शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

१२ लाख जनतेला टँकरचे पाणी

By admin | Updated: May 22, 2016 00:17 IST

अहमदनगर : उन्हाचा चढलेला पारा, कोरडे पडलेले बोअर, विहिरीतील पाण्याने गाठलेला तळ अन् कोरडी पडलेली धरणे, यामुळे अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू पाहत आहे.

अहमदनगर : उन्हाचा चढलेला पारा, कोरडे पडलेले बोअर, विहिरीतील पाण्याने गाठलेला तळ अन् कोरडी पडलेली धरणे, यामुळे अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू पाहत आहे. जिल्ह्यातील पाण्याच्या टँकरने आता ७५७ चा आकडा ओलांडला असून ५०६ पाणी योजना पाणी आटल्याने बंद पडल्या आहेत. ४७३ वाड्या आणि २ हजार ६६४ वाड्या-वस्त्यांवरील १२ लाख १२ हजार जनतेला टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. सलग तीन वर्षांपासून असणाऱ्या दुष्काळस्थितीमुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळा आणि भंडारदरा धरणातून जायकवाडीला सोडण्यात आलेल्या पाण्याने टंचाईच्या परिस्थितीत वाढ झाली आहे. त्यात मे महिन्यात सूर्य आग ओकत असल्याने ज्या ठिकाणी विहिरी आणि बोअरवेलला पाणी होते, ते आटले आहे. मात्र, टँकर भरण्यासाठी उद्भव कमी पडत असल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. दक्षिण जिल्ह्यात त्याची तीव्रता अधिक आहे. जिल्ह्यात ४४ प्रादेशिक पाणी योजना आणि १ हजार ३७७ स्वतंत्र पाणी पुरवठा करणाऱ्या योजना आहेत. प्रादेशिकपैकी बोटावर मोजण्याइतक्या योजना कार्यान्वित आहेत. तर स्वतंत्र योजनांपैकी ५०६ योजना बंद आहेत. जिल्ह्यात पाणी आटल्याने अकोले तालुक्यातील १, संगमनेर ३२, कोपरगाव ४, राहाता २, राहुरी २, नेवासा ३८, शेवगाव १६, पाथर्डी ५४, नगर ४५, पारनेर ६३, श्रीगोंदा १०९, कर्जत ७५, जामखेड ५०६ योजना बंद आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकही टँकर सुरू नसून एकही पाणी योजना बंद नाही.