शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संगमनेरातील तिघांचे सुयश

By शेखर पानसरे | Updated: May 23, 2023 22:56 IST

तिघेही शेतकरी कुटुंबांतील ; अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संगमनेर तालुक्यातील तिघांनी सुयश मिळविले. यात सुकेवाडी गावचे सुपुत्र मंगेश पाराजी खिलारी, मांची गावचे सुपुत्र स्वप्निल राजाराम डोंगरे आणि पिंपरणे गावच्या कन्या राजश्री शांताराम देशमुख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सुयश मिळविले. विशेष म्हणजे हे तिघेही शेतकरी कुटुंबांतील आहेत.

संगमनेर शहरापासून जवळच असलेल्या सुकेवाडी गावातील मंगेश खिलारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३९६ वा क्रमांक मिळविला. त्यांचे वडील पाराजी खिलारी यांचे गावातच छोटेसे हॉटेल असून मंगेश यांची आई संगिता या बिडी कामगार आहेत. मंगेश यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शुक्लेश्वर विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी अकरावीला येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तेथे अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुुढे कला शाखेत पदवीचे शिक्षण पुण्यातील एसपी महाविद्यालयात पूर्ण केले. पुण्यात राहून अभ्यास केला. घरची परिस्थिती बेताची असताना सुद्धा त्यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी मिळविलेले सुयश खरोखर कौतुकास्पद आहे.

कोल्हार-घोटी राज्यमार्गावर असलेल्या संगमनेर तालुक्यातील मांची येथील स्वप्निल राजाराम डोंगरे हे देखील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील राजाराम दामोधर डोंगरे हे महावितरण कंपनीत नाशिक ग्रामीण विभागात कार्यकारी अभियंता म्हणून तर आई वैशाली डोंगरे या नाशिक महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षिका आहेत. स्वप्निल डोंगरे यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमध्ये झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण संगमनेर शहरातील दिगंबर गणेश सराफ विद्यालयात झाले. पुढील शिक्षण त्यांनी पुण्यात पूर्ण केले. बीई मेकॅनिकल पदवी मिळविली. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांनी दिल्ली गाठली आणि वयाच्या २८ व्या वर्षी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७०७ वा क्रमांक मिळविला.

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातील राजश्री शांताराम देशमुख यांनी वयाच्या २५ वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश मिळविले. त्यांचे प्राथमिक शिक्षण संगमनेरातील डेरे इंग्लिश मिडियम स्कूल येथे झाले आहे. अकरावी आणि बारावीचे विज्ञान शाखेतून शिक्षण त्यांनी शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. एमआयटी, पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविली. त्यानंतर पुढे तीन वर्ष दिल्ली येथे राहून अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७१९ वा क्रमांक मिळविला. त्यांचे वडील शांताराम उत्तमराव देशमुख हे माजी सैनिक असून सेवानिवृत्तीनंतर ते शेती करतात. प्रगतशील शेतकरी म्हणून ते परिचित आहेत.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग