शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
2
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
3
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
4
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
5
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
6
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
7
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
8
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
9
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
10
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
11
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
12
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
13
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
14
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
15
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
16
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
17
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
18
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
19
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
20
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

साडेतीनशे कोटींची वाळू , महसूल मिळाला ४३ कोटी पाच वर्षांतील स्थिती : दोन वर्षांपासून वाळूचे लिलावच नाहीत, वाळूतस्करांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 17:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : वाळू लिलावातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत भक्कम भर पडते. मात्र गेल्या काही वर्षांत या महसुलावर जिल्हा प्रशासनाला पाणी सोडावे लागले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा प्रशासनाने ३५६ कोटींची वाळू लिलावासाठी ठेवली. मात्र त्यातील केवळ ४३ कोटींचीच वाळू ठेकेदारांनी लिलावात घेतली. जी वाळू लिलावात विकली नाही, ती अद्याप शिल्लक आहे की वाळूतस्करांनी पळवली? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : वाळू लिलावातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत भक्कम भर पडते. मात्र गेल्या काही वर्षांत या महसुलावर जिल्हा प्रशासनाला पाणी सोडावे लागले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा प्रशासनाने ३५६ कोटींची वाळू लिलावासाठी ठेवली. मात्र त्यातील केवळ ४३ कोटींचीच वाळू ठेकेदारांनी लिलावात घेतली. जी वाळू लिलावात विकली नाही, ती अद्याप शिल्लक आहे की वाळूतस्करांनी पळवली? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.जिल्ह्यातून वाहणाºया गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा या मोठ्या नद्यांना मुबलक वाळू उपलब्ध असल्याने या वाळूच्या लिलावातून गौण खनिज विभागाला मोठा महसूल मिळतो. या वाळूच्या विक्रीतूनच गौण खनिजचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण होते. गेल्या पाच वर्षांत जिल्हा प्रशासनाने तब्बल ३७८ वाळूस्थळ लिलावासाठी उपलब्ध करून दिले. त्याची सरकारी किंमत ३५६ कोटी ५२ लाख रूपये होती. परंतु यातील केवळ ७२ वाळूस्थळांचीच लिलावात विक्री झाली. त्यातून अवघे ४३ कोटी ३२ लाख रूपये प्रशासनाच्या पदरात पडले. उर्वरित ३१३ कोटींच्या वाळूकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली. २०१४-१५ या वर्षी गौण खनिज विभागाने १७८ वाळूठेक्यांसाठी लिलाव ठेवून त्याची सरकारी किंमत ७८ कोटी ३२ लाख रूपये ठेवली. त्यातील २५ ठेक्यांचा लिलाव होऊन १३ कोटी ५५ लाख रूपये महसूल मिळाला. २०१५-१६ मध्ये ६४ वाळू ठेक्यांमधील ६९ कोटी ९३ लाखांची वाळू लिलावासाठी होती. त्यासही अल्प प्रतिसाद मिळून केवळ १७ ठेके विकले गेले व त्यापोटी ७ कोटी ९३ लाखांची रक्कम महसूलला मिळाली. पुढे २०१६-१७ मध्ये ८२ कोटी रूपयांचे ७७ वाळूसाठे लिलावासाठी होते. त्यातही अवघे ८.६६ कोटींचे १८ ठेके विकले गेले. २०१७-१८मध्येही हा प्रतिसाद कमीच राहिला. ११७ कोटींचे ४५     ठेके लिलावासाठी होते त्यातही १३ कोटींचे केवळ १२ ठेके विकले गेले. गेल्या चार वर्षांत अशा एकूण ७२ ठेक्यांची विक्री होऊन त्यापोटी ४३ कोटी ३२ लाख रूपये प्रशासनाला जमा झाले.