शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जिल्हा परिषद बदल्यांवर आता शिक्षक मतदारसंघ आचारसंहितेचे सावट

By चंद्रकांत शेळके | Updated: May 15, 2024 22:19 IST

सेवाज्येष्ठता याद्या तयार, बदल्या प्रक्रिया जुलैमध्ये जाण्याची शक्यता

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदा लोकसभा व नंतर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक आचारसंहितेमुळे थेट जुलैमध्ये जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक वगळता गट क व गट ड) बदल्यांची प्रक्रिया राबवली जाते.

दरवर्षी कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागलेले असतात. २०२३च्या बदल्या ९ मे पासून सुरू झाल्या होत्या. यंदा मात्र लोकसभेची निवडणूक असल्याने बदल्यांचा कालावधी पुढे गेला आहे. ४ जूनला लोकसभेचा निकाल आहे. त्यानंतरच बदल्या होणार अशी स्थिती होती. मात्र, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वारे लगेच वाहू लागले आहेत. १० जूनला शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूक घेण्याचे आयोगाने ८ मे रोजी जाहीर केेले होते. परंतु, निवडणूक उन्हाळी सुटीनंतर घ्या, अशी मागणी शिक्षकांनी केल्याने तूर्तास ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

१५ जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यानंतर २५ ते ३० जूनदरम्यान पुन्हा शिक्षक व पदवीधर निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता आहे. त्याची आचारसंहिता २५ मेच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. तसे झाले तर बदल्यांची प्रक्रिया थेट जुलैमध्ये जाण्याची शक्यता आहे.

प्रशासनाची तयारी पूर्ण

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने बदल्यांची सर्व तयारी करण्याच्या सूचना खातेप्रमुख व सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. ५ एप्रिल रोजी सामान्य प्रशासन विभागाने तसे पत्र काढले होते. १४ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत बदल्यांबाबतची सर्व पूर्वतयारी करायची आहे. यात कार्यालयप्रमुखांनी १५ ते २१ एप्रिलपर्यंत त्यांच्या स्तरावर संवर्गनिहाय कर्मचारी सेवाज्येष्ठता यादी तयारी करावी. तसेच त्यावर हरकती घेऊन ही यादी अंतिम करावी. २२ एप्रिलपासून २९ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी दिलेले विकल्प, विनंती अर्ज विहीत कागदपत्रांसह खातेप्रमुखांकडे सादर करावे, ३० एप्रिल रोजी या विकल्प व अर्जांची छाननी करून माहिती अद्ययावत करावी व जिल्हास्तरावर संवर्गनिहाय खातेप्रमुखांकडे माहिती सादर करावी, असे या पत्रात म्हटले होते. त्यानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता याद्या व इतर तयारी प्रशासनाने केली आहे.

शिक्षक बदल्यांबाबतही संभ्रम

शिक्षक बदली धोरणानुसार शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधीच शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया उरकणे अपेक्षित आहे. १५ जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. परंतु आचारसंहितेमुळे त्याआधी शिक्षकांची बदल्यांची प्रक्रिया होणे शक्य नाही. त्यामुळे यंदा बदल्या होणारी की नाही याबाबतही शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जूनअखेर होण्याची शक्यता आहे. लोकसभेची आचारसंहिता संपली की शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे यंदा शिक्षकांच्या बदल्यांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCode of conductआचारसंहिता