शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या पत्रावर तात्काळ कार्यवाही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:46 IST

अहमदनगर : महापालिकेत सामान्य नागरिकांसह नगरसेवकांची पत्रे येतात. मात्र, त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या पत्रावर तात्काळ ...

अहमदनगर : महापालिकेत सामान्य नागरिकांसह नगरसेवकांची पत्रे येतात. मात्र, त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या पत्रावर तात्काळ कार्यवाही करण्याचा आदेश आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिला, तसेच पत्रावर केलेल्या कार्यवाहीची त्रयस्थ व्यक्तीकडून चौकशी करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.

महापालिका आयुक्त मायकलवार यांच्या उपस्थितीत विभागप्रमुखांची बुधवारी आढावा बैठक झाली. या बैठकीस मनपातील सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रभागातील विविध समस्यांबाबत संबंधित विभागाकडे पत्रव्यवहर केला जातो; परंतु त्यास उत्तर मिळत नाही, अशी नगरसेवकांची तक्रार आहे, तसेच कर वसुली प्रकरणात पालिकेकडून करदात्यांशी पत्रव्यवहार केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेत आलेल्या पत्रांवर कार्यवाही होत नसल्याने आयुक्त मायकलवारही चांगलेच संतापले. त्यांनी विभागाकडे महिनाभरात किती पत्रे आली, त्यावर काय कार्यवाही झाली, याचा आढावा घेत विभागप्रमुखांना खडेबोल सुनावले. यापुढे अशी दिरंगाई खपूवन घेणार नाही, अशी तंबीही आयुक्तांनी दिली. विभागाकडे आलेल्या प्रत्येक पत्राची नोंद घेऊन त्यावर काय कार्यवाही झाली, त्याचीही नोंद करण्याची सूचना आयुक्तांनी केली. पत्रावर कार्यवाही करण्यासाठी मुदत देण्यात आली असून, दिलेल्या मुदतीतच कार्यवाही करा, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

....

स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांचा सहभाग

महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला आहे. केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार असल्याने कुठल्या विभागाने कोणती कामे करणे आवश्यक आहे, याची माहिती तांत्रिक समितीकडून सर्व विभागप्रमुखांना देण्यात आली. त्यानुसार संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी सूचना केल्या असून, पुढील आठवड्यातील बैठकीत सदर कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

...

समन्वय नसल्याने रस्त्यांची दुरवस्था

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ड्रेनेज, पाण्याची लाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात येतात. कोणते काम केव्हा करावे, याबाबत पाणीपुरवठा व बांधकाम विभागात समन्वय नाही. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे सांगून याबाबत दोन्ही विभागांनी आपसात समन्वय ठेवावा, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.