शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

जिल्हा परिषद बदल्यांवर आता शिक्षक मतदारसंघ आचारसंहितेचे सावट

By चंद्रकांत शेळके | Updated: May 15, 2024 22:19 IST

सेवाज्येष्ठता याद्या तयार, बदल्या प्रक्रिया जुलैमध्ये जाण्याची शक्यता

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदा लोकसभा व नंतर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक आचारसंहितेमुळे थेट जुलैमध्ये जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक वगळता गट क व गट ड) बदल्यांची प्रक्रिया राबवली जाते.

दरवर्षी कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागलेले असतात. २०२३च्या बदल्या ९ मे पासून सुरू झाल्या होत्या. यंदा मात्र लोकसभेची निवडणूक असल्याने बदल्यांचा कालावधी पुढे गेला आहे. ४ जूनला लोकसभेचा निकाल आहे. त्यानंतरच बदल्या होणार अशी स्थिती होती. मात्र, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वारे लगेच वाहू लागले आहेत. १० जूनला शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूक घेण्याचे आयोगाने ८ मे रोजी जाहीर केेले होते. परंतु, निवडणूक उन्हाळी सुटीनंतर घ्या, अशी मागणी शिक्षकांनी केल्याने तूर्तास ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

१५ जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यानंतर २५ ते ३० जूनदरम्यान पुन्हा शिक्षक व पदवीधर निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता आहे. त्याची आचारसंहिता २५ मेच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. तसे झाले तर बदल्यांची प्रक्रिया थेट जुलैमध्ये जाण्याची शक्यता आहे.

प्रशासनाची तयारी पूर्ण

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने बदल्यांची सर्व तयारी करण्याच्या सूचना खातेप्रमुख व सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. ५ एप्रिल रोजी सामान्य प्रशासन विभागाने तसे पत्र काढले होते. १४ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत बदल्यांबाबतची सर्व पूर्वतयारी करायची आहे. यात कार्यालयप्रमुखांनी १५ ते २१ एप्रिलपर्यंत त्यांच्या स्तरावर संवर्गनिहाय कर्मचारी सेवाज्येष्ठता यादी तयारी करावी. तसेच त्यावर हरकती घेऊन ही यादी अंतिम करावी. २२ एप्रिलपासून २९ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी दिलेले विकल्प, विनंती अर्ज विहीत कागदपत्रांसह खातेप्रमुखांकडे सादर करावे, ३० एप्रिल रोजी या विकल्प व अर्जांची छाननी करून माहिती अद्ययावत करावी व जिल्हास्तरावर संवर्गनिहाय खातेप्रमुखांकडे माहिती सादर करावी, असे या पत्रात म्हटले होते. त्यानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता याद्या व इतर तयारी प्रशासनाने केली आहे.

शिक्षक बदल्यांबाबतही संभ्रम

शिक्षक बदली धोरणानुसार शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधीच शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया उरकणे अपेक्षित आहे. १५ जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. परंतु आचारसंहितेमुळे त्याआधी शिक्षकांची बदल्यांची प्रक्रिया होणे शक्य नाही. त्यामुळे यंदा बदल्या होणारी की नाही याबाबतही शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जूनअखेर होण्याची शक्यता आहे. लोकसभेची आचारसंहिता संपली की शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे यंदा शिक्षकांच्या बदल्यांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCode of conductआचारसंहिता