शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

विसापूर जलाशय नजीक तरी उद्योगनगरी तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीजवळ विसापूर जलाशयाचे पाणी असले तरी जुनी व विस्तारित उद्योगनगरी मात्र तहानलेलीच आहे. ‘धरण ...

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीजवळ विसापूर जलाशयाचे पाणी असले तरी जुनी व विस्तारित उद्योगनगरी मात्र तहानलेलीच आहे. ‘धरण उशाला व कोरड घशाला’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.

सध्या सुपा एमआयडीसीला मुळा जलाशय योजनेतून पाणी पुरवण्यात येत आहे. योजनेत होणाऱ्या बिघाडामुळे सातत्याने पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. त्यामुळे कारखानदार व प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. विसापूर जलाशय योजना राबवण्याची व जुन्या आणि नव्या विस्तारीत एमआयडीसीसाठी कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी कारखानदारांनी व त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी केली आहे.

सतत विस्कळीत होणाऱ्या पाणी पुरवठ्याने औद्योगिक वसाहतीच्या वाढीवर थेट परिणाम होणार असल्याने ५० ते ५५ किमी अंतरावरील जुनी झालेल्या मुळा जलाशय योजनेपेक्षा जवळच १० ते १२ किमी अंतरावर असणाऱ्या विसापूर जलाशयातून सुपा एमआयडीसीला पाणीपुरवठा केला तर तो फायदेशीर ठरणार आहे. टँकरच्या पाण्याचा कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया व उत्पादित मालाची गुणवत्ता यावरच थेट परिणाम होत असून विकत घ्याव्या लागणाऱ्या पाण्यावर अनाठायी खर्च करावा लागत असल्याचे धूत यांनी सांगितले.

जवळपास ५० ते ५५ किलोमीटर अंतरावरील मुळा जलाशयातून थेट सुप्याला कारखान्यासाठी लागणारे पाणी पुरविण्याची व्यवस्था केली आहे. तरी ही पाईपलाईन खूपच जुनी झाल्याने वारंवार त्यात होणाऱ्या बिघाडाने पाणीपुरवठा बंद होतो. परिणामी कारखान्यांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. ते पाणीही शुद्ध नसते. त्यामुळे त्याचा वापर केला तर उत्पादित मालाची गुणवत्ता ढासळते तर टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत असल्यानेही खर्च वाढतो असे विस्तारित एमआयडीसीत नव्याने सुरू झालेल्या मिंडा या कारखान्याचे व्यवस्थापक उल्हास नेवाळे व केएसपीजीचे व्यवस्थापक शिवाजीराव झनझने यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात निंबळक जवळ जलवाहिनी फुटली. त्यावेळी आठ दिवस पाणी बंद होते.

विस्तारित एमआयडीसीत जपानी पार्कची उभारणी होणार असून नव्याने बोक्सो व्हिया, वरूण बेव्हरेज यासारख्या नवीन कंपन्यांच्या कामास सुरवात होणार आहे. त्यामुळे नवीन उद्योजक सुविधांचा विचार करताना पाण्याच्या उपलब्धतेला प्राधान्य देत असल्याने जर पाण्याची सुविधा नसेल तर कारखाने येणार नाहीत. त्यामुळे शाश्वत पाण्यासाठी विसापूर जलाशय योजना हा चांगला पर्याय असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.

----

सुपा एमआयडीसीपासून विसापूर जलाशय अवघ्या १० ते १२ किलोमीटरवर आहे. तेथून सुपा एमआयडीसीसाठी पाणी उपलब्ध झाले तर कारखानदारांना पुरेसा व अखंडपणे पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे या योजनेबाबत आपण सरकारकडे आग्रह धरणार आहोत.

निलेश लंके,

आमदार, पारनेर-नगर