शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

...तर इतर पक्षांचा सुपडा साफ होईल, राजेंद्र नागवडे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

श्रीगोंदा : काँग्रेस पक्षाला त्याग आणि देशसेवेची परंपरा आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि आपल्या राज्याला वैभवशाली बनवले आहे. ...

श्रीगोंदा : काँग्रेस पक्षाला त्याग आणि देशसेवेची परंपरा आहे. काँग्रेस पक्षाने देश आणि आपल्या राज्याला वैभवशाली बनवले आहे. या वैभवशाली राज्याची धुरा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर दिली तर इतर पक्षांचा सुपडा साफ होईल, असे मत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले.

श्रीगोंदा येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या काँग्रेस बळकटीकरण कार्यक्रमात नागवडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार लहू कानडे म्हणाले, जाती-धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना फडकवून भाजपने सत्ता काबीज केली. मोदी सरकारने एलएआयसी, रेल्वे, विमानतळ विकायला काढली आहेत. त्यामुळे देशाच्या विकासाचा दर ढासळला आहे.

आमदार सुधीर तांबे म्हणाले, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने निष्ठा, तत्व असलेले नेतृत्व मिळाले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाशी आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या जनतेशी बांधिलकी व संवाद ठेवला तर देशात सत्तांतर होऊ शकते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, बाबासाहेब भोस, आदेश शेंडगे यांनीही मनोगत व्यक्त केलेे.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, अरुण पाचपुते, समीर बोरा, बाबासाहेब इथापे, धनसिंग भोयटे, सुरेश लोखंडे, सतीश मखरे, हेमंत नलगे, राजेश लोखंडे, सीमा गोरे, निसार बेपारी, संतोष कोथिंबिरे, सुरेखा लकडे, गयाबाई सुपेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. अशोक रोडे यांनी केले तर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी आभार मानले.