शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

साडेतीन लाख शेतकरी कृषी संजीवनीस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 17:50 IST

कृषीपंपाच्या थकीत बिलावरील व्याज व दंड यात सवलत देऊन वीजबिलाची मूळ रक्कम वसूल करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार ६२६ कृषिपंपधारक शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतक-यांना महावितरणकडून नवीन स्वरूपातील वीजबिलाचे वाटप सुरू करण्यात आले असून १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी चालू बिलाची किती रक्कम भरून योजनेत सहभागी होता येणार आहे.

ठळक मुद्दे मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनानवीन वीजबिले वाटपास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कृषीपंपाच्या थकीत बिलावरील व्याज व दंड यात सवलत देऊन वीजबिलाची मूळ रक्कम वसूल करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार ६२६ कृषिपंपधारक शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतक-यांना महावितरणकडून नवीन स्वरूपातील वीजबिलाचे वाटप सुरू करण्यात आले असून १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी चालू बिलाची किती रक्कम भरून योजनेत सहभागी होता येणार आहे.

जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार ६२६ शेतक-यांकडे १ हजार ३३८ कोटी रुपये मूळ रकमेची वीजबिले थकीत आहेत. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी बिलामध्ये थकीत रकमेचे सुलभ हप्ते, भरावयाची रक्कम व कालावधी देण्यात आला आहे. तसेच योजनेची ठळक वैशिष्ट्य व योजनेत सहभाग घेऊन नियमितपणे हप्ते भरल्यास नेमके किती व्याज व दंड माफ करण्यात येईल, याचीही माहिती बिलात देण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी चालू बिलाची किती रक्कम भरून योजनेत सहभागी होता येणार आहे.

जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार ६२६ कृषीपंपाच्या ग्राहकांकडे थकबाकी आहे. अहमदनगर मंडलात ३० हजारपेक्षा अधिक थकबाकी असणारे १ लाख ९६ हजार ५६२ ग्राहक आहेत, त्यांच्याकडे १ हजार ५८ कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. ३० हजारपेक्षा कमी रकमेची बिले थकीत असलेले १ लाख ६० हजार ६४ ग्राहक आहेत, त्यांच्याकडे २८१ कोटी रुपये थकीत आहेत. ३० हजारपेक्षा अधिक थकबाकी शेतक-यांना समान दहा भाग करून देण्यात आले आहेत. डिसेंबर २०१८ पर्यंत हि रक्कम सामान दहा हप्त्यात भरावी लागणार आहे. ३० हजारपेक्षा कमी थकबाकी असलेल्या कृषिपंप ग्राहकांना पाच समान हप्ते करून देण्यात आले असून दर तीन महिन्यांनी ते नियमित भरणे अनिवार्य आहे.एकूण थकबाकीदार : ३ लाख ५६ हजार ६२६एकूण मूळ थकबाकी : १ हजार ३३८ कोटी रुपये३० हजारपेक्षा कमी रकमेची थकीत ग्राहक : १ लाख ६० हजार, थकीत रक्कम : २८१ कोटी३० हजारपेक्षा अधिक थकबाकी ग्राहक : १ लाख ९६ हजार ५६२, थकीत रक्कम १ हजार ५८ कोटी रुपये