शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

मन्याळे घाटात वणवा पेटला

By admin | Updated: May 5, 2016 00:02 IST

अकोले : अज्ञानापोटी तालुक्यातील डोंगर- टेकड्यांवरील जंगल वणव्यांमुळे जळत असून काळवंडलेल्या वनातील जंगलसंपत्ती व वन्यजीव धोक्यात आले आहे.

अकोले : अज्ञानापोटी तालुक्यातील डोंगर- टेकड्यांवरील जंगल वणव्यांमुळे जळत असून काळवंडलेल्या वनातील जंगलसंपत्ती व वन्यजीव धोक्यात आले आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ब्राम्हणवाडा-मन्याळे घाटात वणवा पेटला आणि वन जळून खाक झाले. वणव्याची धग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येवून पोहोचली. वन विभाग शांत असून कारवाईचा बडगा का उचलला जात नाही? असा सवाल पुढे आला आहे. लाल्या डोंगर, वारंगीचा डोंगर, कोंभाळणे, मुथाळणे घाट, काताळापूर-माळेगाव डोंगर, बाभुळवंडी-खिरविरेचा चोमदेव डोंगर येथील जंगल वणव्याच्या भक्षस्थानी पडले असून गवतकाडी जळून खाक झाली आहे. उंच वाढलेली काही झाडे बचावली आहेत. तर वनातील ससे, मोर व अन्य वन्यजीव दिसेनासे झाले आहेत. लाखो रुपये खर्चून वनविभागाने जाळपट्टे काढले आहेत. यामुळे वनवे कमी होण्यास मदत होत असली तरी ‘वनातील गवत जाळले तर गवताचा चांगला फुटवा होतो’ असा समज ग्रामीण भागात आहे. म्हणून कृत्रिम वनवे पेटत असावे, असा वन विभागाचा अंदाज आहे. आग रात्री लागते मग कारवाई कुणावर करायची, असा प्रश्न नेहमीच असतो. रात्री जंगलांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सध्या वन कर्मचाऱ्यांचा मुक्काम गच्चीवर किंवा घराच्या छतावरच असल्याचे वन कर्मचारी सांगतात. १५ ते २० जणांची टोळी वन विझवण्यासाठी सध्या सज्ज आहे. वन पेटले की मोबाईलवरुन एकमेकांना कळविले जाते, मग आग विझवण्याची धडपड सुरू होते, असे वन कर्मचारी सांगतात. (तालुका प्रतिनिधी)