शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नागरिकांच्या पत्रावर तात्काळ कार्यवाही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:46 IST

अहमदनगर : महापालिकेत सामान्य नागरिकांसह नगरसेवकांची पत्रे येतात. मात्र, त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या पत्रावर तात्काळ ...

अहमदनगर : महापालिकेत सामान्य नागरिकांसह नगरसेवकांची पत्रे येतात. मात्र, त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या पत्रावर तात्काळ कार्यवाही करण्याचा आदेश आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिला, तसेच पत्रावर केलेल्या कार्यवाहीची त्रयस्थ व्यक्तीकडून चौकशी करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.

महापालिका आयुक्त मायकलवार यांच्या उपस्थितीत विभागप्रमुखांची बुधवारी आढावा बैठक झाली. या बैठकीस मनपातील सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रभागातील विविध समस्यांबाबत संबंधित विभागाकडे पत्रव्यवहर केला जातो; परंतु त्यास उत्तर मिळत नाही, अशी नगरसेवकांची तक्रार आहे, तसेच कर वसुली प्रकरणात पालिकेकडून करदात्यांशी पत्रव्यवहार केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेत आलेल्या पत्रांवर कार्यवाही होत नसल्याने आयुक्त मायकलवारही चांगलेच संतापले. त्यांनी विभागाकडे महिनाभरात किती पत्रे आली, त्यावर काय कार्यवाही झाली, याचा आढावा घेत विभागप्रमुखांना खडेबोल सुनावले. यापुढे अशी दिरंगाई खपूवन घेणार नाही, अशी तंबीही आयुक्तांनी दिली. विभागाकडे आलेल्या प्रत्येक पत्राची नोंद घेऊन त्यावर काय कार्यवाही झाली, त्याचीही नोंद करण्याची सूचना आयुक्तांनी केली. पत्रावर कार्यवाही करण्यासाठी मुदत देण्यात आली असून, दिलेल्या मुदतीतच कार्यवाही करा, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

....

स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांचा सहभाग

महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला आहे. केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार असल्याने कुठल्या विभागाने कोणती कामे करणे आवश्यक आहे, याची माहिती तांत्रिक समितीकडून सर्व विभागप्रमुखांना देण्यात आली. त्यानुसार संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी सूचना केल्या असून, पुढील आठवड्यातील बैठकीत सदर कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

...

समन्वय नसल्याने रस्त्यांची दुरवस्था

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ड्रेनेज, पाण्याची लाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात येतात. कोणते काम केव्हा करावे, याबाबत पाणीपुरवठा व बांधकाम विभागात समन्वय नाही. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे सांगून याबाबत दोन्ही विभागांनी आपसात समन्वय ठेवावा, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.