शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

साडेचारशे प्रकरणे निकाली

By admin | Updated: April 9, 2016 23:38 IST

अहमदनगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि शहर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मासिक लोक अदालत या उपक्रमात प्रलंबित आणि खटलापूर्व अशी ४६८ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली

अहमदनगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि शहर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मासिक लोक अदालत या उपक्रमात प्रलंबित आणि खटलापूर्व अशी ४६८ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्हा न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत झाली. प्रलंबित आणि खटलापूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ही लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. प्रलंबित १ हजार ८२८ प्रकरणांपैकी ४१० प्रकरणे तडजोडीने मिटली आहेत. त्यामध्ये २ कोटी ८७ लाख ६४ हजार ४०२ रुपयांची वसुली झाली आहे. खटलापूर्व प्रकरणांची संख्या १ हजार ६४४ एवढी होती. त्यामध्ये ६८ प्रकरणे तडजोडीने मिटली आहेत. यामधून संबंधित शासकीय संस्थांची १ लाख ९८ हजार ६४ रुपयांची वसुली झाली. या प्रकरणांची सोडवणूक करण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांचे १६ पॅनल नेमण्यात आले होते. या पॅनलने दावे निकाली काढताना वादी, प्रतिवादीची मते जाणून घेत निकाल सुनावला़ या तडजोडी दोघांनीही तडजोडी मान्य केल्या़ राष्ट्रीय लोकअदालत या उपक्रमाचे शनिवारी सकाळी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष एल. बी. कचरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. एच. शेख, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील आदी उपस्थित होते.औद्योगिक न्यायालयात १२ प्रकरणे सावेडी येथील औद्योगिक व कामगार न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. तडजोडीसाठी ४१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्याद्वारे नुकसान भरपाई पोटी द्यावयाची ४ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम वसूल झाली. ती पक्षकारांना देण्यात आली. न्यायाधीश एस. एन. साळवे आणि पी. व्ही. पवार यांनी तर अ‍ॅड. सुधीर टोकेकर, अ‍ॅड. अनिरुद्ध टाक, अ‍ॅड. के. के. पगार, अ‍ॅड. अर्चना कुलासकर यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. ४या उपक्रमात कामगार व मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रलंबित प्रश्न सुटल्याने पक्षकारांनी समाधान मानले़