शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

जाण्याची सोय नाही..राहण्याचीही सोय नाही...प्रशासन ढिम्म, तारकपूर बसस्थानकात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 16:01 IST

अहमदनगर : परप्रांतात एस.टी. बसेस बंद झाल्याने एक हजारांच्यावर परप्रांतीय नागरिक अहमदनगरमध्ये अडकले आहेत. त्यातील काही नागरिक, मजूरांनी तारकपूर बसस्थानक परिसरात ठाण मांडले. राहण्याची किंवा जाण्याची तरी सोय करा, अशी ते विनवणी करीत आहेत. मात्र बाराशे लोक झाल्याशिवाय रेल्वेची व्यवस्था करणे शक्य नसल्याने या परप्रांतीय नागरिकांचे नगरमध्ये हाल सुरू झाले आहेत. 

अहमदनगर : परप्रांतात एस.टी. बसेस बंद झाल्याने एक हजारांच्यावर परप्रांतीय नागरिक अहमदनगरमध्ये अडकले आहेत. त्यातील काही नागरिक, मजूरांनी तारकपूर बसस्थानक परिसरात ठाण मांडले. राहण्याची किंवा जाण्याची तरी सोय करा, अशी ते विनवणी करीत आहेत. मात्र बाराशे लोक झाल्याशिवाय रेल्वेची व्यवस्था करणे शक्य नसल्याने या परप्रांतीय नागरिकांचे नगरमध्ये हाल सुरू झाले आहेत. आजपर्यंत एस. टी. महामंडळाच्या बसेसद्वारे तसेच रेल्वेद्वारे परप्रांतीय नागरिकांची त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र आजही अनेक परप्रांतीय नागरिक अडकलेले आहेत. सुपा, बोल्हेगाव, नागापूर, नेवासा, तसेच जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहुन तब्बल एक हजार नागरिक नगरमध्ये दाखल झालेले आहेत. त्यातील अनेक नागरिक गुरुवारी तारकपूर बसस्थानक परिसरात जमा झाले होते. स्नेहालयातर्फे त्यांना तेथे नाश्ता, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, अशी आर्त हाक ते देत आहेत. मात्र प्रशासनाने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. अशा नागरिकांची नगर शहरात गर्दी वाढली तर नगरला आणखी कोरोनाचा धोका होऊ शकतो, अशी सध्याची परिस्थिती आहे.दरम्यान सर्व नागरिकांची व्यवस्था महापालिकेने करावी. त्यांना भोजन, चहा, नाश्ता देण्याची आम्ही व्यवस्था करू, असे स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले. मात्र महापालिकेकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. निवारा केंद्रात गर्दी झाली आहे. तेथे जागा नाही. त्यामुळे त्यांची सध्या राहण्याची व्यवस्था करू शकत नसल्याची हतबलता महापालिकेने व्यक्त केली. अ‍ॅड. श्याम असावा यांनी सर्व नागरिकांना प्रशासकीय पूर्तता करून पाठविण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन नागरिकांना भेटून दिले.परप्रांतीय नागरिक दिवसभर तारकपूर बसस्थानकात होतो. सायंकाळी सहानंतर तारकपूर स्थानक बंद होणार आहे. नागरिकांनी बसस्थानकाच्या बाहेर जावे, असे फर्मान एस.टी. चे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे या नागरिकांचा सहानंतर कुठे जायचे? हाच खरा प्रश्न आहे.