शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

शंभर कॅबिनेट होऊनही धनगर समाजाला आरक्षण नाही - सुप्रिया सुळे

By admin | Updated: May 31, 2017 16:18 IST

धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. भाजप सरकारने आरक्षणाचे गाजर दाखवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर अभ्यासाचे कारण देत आरक्षणास टाळाटाळ केली

 

 

लोकमत न्यूज नेटवर्क

 

जामखेड (अहमदनगर) : धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. भाजप सरकारने आरक्षणाचे गाजर दाखवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर अभ्यासाचे कारण देत आरक्षणास टाळाटाळ केली. बारामतीत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. परंतु त्यानंतर शंभर कॅबिनेट झाल्या तरी आरक्षणाचा निर्णय झाला नाही,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपा सरकारवर केली. खा. सुप्रियाताई सुळे यांनी चौंडीत येऊन पुण्यश्लोक अहल्यादेवी यांचे दर्शन घेऊन नक्षत्र उद्यानाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, महीला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, सरचिटणीस सोमनाथ धूत, राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, राजेंद्र कोठारी उपस्थित होते. खा.सुळे म्हणाल्या, सरकार तीन वर्षांपासून अभ्यास करत आहे मात्र अद्यापही आरक्षणाचा निर्णय घेता आलेला नाही. सरकारचे अपयश झाकण्यासाठी शिवार संवाद यात्रा सुरू केली आहे. या भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. सरकार शेतक-यांना हमी भाव देण्याऐवजी जाहिरातींवर खर्च करीत आहे. हा खर्च कमी केल्यास हमी भाव देणे शक्य होईल. आघाडी सरकारने अहल्यादेवींचे जन्मगाव चौंडी येथे विकासासाठी तेरा कोटीचा निधी देऊन पर्यटन स्थळाचा दर्जा दिला, असेही सुळे म्हणाल्या. अद्ययावतग्रंथालय सुरू करण्याबाबत माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांना सुचना दिल्या.