शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

...तर समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करून दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:20 IST

शिर्डी : तुम्ही स्वत:ला महाविकास आघाडीचे राज्याचे नेते समजता, तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा, ...

शिर्डी : तुम्ही स्वत:ला महाविकास आघाडीचे राज्याचे नेते समजता, तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा, असे थेट आव्हान माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांचे नाव न घेता दिले. कालपर्यंत निळवंडे प्रश्नावरून आम्हाला बदनाम करणारी मंडळी आता उशिरा का होईना कालव्यांच्या कामाबाबत खरे बोलू लागलेत. त्यांच्या तालावर झेंडे घेऊन नाचणाऱ्यांनी आता तरी डोळे उघडावीत, असा सल्लाही विखे यांनी दिला.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी आ. राधाकृष्ण विखे बोलत होते. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब म्हस्के, खा.डॉ. सुजय विखे पाटील, बाळासाहेब भवर, नंदू राठी, डॉ. भास्करराव खर्डे, विश्वासराव कडू, कैलास तांबे, रामभाऊ भुसाळ, अण्णासाहेब कडू, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे याप्रसंगी उपस्थित होते. कारखान्याचे सभासद ऑनलाइन पद्धतीने या सभेत सहभागी झाले होते. विविध विषयांचे ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

आ. विखे यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळेच सहकारी साखर कारखानदारीला भविष्यात चांगले दिवस येणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्यांबाबत दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांचा सकारात्मक परिणाम भविष्यात निश्चित दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विखे कारखान्याने भविष्यात ७ लाख मेट्रिक टनाचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी उपलब्ध पाण्याचा वापर करावा लागणार असला तरी आपला पाण्याचा संघर्ष कमी झालेला नाही. कारण समन्यायी पाणी वाटपाचे भूत या जिल्ह्याच्या मानगुटीवर अनेक वर्षे बसले आहे. त्यावेळी सत्तेत बसलेल्या मंडळींनी जिल्ह्यातील पाणी वाहून जात असतानासुद्धा शब्द काढला नाही. सत्ता गेल्यानंतर पाणी देण्यास विरोध करू लागले. आता सत्ता तुमच्याच ताब्यात आहे. समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करण्याची जबाबदारी आता तुमची आहे, असे विखे म्हणाले.

...

‘त्यांना’ नव्या नेतृत्वाची भीती होती

वर्षानुवर्षे रखडलेल्या निळवंडे धरण कालव्यांच्या कामांची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच झाली. मागील १० वर्षे ही कामे धरणाच्या मुखापासून सुरू होऊ शकली नाहीत. काहींना ही कामे सुरू होऊ द्यायची नव्हती. कारण कालव्यांची कामे झाली असती, तर त्यांच्या तालुक्यात पाणी आले असते. दुसरा कारखाना उभा राहिला असता, नवे नेतृत्व उभे राहिले असते, याची भीती त्यांना होती, अशी टीकाही आमदार राधाकृष्ण विखे यांनी थोरात यांच्यावर केली.