शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

भिगवण-अमरापूर मार्गासाठी हजारो वृक्षांची कत्तल; जुनी वृक्षसंपदा नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:51 IST

भिगवण-अमरापूर या २५० कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असलेल्या कित्येक वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल सुरू आहे. या कत्तलीने हजारो जुनी झाडे जमीनदोस्त झाली.

विश्वास रेणुकर । राशीन : भिगवण-अमरापूर या २५० कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असलेल्या कित्येक वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल सुरू आहे. या कत्तलीने हजारो जुनी झाडे जमीनदोस्त झाली.माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून भिगवण (इंदापूर) - अमरापूर (शेवगाव) रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या कर्जत तालुक्यात रस्त्याचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत रस्ता रूंदीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण होत  आहे.  रस्ता रूंदीकरण सुरू असल्याने दुतर्फा असलेली नवी, जुनी झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी शासनाने निविदा काढून एका ठेकेदाराला झाडे तोडण्याचे कामही दिले आहे. सध्या कर्जत ते राशीन मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.  राशीन ते खेड या मार्गावर पुलाची कामे सुरू आहेत. दोन्ही मार्गात रूंदीकरणात अडथला ठरणारी झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून असलेली जुनी झाडे नामशेष होत आहेत. मार्किंग केलेल्या झांडाची नेमकी संख्या संबंधित विभागाला विचारण्यात आली. मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे ठेकेदार काही मार्किंग नसलेली झाडेही तोडू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.विकासाच्या धमण्या अशी रस्त्यांची ओळख आहे. चांगल्या रस्त्यांमुळे दळण-वळणाचा प्रश्नही सुटणार असला तरी झाडांची कत्तल झाल्याने होणाºया पर्यावरणाच्या नुकसानीचे काय? असा प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करू लागले आहेत. 

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी ठेकेदार कंपनीकडे आहे. त्यामुळे अडथळा ठरणा-या तोडलेल्या झाडांच्या बदल्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकादार जास्तीत जास्त झाडे लावणार आहे, असे कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ‍े.बी. भोसले यांनी सांगितले.

रस्त्याच्या बाजूची काही झाडे साठ वर्षाहून अधिक जुनी आहेत. काही नवी झाडेही आहेत. त्याची कत्तल सुरू आहे. गावांच्या विकासासाठी झाडे तोडणे गैर नसले तरी त्यानंतर मात्र पुन्हा झाडे लावून त्यांचे संवर्धनही त्या संबंधित विभागाने करायला हवे, असे कर्जत भारतीय जनसंसदचे उपाध्यक्ष जावेद काझी यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतroad safetyरस्ते सुरक्षा