शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संगमनेरातील तिघांचे सुयश

By शेखर पानसरे | Updated: May 23, 2023 22:56 IST

तिघेही शेतकरी कुटुंबांतील ; अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संगमनेर तालुक्यातील तिघांनी सुयश मिळविले. यात सुकेवाडी गावचे सुपुत्र मंगेश पाराजी खिलारी, मांची गावचे सुपुत्र स्वप्निल राजाराम डोंगरे आणि पिंपरणे गावच्या कन्या राजश्री शांताराम देशमुख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सुयश मिळविले. विशेष म्हणजे हे तिघेही शेतकरी कुटुंबांतील आहेत.

संगमनेर शहरापासून जवळच असलेल्या सुकेवाडी गावातील मंगेश खिलारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३९६ वा क्रमांक मिळविला. त्यांचे वडील पाराजी खिलारी यांचे गावातच छोटेसे हॉटेल असून मंगेश यांची आई संगिता या बिडी कामगार आहेत. मंगेश यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शुक्लेश्वर विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी अकरावीला येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तेथे अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुुढे कला शाखेत पदवीचे शिक्षण पुण्यातील एसपी महाविद्यालयात पूर्ण केले. पुण्यात राहून अभ्यास केला. घरची परिस्थिती बेताची असताना सुद्धा त्यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी मिळविलेले सुयश खरोखर कौतुकास्पद आहे.

कोल्हार-घोटी राज्यमार्गावर असलेल्या संगमनेर तालुक्यातील मांची येथील स्वप्निल राजाराम डोंगरे हे देखील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील राजाराम दामोधर डोंगरे हे महावितरण कंपनीत नाशिक ग्रामीण विभागात कार्यकारी अभियंता म्हणून तर आई वैशाली डोंगरे या नाशिक महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षिका आहेत. स्वप्निल डोंगरे यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमध्ये झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण संगमनेर शहरातील दिगंबर गणेश सराफ विद्यालयात झाले. पुढील शिक्षण त्यांनी पुण्यात पूर्ण केले. बीई मेकॅनिकल पदवी मिळविली. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांनी दिल्ली गाठली आणि वयाच्या २८ व्या वर्षी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७०७ वा क्रमांक मिळविला.

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातील राजश्री शांताराम देशमुख यांनी वयाच्या २५ वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश मिळविले. त्यांचे प्राथमिक शिक्षण संगमनेरातील डेरे इंग्लिश मिडियम स्कूल येथे झाले आहे. अकरावी आणि बारावीचे विज्ञान शाखेतून शिक्षण त्यांनी शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. एमआयटी, पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविली. त्यानंतर पुढे तीन वर्ष दिल्ली येथे राहून अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७१९ वा क्रमांक मिळविला. त्यांचे वडील शांताराम उत्तमराव देशमुख हे माजी सैनिक असून सेवानिवृत्तीनंतर ते शेती करतात. प्रगतशील शेतकरी म्हणून ते परिचित आहेत.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग