शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

...तर समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करून दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:20 IST

शिर्डी : तुम्ही स्वत:ला महाविकास आघाडीचे राज्याचे नेते समजता, तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा, ...

शिर्डी : तुम्ही स्वत:ला महाविकास आघाडीचे राज्याचे नेते समजता, तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा, असे थेट आव्हान माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांचे नाव न घेता दिले. कालपर्यंत निळवंडे प्रश्नावरून आम्हाला बदनाम करणारी मंडळी आता उशिरा का होईना कालव्यांच्या कामाबाबत खरे बोलू लागलेत. त्यांच्या तालावर झेंडे घेऊन नाचणाऱ्यांनी आता तरी डोळे उघडावीत, असा सल्लाही विखे यांनी दिला.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी आ. राधाकृष्ण विखे बोलत होते. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब म्हस्के, खा.डॉ. सुजय विखे पाटील, बाळासाहेब भवर, नंदू राठी, डॉ. भास्करराव खर्डे, विश्वासराव कडू, कैलास तांबे, रामभाऊ भुसाळ, अण्णासाहेब कडू, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे याप्रसंगी उपस्थित होते. कारखान्याचे सभासद ऑनलाइन पद्धतीने या सभेत सहभागी झाले होते. विविध विषयांचे ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

आ. विखे यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळेच सहकारी साखर कारखानदारीला भविष्यात चांगले दिवस येणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्यांबाबत दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांचा सकारात्मक परिणाम भविष्यात निश्चित दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विखे कारखान्याने भविष्यात ७ लाख मेट्रिक टनाचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी उपलब्ध पाण्याचा वापर करावा लागणार असला तरी आपला पाण्याचा संघर्ष कमी झालेला नाही. कारण समन्यायी पाणी वाटपाचे भूत या जिल्ह्याच्या मानगुटीवर अनेक वर्षे बसले आहे. त्यावेळी सत्तेत बसलेल्या मंडळींनी जिल्ह्यातील पाणी वाहून जात असतानासुद्धा शब्द काढला नाही. सत्ता गेल्यानंतर पाणी देण्यास विरोध करू लागले. आता सत्ता तुमच्याच ताब्यात आहे. समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करण्याची जबाबदारी आता तुमची आहे, असे विखे म्हणाले.

...

‘त्यांना’ नव्या नेतृत्वाची भीती होती

वर्षानुवर्षे रखडलेल्या निळवंडे धरण कालव्यांच्या कामांची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच झाली. मागील १० वर्षे ही कामे धरणाच्या मुखापासून सुरू होऊ शकली नाहीत. काहींना ही कामे सुरू होऊ द्यायची नव्हती. कारण कालव्यांची कामे झाली असती, तर त्यांच्या तालुक्यात पाणी आले असते. दुसरा कारखाना उभा राहिला असता, नवे नेतृत्व उभे राहिले असते, याची भीती त्यांना होती, अशी टीकाही आमदार राधाकृष्ण विखे यांनी थोरात यांच्यावर केली.