शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख जनतेला टँकरचे पाणी

By admin | Updated: May 23, 2014 01:27 IST

अहमदनगर : २१ मे अखेर जिल्ह्यात सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या वाढत १८५ वर पोहचली आहे. या टँकरव्दारे तीन लाखांहून अधिक जनतेची तहान सरकारी पाण्याच्या टँकरने भागविली जात आहे.

अहमदनगर : २१ मे अखेर जिल्ह्यात सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या वाढत १८५ वर पोहचली आहे. या टँकरव्दारे तीन लाखांहून अधिक जनतेची तहान सरकारी पाण्याच्या टँकरने भागविली जात आहे. महिनाअखेर यात आणखीन वाढ होण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केलेली आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने यंदा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ३७ कोटी ६४ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला होता. मात्र, मे महिन्यांत पाण्याची वाढलेली तीव्रता आणि पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पावणेपाच कोटींचा पुरवणी आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या आराखड्यात टँकरसाठी ३२ कोटी ११ लाख, तर पुरवणी आराखड्यात टँकरसाठी ४ कोटी ६४ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीला सव्वा लाख जनतेला पाणी पुरवठा करण्यात येत होता. १६ मे पर्यंत हा आकडा अडीच लाखांपर्यंत होता. २० मे नंतर यात वाढ होत तीन लाखांहून अधिक जनतेला सरकारी पाण्याचा पुरवठा होत आहे. सर्वाधिक टँकर पाथर्डी तालुक्यात ४२ आहेत. नगर तालुक्यात ३६, संगमनेर २९, कर्जत १५, शेवगाव आणि जामखेड प्रत्येकी १३ उर्वरित तालुक्यात कमीत एक तर जास्तीत जास्त दहापर्यंत टँकर सुरू आहेत. श्रीरामपूर, राहुरी या तालुक्यात अद्याप एकही टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आलेली नाही. या ठिकाणी किमान पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याने या ठिकाणी प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकलेला आहे. जिल्ह्यात २० गावांत पिण्याच्या पाण्यासाठी अथवा सरकारी पाण्याचे टँकर भरण्यासाठी खासगी विहिरी अधिग्रहीत केलेल्या आहेत. राहुरी तालुक्यातील कुरणवाडी योजना वीज ंिबल न भरल्याने पाच दिवस बंद होती. या योजनेला जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरूस्ती फंडातून १७ लाख रुपये देण्यात आले असून त्यामुळे शुक्रवारी योजना सुरू होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम यांनी दिली. घोसपुरी योजनेचेही पैसे भरले असल्याचे त्यांनी सांगितले.