शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

साडेतीनशे कोटींची वाळू , महसूल मिळाला ४३ कोटी पाच वर्षांतील स्थिती : दोन वर्षांपासून वाळूचे लिलावच नाहीत, वाळूतस्करांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 17:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : वाळू लिलावातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत भक्कम भर पडते. मात्र गेल्या काही वर्षांत या महसुलावर जिल्हा प्रशासनाला पाणी सोडावे लागले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा प्रशासनाने ३५६ कोटींची वाळू लिलावासाठी ठेवली. मात्र त्यातील केवळ ४३ कोटींचीच वाळू ठेकेदारांनी लिलावात घेतली. जी वाळू लिलावात विकली नाही, ती अद्याप शिल्लक आहे की वाळूतस्करांनी पळवली? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : वाळू लिलावातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत भक्कम भर पडते. मात्र गेल्या काही वर्षांत या महसुलावर जिल्हा प्रशासनाला पाणी सोडावे लागले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा प्रशासनाने ३५६ कोटींची वाळू लिलावासाठी ठेवली. मात्र त्यातील केवळ ४३ कोटींचीच वाळू ठेकेदारांनी लिलावात घेतली. जी वाळू लिलावात विकली नाही, ती अद्याप शिल्लक आहे की वाळूतस्करांनी पळवली? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.जिल्ह्यातून वाहणाºया गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा या मोठ्या नद्यांना मुबलक वाळू उपलब्ध असल्याने या वाळूच्या लिलावातून गौण खनिज विभागाला मोठा महसूल मिळतो. या वाळूच्या विक्रीतूनच गौण खनिजचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण होते. गेल्या पाच वर्षांत जिल्हा प्रशासनाने तब्बल ३७८ वाळूस्थळ लिलावासाठी उपलब्ध करून दिले. त्याची सरकारी किंमत ३५६ कोटी ५२ लाख रूपये होती. परंतु यातील केवळ ७२ वाळूस्थळांचीच लिलावात विक्री झाली. त्यातून अवघे ४३ कोटी ३२ लाख रूपये प्रशासनाच्या पदरात पडले. उर्वरित ३१३ कोटींच्या वाळूकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली. २०१४-१५ या वर्षी गौण खनिज विभागाने १७८ वाळूठेक्यांसाठी लिलाव ठेवून त्याची सरकारी किंमत ७८ कोटी ३२ लाख रूपये ठेवली. त्यातील २५ ठेक्यांचा लिलाव होऊन १३ कोटी ५५ लाख रूपये महसूल मिळाला. २०१५-१६ मध्ये ६४ वाळू ठेक्यांमधील ६९ कोटी ९३ लाखांची वाळू लिलावासाठी होती. त्यासही अल्प प्रतिसाद मिळून केवळ १७ ठेके विकले गेले व त्यापोटी ७ कोटी ९३ लाखांची रक्कम महसूलला मिळाली. पुढे २०१६-१७ मध्ये ८२ कोटी रूपयांचे ७७ वाळूसाठे लिलावासाठी होते. त्यातही अवघे ८.६६ कोटींचे १८ ठेके विकले गेले. २०१७-१८मध्येही हा प्रतिसाद कमीच राहिला. ११७ कोटींचे ४५     ठेके लिलावासाठी होते त्यातही १३ कोटींचे केवळ १२ ठेके विकले गेले. गेल्या चार वर्षांत अशा एकूण ७२ ठेक्यांची विक्री होऊन त्यापोटी ४३ कोटी ३२ लाख रूपये प्रशासनाला जमा झाले.