शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

ज्यांना सर्वांनी नाकारलं त्यांना ‘मानवसेवा’ने स्वीकारलं; लॉकडाऊन काळात १६ बेघर मनोरुग्णांना निवारा 

By अरुण वाघमोडे | Updated: June 7, 2020 13:59 IST

रस्त्यावर भटकंती करणा-या बहुतांशी मनोरुग्ण, मतिमंद यांना कोरोनाच्या महामारीमुळे नातेवाईकांसह समाजानेही नाकारले. कुणाचाच आधार नसलेल्या या मनोरुग्णांना मानवसेवा प्रकल्पात स्वीकारून त्यांना निवारा दिला. लॉकडाऊन काळात १६ मनोरुग्णांना मानवसेवा पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यात ९ महिला व ७ पुरुषांचा समावेश आहे.

अहमदनगर : रस्त्यावर भटकंती करणा-या बहुतांशी मनोरुग्ण, मतिमंद यांना कोरोनाच्या महामारीमुळे नातेवाईकांसह समाजानेही नाकारले. कुणाचाच आधार नसलेल्या या मनोरुग्णांना मानवसेवा प्रकल्पात स्वीकारून त्यांना निवारा दिला. लॉकडाऊन काळात १६ मनोरुग्णांना मानवसेवा पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यात ९ महिला व ७ पुरुषांचा समावेश आहे.

नगर तालुक्यातील अरणगाव येथे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या संस्थेच्यावतीने गेल्या बारा वर्षांपासून मनोरुग्णांसाठी मानवसेवा हा प्रकल्प चालविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आजपर्यंत ५७६ बेघर मनोरुग्ण महिला व पुरुषांना उपचार देऊन त्यांच्या कुटुंबात परत पाठविले आहे. सध्या या प्रकल्पात ३० बेघर मनोरुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या काळात रस्त्यावर आढळून आलेल्या मनोरुग्णांना कोठे दाखल करावयाचे हा प्रश्न पोलिसांसमोर होता. अशा परिस्थितीत मानवसेवा प्रकल्पाने मनोरुग्ण व्यक्तींना निवारा देत त्यांच्यावर उपचार सुरू केले. 

मनोरुग्णांसाठी शासकीय निवारा नाहीमहाराष्ट्रात मनोरुग्णांसाठी पुणे, ठाणे व नागपूर असे तीनच ठिकाणी हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलची मर्यादाही प्रत्येकी १७०० इतकी आहे. त्यामुळे नगरमध्ये मनोरुग्णांसाठी कार्यरत असलेल्या खाजगी संस्था महत्त्वपूर्ण ठरत आहेत. सध्या कोरोनाच्या काळात रस्त्यावर आढळून येणा-या मनोरुग्णांना पोलीस याच संस्थेत दाखल करीत आहेत.

नेपाळचा मतिमंद युवक कुटुंबात परतला सुखरूपकोतवाली पोलिसांना केडगाव बायपास येथे ३० मार्च रोजी लॉकडाऊनकाळात एक बेवारस मतिमंद युवक (वय १८) आढळून आला होता. पोलिसांनी या युवकाला मानवसेवा प्रकल्पात दाखल केले होते. संस्थेने दीड महिना या युवकाला उपचार देत काळजी घेतली.  या युवकाला परत त्याच्या कुटुंबात पोहोच करण्यासाठी संस्थेच्यावतीने प्रयत्न करण्यात आले. अखेर या मतिमंद युवकाची ओळखही समोर आली. दीपक थापा असे नाव असलेल्या युवकाला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. दीपक हा भोसरी एमआयडीसी येथे राहणारा होता.

रस्त्यावरील बेघर, निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत असलेल्या मानवसेवा प्रकल्पाला मदतीची गरज आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संस्थेला मिळणारा मदतीचा ओघ कमी झाला आहे. संस्थेकडील अन्नधान्य, किराणा, औषधे आणि इतर अत्यावश्यक वस्तुंचा साठा कमी झाला आहे. हे कार्य पूर्णत: लोकसहभागातून चालते. समाजातील दानशूर व्यक्तींनी संस्थेला मदत करावी.                                                                                                                                     -दिलीप गुंजाळ, संस्थापक, मानवसेवा प्रकल्प. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक