघी जणी... तसे यांच्या नावात काहीच साम्य नाही मात्र, अल्पशा आयुष्यातच त्यांच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवात खूप काही साम्य आहे. या तिघींची मागील तीन महिन्यांत निर्घृण हत्या झाली. या हत्या कुणी बाहेरच्यांनी नव्हे तर त्यांच्याच नातेवाईकांनी केल्या. या हत्येंची कारणही सारखीच. ती म्हणजे खोटी प्रतिष्ठा अन् पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा...तीन महिन्यातील पहिली घटना मार्च महिन्यात जामखेड तालुक्यात घडली. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे 17 वर्षांची आरती सायगुडे हिचा दुर्देवी अंत झाला. वडील आणि दोघा मामांनी आरतीची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळून टाकला. 29 मार्च रोजी ही घटना उघडकीस आली अन पोलिसांनी आरोपींना अटक केले. कारण काय तर म्हणे, कॉलेजमधून येताना आरती एका तरुणाच्या मोटारसायकलवर बसून आली होती. या इतक्या शुल्लक कारणातून आरतीची तिच्याच पित्याने हत्या केली.दुसरी घटना नेवासा तालुक्यात एप्रिल महिन्यात घडली. आंतरजातीय विवाह केला म्हणून नेवासा तालुक्यातील कौठा येथे 24 वर्षीय प्रतिभा देवेंद्र कोठावले (सासरचे नाव) या विवाहित मुलीचा तिच्याच माता-पित्यांनी खून करून अंत्यसंस्कारही केले. 28 एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुलीचे वडील ब्रह्मदेव रमाजी मरकड व आई आशा यांच्या विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. प्रतिभा ही सुशिक्षित होती. मेडिकल दुकानात नोकरी करत होती तर तिचा पती देवेंद्र हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न त्यांनी पाहिले. मात्र घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केले. लग्नानंतर घरच्यांनी मुलीशी संपकत्र साधत थाटामाटात आम्ही लग्न लाऊन देतो, असे सांगत माहेरी बोलावून घेतले. मोठ्या अपेक्षेने प्रतिभा माहेरी आली. माहेरातच तिचा घात झाला अन् एक प्रेमकहाणी अर्ध्यावरच संपली.तिसरी घटना पारनेर तालुक्यात नुकतीच घडली. निघोज येथील 19 वर्षीय रुक्मिणी रणसिंग हिच्या आयुष्याचाही असाच दुर्दैवी अंत झाला. गावातीलच मंगेश याच्याशी प्रेमविवाह केला. विवाहानंतर मात्र मंगेश याने तिचा छळ सुरू केला. नव-याच्या त्रासाला कंटाळून माहेरी आलेल्या रुक्मिणीला तिच्या पतीने जाळून मारले.प्रतिष्ठा, शंका, छळ अन अंतआरती सायगुडे हिची पे्रमकहाणी तिच्या पित्याच्या मनातील कल्पना होती. या कल्पनेलाच त्याने खरे मानून खोट्या प्रतिष्ठेपायी मुलीचा बळी घेतला. प्रत्यक्षात आरती आणि त्या मोटारसायकलवाल्या मुलाचा काही संबंध नव्हता. प्रतिभा हिच्या प्रेमकहाणीत तिचे माता-पिता खलनायक ठरले तर रुक्मिणीचा प्रियकरच घातकी निघाला. चारित्र्याच्या संशयावरून त्याने रुक्मिणीचा शेवटपर्यंत छळ केला.‘‘माता-पित्यांनी मुलांशी सुसंवाद ठेवणे गरजेचे आहे. मुले विशिष्ट वयात आल्यानंतर त्यांच्याशी मित्रासारखे रहावे. त्यांच्या भावभावना समजून घ्याव्यात. चांगल्या-वाईट बाबींची त्यांना समज द्यावी. घरातील मुलीने अचानक तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत स्वतंत्र निर्णय घेतला तर अशावेळी चर्चेतून मार्ग काढावेत. समाज काय म्हणेल या मानसिकतेतून अथवा चुकीच्या माहितीतून कुठलाही गुन्हा करू नये.’’ असे दिलासा सेलच्या प्रमुख कल्पना चव्हाण यांनी सांगितलं. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस