शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड तालुक्यात ११ हजार शेतक-यांना नुकसानीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:36 IST

जामखेड तालुक्यातील नान्नज, नायगाव व जामखेड मंडलाला अवकाळीचा तडाखा बसला. काढणीसाठी आलेला कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्ष बागांचे नुकसान झाले.

अशोक निमोणकर ।  जामखेड : तालुक्यातील नान्नज, नायगाव व जामखेड मंडलाला अवकाळीचा तडाखा बसला. काढणीसाठी आलेला कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्ष बागांचे नुकसान झाले. नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. ११ हजार १२४ बाधित शेतक-यांच्या ५ हजार २१५ हेक्टर क्षेत्रात साडेआठ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील काही भागात ओला तर काही भागात कोरडा दुष्काळ आहे. जामखेड, नान्नज, नायगाव या मंडलात कांदा, सोयाबीन, कापूस पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. पाण्यात भिजल्याने शेतात पुन्हा सोयाबीन पीक उगवून शेत हिरवीगार झाले आहेत. नान्नज परिसरात द्राक्ष बागा, कांदा, मका पिके उद्ध्वस्त झाले आहे. खरीप हंगामात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. ९० दिवसात उडीद पिक थोड्याफार पावसात साधले जाते. यामुळे उडीदाची लागवड २९ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली होती. शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने उडीद पूर्ण वाया गेला. त्यामुळे बाजारपेठत उडदाला ४ हजार असणारा दर ९ हजारपर्यंत गेला. उडीद वाया गेला. कृषी कार्यालयाने क्रॉपकटींग करून अहवाल दिला आहे. त्यामुळे शेतक-यांना लाभ होईल पण तो केव्हा मिळेल, याबाबत विमा कंपनीचे कार्यालय नसल्याने माहिती मिळत नाही. त्यामुळे परतीच्या पावसाने तालुक्यातील बाधीत क्षेत्र कमी झाले आहे.नान्नजच्या उरेवस्ती येथे मागील २० वर्षापासून संतोष साधू मोहळकर व केशरबाई नामदेव मलंगनेर हे द्राक्ष फळबागांची लागवड करीत आहेत. यंदा अवकाळी पावसाने द्राक्षांची घडगळ झाली. त्यामुळे संपूर्ण द्राक्षबाग बाधित झाली, असे त्यांनी सांगितले.सोयाबीनला कवडीमोल भावकाढणीच्या वेळी झालेल्या पावसाने सोयाबीन काळे पडले आहे. बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला ३ हजार ८०० रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र केवळ काही दाणे काळे पडल्याने सोयाबीनला व्यापारी दोन हजार रूपये दर देत आहेत. पावसात भिजलेला माल साठवून ठेवल्यास तो किती दिवस टिकेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी तो साठवण्याऐवजी मिळेल त्या किमतीला विकत आहेत.

टॅग्स :JamkhedजामखेडCrop Insuranceपीक विमा