शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आयुक्तांशी चर्चा झाली तरी भाजीपाला विक्रेत्यांना महापालिकेचा त्रास;विक्रेत्यांची आमदार संग्राम जगताप यांच्याकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 13:20 IST

अहमदनगर : येथील प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गत आठवड्यात महापालिकेने हटवले होते.  त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विक्रेत्यांसह महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. तरीही विक्रेत्यांनी बसू न नये यासाठी महापालिकेचे अधिकारी त्रास देत आहेत. त्यामुळे अखेर विक्रेत्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या दरबारात आपली कैफीयत मांडत संरक्षण देण्याची मागणी केली.

अहमदनगर : येथील प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गत आठवड्यात महापालिकेने हटवले होते.  त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विक्रेत्यांसह महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. तरीही विक्रेत्यांनी बसू न नये यासाठी महापालिकेचे अधिकारी त्रास देत आहेत. त्यामुळे अखेर विक्रेत्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या दरबारात आपली कैफीयत मांडत संरक्षण देण्याची मागणी केली.

प्रोफेसर चौकातील एका दुकानदाराचे व विक्रेत्याचे भांडण झाले. याचे निमित्त करून महापालिकेने सर्वच विक्रेत्यांना हटवले. तब्बल चार दिवस विक्रीसाठी आणलेली भाजी विक्रेत्यांना तशीच परत न्यावी लागली. त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला..

याबाबत आयुक्तांशी चर्चाही केली. त्यानंतर आता महापालिका तुम्हाला हटवणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. परंतु चौकात बसू नका, नाही तर भाजीपाला जप्त करण्याबाबत विक्रेत्यांच्या मागे महापालिकेचा रोजच ससेमिरा सूरू आहे. त्यामुळे वैतागलेल्या विक्रेत्यांनी सोमवारी दुपारी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमित खामकर यांच्या माध्यमातून  20 भाजी विक्रेत्यांनी आमदार जगताप यांची भेट घेतली.

आमदार स्वतः विक्रेत्यांना रेषा आखून देणार

आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः विक्रेत्यांशी चर्चा केली. बुधवारी सकाळी आपण स्वतः महापालिकेच्या अधिका-यांच्या उपस्थितीत रेषा आखून त्यांना व्यवस्थित जागेवर बसवण्याची व्यवस्था करू, अशी ग्वाही आमदार जगताप यांनी दिली.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarketबाजार