शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाट्यांवरून गाव अन् मराठी भाषाही गायब; एवढेच नाही तर मैलाचे दगडही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 07:51 IST

महामार्गावर किंवा ग्रामीण भागात प्रवास करताना प्रवासी अनेकदा अनोळखी ठिकाणी पोहोचतात. अशावेळी समोर दिसणाऱ्या दुकानांच्या पाट्यांवर गावाचा उल्लेख नसल्याने ते कोणत्या गावात आहेत, हे समजत नाही.

- अरुण वाघमोडे

लोकमत न्यूज नेटवर्कअहिल्यानगर : प्रवास करताना प्रत्येक गावाची ओळख सहज होण्यासाठी दुकाने, हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापनांवर लावण्यात येणाऱ्या पाट्यांवर गावाच्या नावाचा उल्लेख असणे महत्त्वाचे आहे. मात्र, महाराष्ट्रातील बहुतांश भागांत अपवाद वगळता गावाच्या नावाचा उल्लेख दिसत नाही. तसेच पाट्या मराठीत आणि देवनागरी लिपीत असाव्यात, असा शासनाचा नियम असतानाही सर्वत्र इंग्रजी अक्षरांतील पाट्याच झळकताना दिसतात.

महामार्गावर किंवा ग्रामीण भागात प्रवास करताना प्रवासी अनेकदा अनोळखी ठिकाणी पोहोचतात. अशावेळी समोर दिसणाऱ्या दुकानांच्या पाट्यांवर गावाचा उल्लेख नसल्याने ते कोणत्या गावात आहेत, हे समजत नाही. तसेच इंग्रजी पाट्या वाचता न येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा गैरसोयीचा सामना करावा लागतो.

नियम काय सांगतो?महाराष्ट्र शासनाच्या २०२२ च्या आदेशानुसार सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि व्यापारी संकुलांवरील पाट्या मराठीत आणि देवनागरी लिपीत असाव्यात. मात्र, या नियमाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही.नियमांसंदर्भात महापालिका २ आणि स्थानिक प्रशासनाने विशेष पथके तयार करून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात याबाबत कोणतीही ठोस अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक व्यावसायिक पाट्यांबाबतच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत.

मैलाचे दगडही गायबमैलाचा दगड म्हणजे रस्त्याच्या कडेला लावलेला एक क्रमांकित मार्कर. यावर गावाचे नाव आणि अंतराचा उल्लेख असतो. मात्र, बहुतांशी रस्त्यांवरील असे मैलाचे दगड गायब झालेले दिसतात. नवीन रस्ता तयार झाल्यानंतर बांधकाम विभागाच्या वतीने दिशादर्शक फलक लावले जातात. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यावरील हे फलकही दिसत नाहीत. परिणामी, प्रवाशांना गुगल मॅपवर गाव शोधावे लागते किंवा स्थानिक लोकांकडे गाव कोणते अशी विचारणा करावी लागते. विशेषतः रात्रीच्या वेळेस किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसताना ही समस्या अधिक जाणवते.