शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड तालुक्यात ११ हजार शेतक-यांना नुकसानीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:36 IST

जामखेड तालुक्यातील नान्नज, नायगाव व जामखेड मंडलाला अवकाळीचा तडाखा बसला. काढणीसाठी आलेला कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्ष बागांचे नुकसान झाले.

अशोक निमोणकर ।  जामखेड : तालुक्यातील नान्नज, नायगाव व जामखेड मंडलाला अवकाळीचा तडाखा बसला. काढणीसाठी आलेला कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्ष बागांचे नुकसान झाले. नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. ११ हजार १२४ बाधित शेतक-यांच्या ५ हजार २१५ हेक्टर क्षेत्रात साडेआठ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील काही भागात ओला तर काही भागात कोरडा दुष्काळ आहे. जामखेड, नान्नज, नायगाव या मंडलात कांदा, सोयाबीन, कापूस पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. पाण्यात भिजल्याने शेतात पुन्हा सोयाबीन पीक उगवून शेत हिरवीगार झाले आहेत. नान्नज परिसरात द्राक्ष बागा, कांदा, मका पिके उद्ध्वस्त झाले आहे. खरीप हंगामात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. ९० दिवसात उडीद पिक थोड्याफार पावसात साधले जाते. यामुळे उडीदाची लागवड २९ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली होती. शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने उडीद पूर्ण वाया गेला. त्यामुळे बाजारपेठत उडदाला ४ हजार असणारा दर ९ हजारपर्यंत गेला. उडीद वाया गेला. कृषी कार्यालयाने क्रॉपकटींग करून अहवाल दिला आहे. त्यामुळे शेतक-यांना लाभ होईल पण तो केव्हा मिळेल, याबाबत विमा कंपनीचे कार्यालय नसल्याने माहिती मिळत नाही. त्यामुळे परतीच्या पावसाने तालुक्यातील बाधीत क्षेत्र कमी झाले आहे.नान्नजच्या उरेवस्ती येथे मागील २० वर्षापासून संतोष साधू मोहळकर व केशरबाई नामदेव मलंगनेर हे द्राक्ष फळबागांची लागवड करीत आहेत. यंदा अवकाळी पावसाने द्राक्षांची घडगळ झाली. त्यामुळे संपूर्ण द्राक्षबाग बाधित झाली, असे त्यांनी सांगितले.सोयाबीनला कवडीमोल भावकाढणीच्या वेळी झालेल्या पावसाने सोयाबीन काळे पडले आहे. बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला ३ हजार ८०० रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र केवळ काही दाणे काळे पडल्याने सोयाबीनला व्यापारी दोन हजार रूपये दर देत आहेत. पावसात भिजलेला माल साठवून ठेवल्यास तो किती दिवस टिकेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी तो साठवण्याऐवजी मिळेल त्या किमतीला विकत आहेत.

टॅग्स :JamkhedजामखेडCrop Insuranceपीक विमा