शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'त्या' कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई; जिल्हा परिषद प्रशासनाचा स्पष्ट शब्दांत इशारा

By चंद्रकांत शेळके | Updated: February 8, 2024 16:31 IST

बदलीत सवलत घेऊनही अद्याप केली नाही प्रमाणपत्र पडताळणी

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला तरी बदलीत सवलत घेतलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्राची अद्याप पडताळणी केलेली नाही. तसेच विभागप्रमुखांनी त्यांची नोंद खातेपुस्तकात घेतलेली नाही. त्यामुळे आता सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागप्रमुखांना स्मरणपत्र काढून अंतिम मुदत दिली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत कार्यवाहीबाबत अहवाल न पाठवल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया मे २०२३ मध्ये पार पडली. मात्र, या बदल्यांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र, तसेच परितक्त्या प्रमाणपत्र सादर करून बदलीत सवलत घेतली. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवला. तसेच काही तक्रारीही झाल्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सक्त ताकीद देत बदल्यांसाठी कोणी बनावट कागदपत्रे दिली तर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.

तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी बदल्यांत सवलत घेतली अशा दिव्यांग उमेदवारांनी त्यांची प्रमाणपत्रे पुण्यातील ससून रुग्णालयाकडून पडताळणी करून आणावीत, तसेच परितक्त्या, घटस्फोटिता यांनी त्यांच्या स्वयंघोषणापत्राची पडताळणी ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेकडून पडताळणी करून घ्यावी. तसेच त्याबाबतची नोंद कर्माचाऱ्यांच्या सेवापुस्तकात करावी, असे आदेश काढले होते. हे आदेश काढून आता नऊ महिन्यांचा कालावधी उलटला तरी बहुतांश कर्मचाऱ्यांनी अद्याप ही पडताळणीच केलेली नाही. तसेच सेवापुस्तकात नोंदही झालेली नाही. त्यामुळे आता सीईओंनी याची गंभीर दखल घेत शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहेे.

१५ फेब्रुवारीची डेडलाईन

बदलीत सूट घेतलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्यांनी प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली नाही. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने पहिले पत्र ८ मे २०२३ रोजी काढले. पुन्हा दुसरे पत्र १३ जुलै २०२३ रोजी काढून सेवापुस्तकात नोंदी घेण्याबाबत कळवले. परंतु, बहुतांश कर्मचाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली. तसेच विभागप्रमुखांनीही याचा आढावा घेतला नाही. त्यामुळे आता पुन्हा पत्र काढून प्रमाणपत्रांची पडताळणी व सेवापुस्तकात नोंद करून विभागप्रमुखांनी विलंबाच्या कारणासह १५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल पाठवावा, अन्यथा संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर