शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण-अमरापूर मार्गासाठी हजारो वृक्षांची कत्तल; जुनी वृक्षसंपदा नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:51 IST

भिगवण-अमरापूर या २५० कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असलेल्या कित्येक वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल सुरू आहे. या कत्तलीने हजारो जुनी झाडे जमीनदोस्त झाली.

विश्वास रेणुकर । राशीन : भिगवण-अमरापूर या २५० कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असलेल्या कित्येक वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल सुरू आहे. या कत्तलीने हजारो जुनी झाडे जमीनदोस्त झाली.माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून भिगवण (इंदापूर) - अमरापूर (शेवगाव) रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या कर्जत तालुक्यात रस्त्याचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत रस्ता रूंदीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण होत  आहे.  रस्ता रूंदीकरण सुरू असल्याने दुतर्फा असलेली नवी, जुनी झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी शासनाने निविदा काढून एका ठेकेदाराला झाडे तोडण्याचे कामही दिले आहे. सध्या कर्जत ते राशीन मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.  राशीन ते खेड या मार्गावर पुलाची कामे सुरू आहेत. दोन्ही मार्गात रूंदीकरणात अडथला ठरणारी झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून असलेली जुनी झाडे नामशेष होत आहेत. मार्किंग केलेल्या झांडाची नेमकी संख्या संबंधित विभागाला विचारण्यात आली. मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे ठेकेदार काही मार्किंग नसलेली झाडेही तोडू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.विकासाच्या धमण्या अशी रस्त्यांची ओळख आहे. चांगल्या रस्त्यांमुळे दळण-वळणाचा प्रश्नही सुटणार असला तरी झाडांची कत्तल झाल्याने होणाºया पर्यावरणाच्या नुकसानीचे काय? असा प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करू लागले आहेत. 

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी ठेकेदार कंपनीकडे आहे. त्यामुळे अडथळा ठरणा-या तोडलेल्या झाडांच्या बदल्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकादार जास्तीत जास्त झाडे लावणार आहे, असे कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ‍े.बी. भोसले यांनी सांगितले.

रस्त्याच्या बाजूची काही झाडे साठ वर्षाहून अधिक जुनी आहेत. काही नवी झाडेही आहेत. त्याची कत्तल सुरू आहे. गावांच्या विकासासाठी झाडे तोडणे गैर नसले तरी त्यानंतर मात्र पुन्हा झाडे लावून त्यांचे संवर्धनही त्या संबंधित विभागाने करायला हवे, असे कर्जत भारतीय जनसंसदचे उपाध्यक्ष जावेद काझी यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतroad safetyरस्ते सुरक्षा