शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

मुंबई-लातूर मार्गालगतच्या फूटपाथ, भुयारी गटारी नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST

श्रीगोंदा : मुंबई-लातूर राष्ट्रीय महामार्गाचा आराखडा करतानाच श्रीगोंदा शहरातील फूटपाथ, भुयारी गटारीचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे नगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक ...

श्रीगोंदा : मुंबई-लातूर राष्ट्रीय महामार्गाचा आराखडा करतानाच श्रीगोंदा शहरातील फूटपाथ, भुयारी गटारीचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे नगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक आक्रमक झाले आहेत. अंदाजपत्रकात फूटपाथ, भुयारी गटार कामाचा समावेश करण्याची मागणी केली जात आहे.

याबाबत श्रीगोंदा येथील पंचायत समितीच्या सभागृहात आ. बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, तालुका गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, मनोहर पोटे, बापू गोरे, संग्राम घोडके, राजू लोखंडे, सतीश मखरे, प्रशांत गोरे, संतोष क्षीरसागर आदी उपस्थित होते.

मुंबई-लातूर महामार्गाचे काम सध्या पहिल्या टप्प्यात न्हावरा ते आढळगावदरम्यान सुरू आहे. श्रीगोंदा शहरातून १० किमी लांबीचा हा रस्ता जातो. त्यातील चार किमी रस्ता मुख्य बाजारातून पेठेतून जात आहे.

स्टेशन रोड ते औटेवाडीदरम्यान चौपदरी रस्ता होणार आहे. हा रस्ता नगरपालिकेने अगोदरच चौपदरी केला आहे. त्यावर मजबुतीकरण व काँक्रिटीकरण केले जाणार आहे. पथदिवे, दुभाजक जुनेच राहणार आहेत. सरस्वती नदीवरील पुलांचे मजबुतीकरण होणार आहे.

भुयारी गटार व फूटपाथ नसल्याने वाहतुकीस अडथळा येणार आहे. त्यामुळे फूटपाथ व भुयारी गटारीचे नियोजन करा, अशी मागणी प्रशांत गोरे यांनी केली.

आ. बबनराव पाचपुते यांनी सुधारित कामाचे अंदाजपत्रक व जागा मोजणी करून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे प्रस्ताव पाठवा. त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

----

सुधारित अहवाल पाठविणार

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप तारडे म्हणाले, भुयारी गटार, फूटपाथबाबत वरिष्ठांना सुधारित अहवाल पाठवणार आहे. मात्र, आराखड्यात भुयारी गटार, फूटपाथचे नियोजन नाही. येथील रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे.