शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

तनपुरे साखर कारखाना पुन्हा व्हेन्टिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 14:45 IST

राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा पुन्हा व्हॅन्टिलेटरवर आहे. दोन गळीत हंगामानंतर आर्थिक संकटात सापडलेला कारखाना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याकडून खासदार डॉ़ सुजय विखे यांच्या ताब्यात आला. विखे यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन वर्षांपूर्वी कारखाना सुरू केला. मात्र यंदा राहुरी तालुक्यात ऊस नसल्याने कारखाना बंद ठेवावा लागला आहे.

भाऊसाहेब येवले ।  राहुरी : महाराष्ट्रात ऐके काळी दबदबा असलेला राहुरी येथील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा पुन्हा व्हॅन्टिलेटरवर आहे. दोन गळीत हंगामानंतर आर्थिक संकटात सापडलेला कारखाना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याकडून खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ताब्यात आला. विखे यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन वर्षांपूर्वी कारखाना सुरू केला. मात्र यंदा राहुरी तालुक्यात ऊस नसल्याने कारखाना बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे राहुरीचे आर्थिकचक्र अडचणीत आले आहे.तत्कालीन अध्यक्ष रामदास पाटील धुमाळ यांनी २१०५ रूपये प्रतिटन उचांकी भाव देऊन स्पर्धा निर्माण केली होती. तनपुरे कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढत असताना सत्तांतर घडून आले. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या ताब्यात कारखान्याची सूत्रे आली. मात्र कर्जाचे ओझे न पेलावल्याने तीन गळीत हंगामानंतर कारखाना बंद पडला. त्यामुळे तनपुरे यांनी नजिकच्या काळात मोठी राजकीय किंमत मोजावी लागली. विखे यांच्या ताब्यात कारखाना आला. अनेक अडचणींवर मात करीत विखे यांनी कारखान्याचे चाक फिरविण्यात यश संपादन केले. मात्र यावर्षी तनपुरे कारखाना बंद राहिल्याने ऊस उत्पादक व कारखान्याचे कामगार यांच्यामध्ये कमालीची नाराजी उफाळून आली आहे. विखे यांनी खासदारकीची घोषणा ज्या तनपुरे कारखान्यावर केली होती. तिथेच नाराजी वाढली. १७ डिसेंबर रोजी कामगार आमरण उपोषण करणार आहेत. ऊस नसल्याने कारखाना बंद ठेवावा लागला आहे. विखे यांच्या ताब्यात सत्ता आल्यानंतर कामगारांचे साडेसतरा कोटी रूपये पगार व प्रॉव्हिडंड फंड देणे आहे. त्यापूर्वीचे ९० कोटी रूपये कामगारांचे देणे आहे. ऊस उत्पादकांचे थकीत देणे संचालक मंडळाने दिले. तनपुरे कारखान्यावर कामगार, शासकीय देणे व बँके चे कर्ज मिळून साडेतीनशे कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम देणे आहे. तनपुरे कारखान्यावरील वीज व पाणी पुरवठा बंद आहे.पुढील वर्षावर भिस्त़यंदा राहुरी तालुक्यात उसाच्या लागवडीला सुरूवात झाली आहे. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील वर्षी पुरेशा प्रमाणावर ऊस उपलब्ध होणार आहे. त्याग करणारा छोटा शेतकरी सदैव राहुरी कारखान्याचा कैवारी ठरला आहे. त्यामुळे शेतकरी ऊस देईल़ याशिवाय कामगारही मदतीचा हात देऊ शकतात. पुढील वर्षी संचालक मंडळाने नियोजन केले तर तनपुरे कारखाना यशस्वीपणे गळीत हंगाम करून शकतो.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAhmednagarअहमदनगर