शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

...तर डॉ. सुजय विखे, सदाशिव लोखंडे यांची खासदारकी जाणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 16:24 IST

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी, तसेच पराभूत उमेदवारांनी २२ जूनपर्यंत अंतिम निवडणूक खर्च सादर करावा, अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची ...

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी, तसेच पराभूत उमेदवारांनी २२ जूनपर्यंत अंतिम निवडणूक खर्च सादर करावा, अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल, असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यमान खासदारांची धावपळ उडाली आहे.नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखेंसह मतदारसंघातील १९ उमेदवार व शिर्डी लोकसभा मतदार संघातील खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह एकूण २० उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या खर्च नियंत्रक कक्षाने खर्चाबाबत बजावले. निवडणूक खर्च निरीक्षक अजित मिश्रा यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभेचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची निवडणूक खर्चाबाबत बैठक झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, नोडल अधिकारी अनारसे, महेश घोडके यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.निवडणूक खर्च निरीक्षक मिश्रा यांनी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे खर्चाबाबत सूचना केल्या. या उमेदवारांना निवडणूक निकालानंतर ३० दिवसांच्या आत उर्वरित खर्च निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे. हा खर्च सादर न केल्यास उमेदवाराला पुढील निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. तसेच विजयी उमेदवारांना अपात्र ठरविले जाईल असेही त्यांनी सांगितले.नगर मतदार संघातील उमेदवारांनी १८एप्रिलपर्यंत खर्च सादर केला असून, १९ उमेदवारांपैकी सर्वाधिक खर्च भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी (५१ लाख ८९ हजार २८९) केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनीही ४२ लाख ४० हजार ८४६ रुपये खर्च केला. या १९ उमेदवारांपैकी खर्चाच्या बाबतीत विखे अव्वल ठरले असून दोन्ही पक्षाने हा खर्च मान्य केला असल्याचे सांगण्यात आले.शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी करण्यात आली होती. १९ एप्रिलपर्यंत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च ३० लाख ८ हजार ६७३ रुपए आहे. तर लोखंडे यांनी घोषित केलेला खर्च २४ लाख ८३ हजार ४९८ रुपये आहे. याशिवाय काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी आतापर्यंत ३ लाख ८४ हजार ३३९ रुपये निवडणूक खर्च झाल्याचे घोषित केले आहे. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने परिगणित केल्यानुसार कांबळे यांचा खर्च ८ लाख ८ हजार ६४४ रुपये झाला आहे. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, भाकपचे उमेदवार बन्सी सातपुते, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांचा खर्चसुद्धा एक लाखांच्या पुढे गेला आहे.नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी निवडणूक विभागाने स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. यामध्ये उमेदवाराला ७० लाखांची खर्च मर्यादा घालून दिली होती. या मर्यादेच्या अधिन राहून उमेदवारांनी १८ एप्रिलपर्यंत खर्च सादर केला आहे. आता या उमेदवारांना २२ जूनपर्यंत आपला अंतिम निवडणूक खर्च आयोगाकडे सादर करावा लागणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय