शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

जाण्याची सोय नाही..राहण्याचीही सोय नाही...प्रशासन ढिम्म, तारकपूर बसस्थानकात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 16:01 IST

अहमदनगर : परप्रांतात एस.टी. बसेस बंद झाल्याने एक हजारांच्यावर परप्रांतीय नागरिक अहमदनगरमध्ये अडकले आहेत. त्यातील काही नागरिक, मजूरांनी तारकपूर बसस्थानक परिसरात ठाण मांडले. राहण्याची किंवा जाण्याची तरी सोय करा, अशी ते विनवणी करीत आहेत. मात्र बाराशे लोक झाल्याशिवाय रेल्वेची व्यवस्था करणे शक्य नसल्याने या परप्रांतीय नागरिकांचे नगरमध्ये हाल सुरू झाले आहेत. 

अहमदनगर : परप्रांतात एस.टी. बसेस बंद झाल्याने एक हजारांच्यावर परप्रांतीय नागरिक अहमदनगरमध्ये अडकले आहेत. त्यातील काही नागरिक, मजूरांनी तारकपूर बसस्थानक परिसरात ठाण मांडले. राहण्याची किंवा जाण्याची तरी सोय करा, अशी ते विनवणी करीत आहेत. मात्र बाराशे लोक झाल्याशिवाय रेल्वेची व्यवस्था करणे शक्य नसल्याने या परप्रांतीय नागरिकांचे नगरमध्ये हाल सुरू झाले आहेत. आजपर्यंत एस. टी. महामंडळाच्या बसेसद्वारे तसेच रेल्वेद्वारे परप्रांतीय नागरिकांची त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र आजही अनेक परप्रांतीय नागरिक अडकलेले आहेत. सुपा, बोल्हेगाव, नागापूर, नेवासा, तसेच जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहुन तब्बल एक हजार नागरिक नगरमध्ये दाखल झालेले आहेत. त्यातील अनेक नागरिक गुरुवारी तारकपूर बसस्थानक परिसरात जमा झाले होते. स्नेहालयातर्फे त्यांना तेथे नाश्ता, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, अशी आर्त हाक ते देत आहेत. मात्र प्रशासनाने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. अशा नागरिकांची नगर शहरात गर्दी वाढली तर नगरला आणखी कोरोनाचा धोका होऊ शकतो, अशी सध्याची परिस्थिती आहे.दरम्यान सर्व नागरिकांची व्यवस्था महापालिकेने करावी. त्यांना भोजन, चहा, नाश्ता देण्याची आम्ही व्यवस्था करू, असे स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले. मात्र महापालिकेकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. निवारा केंद्रात गर्दी झाली आहे. तेथे जागा नाही. त्यामुळे त्यांची सध्या राहण्याची व्यवस्था करू शकत नसल्याची हतबलता महापालिकेने व्यक्त केली. अ‍ॅड. श्याम असावा यांनी सर्व नागरिकांना प्रशासकीय पूर्तता करून पाठविण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन नागरिकांना भेटून दिले.परप्रांतीय नागरिक दिवसभर तारकपूर बसस्थानकात होतो. सायंकाळी सहानंतर तारकपूर स्थानक बंद होणार आहे. नागरिकांनी बसस्थानकाच्या बाहेर जावे, असे फर्मान एस.टी. चे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे या नागरिकांचा सहानंतर कुठे जायचे? हाच खरा प्रश्न आहे.