शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

१२ लाख जनतेला टँकरचे पाणी

By admin | Updated: May 22, 2016 00:17 IST

अहमदनगर : उन्हाचा चढलेला पारा, कोरडे पडलेले बोअर, विहिरीतील पाण्याने गाठलेला तळ अन् कोरडी पडलेली धरणे, यामुळे अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू पाहत आहे.

अहमदनगर : उन्हाचा चढलेला पारा, कोरडे पडलेले बोअर, विहिरीतील पाण्याने गाठलेला तळ अन् कोरडी पडलेली धरणे, यामुळे अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू पाहत आहे. जिल्ह्यातील पाण्याच्या टँकरने आता ७५७ चा आकडा ओलांडला असून ५०६ पाणी योजना पाणी आटल्याने बंद पडल्या आहेत. ४७३ वाड्या आणि २ हजार ६६४ वाड्या-वस्त्यांवरील १२ लाख १२ हजार जनतेला टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. सलग तीन वर्षांपासून असणाऱ्या दुष्काळस्थितीमुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळा आणि भंडारदरा धरणातून जायकवाडीला सोडण्यात आलेल्या पाण्याने टंचाईच्या परिस्थितीत वाढ झाली आहे. त्यात मे महिन्यात सूर्य आग ओकत असल्याने ज्या ठिकाणी विहिरी आणि बोअरवेलला पाणी होते, ते आटले आहे. मात्र, टँकर भरण्यासाठी उद्भव कमी पडत असल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. दक्षिण जिल्ह्यात त्याची तीव्रता अधिक आहे. जिल्ह्यात ४४ प्रादेशिक पाणी योजना आणि १ हजार ३७७ स्वतंत्र पाणी पुरवठा करणाऱ्या योजना आहेत. प्रादेशिकपैकी बोटावर मोजण्याइतक्या योजना कार्यान्वित आहेत. तर स्वतंत्र योजनांपैकी ५०६ योजना बंद आहेत. जिल्ह्यात पाणी आटल्याने अकोले तालुक्यातील १, संगमनेर ३२, कोपरगाव ४, राहाता २, राहुरी २, नेवासा ३८, शेवगाव १६, पाथर्डी ५४, नगर ४५, पारनेर ६३, श्रीगोंदा १०९, कर्जत ७५, जामखेड ५०६ योजना बंद आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकही टँकर सुरू नसून एकही पाणी योजना बंद नाही.