शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

किती मुडदे पाडायचे, याचा विचार सरकारणे करावा; मनोज जरांगे यांनी घेतली जखमी मराठा बांधवाची भेट

By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 18, 2023 15:04 IST

सचिन धर्मापुरीकर कोपरगाव (जि. अहमदनगर) : आरक्षणाच्या वेदना घेऊन आलेले मराठा बांधव जखमी झाले आहेत. आरक्षणासाठी यापूर्वी ४५ जणांचे ...

सचिन धर्मापुरीकर

कोपरगाव (जि. अहमदनगर) : आरक्षणाच्या वेदना घेऊन आलेले मराठा बांधव जखमी झाले आहेत. आरक्षणासाठी यापूर्वी ४५ जणांचे बळी गेलेले आहेत. सरकारला आजून किती बळी घ्यायचे आहेत, किती मुडदे पाडायचेत, याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे. मात्र २४ तारखेनंतर आरक्षण  घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी कोपरगाव येथे अचानक भेट दिल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा दिला.

मनोज जरांगे यांच्या येवला (जि. नाशिक) येथील सभेच्या वेळी फुलांची उधळण करताना जेसीबीच्या बकेटमधून पडल्याने दोन मराठा समाज बांधव जखमी झाले होते. पैकी  गोकूळ कदम (रा. नेवरगाव, ता. येवला) यांना उपचारार्थ कोपरगाव येथील एसजेएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी रात्री  बाराच्या सुमारास जरांगे पाटील कोपरगाव येथे आले होते. रात्रीच्या वेळीही मराठा समाज  बांधवांनी त्यांचे उत्स्फुर्त स्वागत केले. 

यावेळी जरांगे पाटील म्हणाले, जे जखमी झालेत त्यांच्या वेदना वाया जाऊ द्यायच्या नाहीत. आम्हाला आरक्षण दिल्यास वेदना सहन करण्याची वेळ येणार नाही. मागील ७० वर्षापासूनच्या सरकारचे पाप आम्हाला भोगायची वेळ आली आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढील आंदोलनाची दिशा २२ रोजी जाहिर करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

आरक्षणाविरूद्ध बोलणारांना सोडणार नाही

'त्यांनी' आता बोलायचे सोडले आहे, 'ते' आरक्षणावर बोलले की, आम्हीही सुरू होणार. 'तेच' नाही, कोणीही असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारांना सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भूजबळ यांचे नाव न घेता इतरांनाही दिला.