शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

साडेचारशे प्रकरणे निकाली

By admin | Updated: April 9, 2016 23:38 IST

अहमदनगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि शहर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मासिक लोक अदालत या उपक्रमात प्रलंबित आणि खटलापूर्व अशी ४६८ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली

अहमदनगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि शहर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मासिक लोक अदालत या उपक्रमात प्रलंबित आणि खटलापूर्व अशी ४६८ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्हा न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत झाली. प्रलंबित आणि खटलापूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ही लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. प्रलंबित १ हजार ८२८ प्रकरणांपैकी ४१० प्रकरणे तडजोडीने मिटली आहेत. त्यामध्ये २ कोटी ८७ लाख ६४ हजार ४०२ रुपयांची वसुली झाली आहे. खटलापूर्व प्रकरणांची संख्या १ हजार ६४४ एवढी होती. त्यामध्ये ६८ प्रकरणे तडजोडीने मिटली आहेत. यामधून संबंधित शासकीय संस्थांची १ लाख ९८ हजार ६४ रुपयांची वसुली झाली. या प्रकरणांची सोडवणूक करण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांचे १६ पॅनल नेमण्यात आले होते. या पॅनलने दावे निकाली काढताना वादी, प्रतिवादीची मते जाणून घेत निकाल सुनावला़ या तडजोडी दोघांनीही तडजोडी मान्य केल्या़ राष्ट्रीय लोकअदालत या उपक्रमाचे शनिवारी सकाळी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष एल. बी. कचरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. एच. शेख, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील आदी उपस्थित होते.औद्योगिक न्यायालयात १२ प्रकरणे सावेडी येथील औद्योगिक व कामगार न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. तडजोडीसाठी ४१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्याद्वारे नुकसान भरपाई पोटी द्यावयाची ४ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम वसूल झाली. ती पक्षकारांना देण्यात आली. न्यायाधीश एस. एन. साळवे आणि पी. व्ही. पवार यांनी तर अ‍ॅड. सुधीर टोकेकर, अ‍ॅड. अनिरुद्ध टाक, अ‍ॅड. के. के. पगार, अ‍ॅड. अर्चना कुलासकर यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. ४या उपक्रमात कामगार व मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रलंबित प्रश्न सुटल्याने पक्षकारांनी समाधान मानले़