शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव माळवी प्रकरणात तीन अभियंत्यांवर संशयाची सुई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 17:06 IST

पिंपळगाव माळवी (ता़ नगर) येथील पाणी पुरवठा योजनेतील अनागोंदीवरुन तीन अभियंत्यांवर संशयाची सुई असून, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेत हालचाली सुरु झाल्या आहेत़

साहेबराव नरसाळेअहमदनगर : पिंपळगाव माळवी (ता़ नगर) येथील पाणी पुरवठा योजनेतील अनागोंदीवरुन तीन अभियंत्यांवर संशयाची सुई असून, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेत हालचाली सुरु झाल्या आहेत़ मात्र, पाण्याच्या टाकीची जागा बक्षिसपत्र झालेली नसतानाही या योजनेला प्रशासकीय मान्यता देणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्यावर कोण जबाबदारी निश्चित करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़पिंपळगाव माळवी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी २२ लाख रुपये खर्चून पाणी योजना मंजूर करण्यात आली होती़ २८ फेबु्रवारी २०१८ रोजी या योजनेच्या कामाला प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश देण्यात आला़ पाईपलाईन टाकण्याचे प्रगतीपथावर आहे़ मात्र, पूर्वीची जागा बक्षिसपत्र करुन न घेताच काम सुरु झाले़ ज्यांची जमीन पाण्याच्या टाकीसाठी वापरण्यात येणार होती, त्या जागेचे बक्षिसपत्र करुन नंतर काम सुरु होणे अपेक्षित होते़ मात्र, जागा मालकाचे केवळ सहमती पत्र घेऊन काम सुरु करण्यात आले़ नंतर संबंधित जागा मालकाने बक्षिसपत्र करुन देण्यास नकार दिला़ त्यानंतर संबंधित ठेकेदारास या योजनेतील पाईपलाईनचे ४८ लाख रुपये अदा करण्यात आले़ वास्तविक योजनेला तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया व कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी जागेचे बक्षिसपत्र करुन घेणे आवश्यक होते़ मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला़ पाईपलाईनचे कामही अपूर्ण असताना ठेकेदाराला ४८ लाख रुपये अदा करण्यात आले़ यावरुन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व स्थायी समितीत चौकशीची मागणी करण्यात आली़ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी या योजनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही प्रस्तावित करण्याच्या सूचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए़ ए़ कोकरे यांना दिल्या़ त्यानुसार या योजनेच्या कामांना त्या - त्या टप्यावर कोणी मान्यता दिली, तांत्रिक बाबी का तपासण्यात आल्या नाहीत, निविदा प्रक्रिया कशी राबविण्यात आली, कामेच अपूर्ण असताना ठेकेदारांना बिले का देण्यात आली, याची माहिती मागवून संबंधित अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत़दरम्यान या योजनेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून, त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करणार का, असा सवाल पाणी पुरवठा विभागातीलच काही अधिकारी उपस्थित करीत आहेत़पूर्वीच्या व आत्ताच्या जागांमध्ये अंतरच्पिंपळगाव माळवी गावास या योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी दोन साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत़ त्यासाठी पूर्वी ज्या जमीन मालकाने जागा बक्षिसपत्र करुन देण्याची संमती दाखविली होती, त्या जागेनुसार योजनेचा आराखडा तयार करण्यात आला़ त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आणि निविदा प्रक्रियाही त्याच आराखड्यानुसार राबविण्यात आली़च्मात्र, नंतर त्या जागा मालकाने जागा बक्षिसपत्र करुन देण्यास नकार दिला़ नंतर पाणी पुरवठा विभागाची जागेसाठी धावाधाव सुरु झाली़ ग्रामपंचायतीने एका टाकीच्या बांधकामासाठी जागा देण्याची तयारी दाखविली आहे़ पूर्वीची जागा व ग्रामपंचायतीने दिलेली जागा यात सुमारे ४५० मीटरचे अंतर आहे़ तर दुसºया टाकीसाठी एका खासगी जागा मालकाने जागा दिली आहे़ यातही सुमारे २५० मीटरचे अंतर आहे़ या दोन्ही जागांची समपातळी तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते़कारणे दाखवा नोटीस बजावण्याची तयारीच्या योजनेतील अनागोंदीला तत्कालीन कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांचा त्या-त्या टप्प्यावर काय सहभाग राहिला, याबाबत जिल्हा परिषदेने पडताळणी सुरु केली आहे़

बक्षिसपत्र करुन जिल्हा परिषदेच्या नावावर होत नाही, तोपर्यंत तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश या प्रक्रिया का करण्यात आल्या, याबाबतचा खुलासा संबंधितांकडे मागितला जाणार आहे़ यात तीनही अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करुन त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, असे सांगण्यात आले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर