शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नगरकरांचे तोंड गोड करणारी रांजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:21 IST

शेतीला पर्याय म्हणून गाव पशुपालनाकडे वळले. त्यातून दुधाचे मोठे उत्पादन होऊ लागले. त्याच दुधापासून खवा बनवण्याची परंपरा गावात साधारण ७० वर्षांपूर्वी सुरू झाली.

योगेश गुंडकेडगाव : शेतीला पर्याय म्हणून गाव पशुपालनाकडे वळले. त्यातून दुधाचे मोठे उत्पादन होऊ लागले. त्याच दुधापासून खवा बनवण्याची परंपरा गावात साधारण ७० वर्षांपूर्वी सुरू झाली. तिच परंपरा गावाने टिकवून ठेवल्याने याच खव्याच्या जीवावर सध्या गावाचे अर्थकारण फिरते आहे. या एकट्या गावात महिन्याला १२ हजार किलो खव्याचे उत्पादन होऊन गावात सुमारे २० लाखांचे उत्पन्न येते. घराघरात खवा बनविणाऱ्या भट्ट्या आहेत. तयार झालेला हाच गावरान खवा नगर शहरात विकला जातो. संपूर्ण गावाचा उदरनिर्वाह खव्यावर चालतो.नगर तालुक्यातील पूर्वेला असणाऱ्या गर्भगिरी डोंगराच्या कुशीत हे गाव रांजणासारखे खोलगट आकाराचे बनले आहे. डोंगरकुशीत शेतीला जास्त वाव नसल्याने येथील लोक पशुपालनाकडे वळले. त्यातून दुधाचे मोठे उत्पादन सुरू झाले. याच दुधापासून खवा तयार करण्याचा व्यवसाय घराघरात सुरू झाला. ७० वर्षांपूर्वी वाहतुकीची साधने नसल्याने खवा विकण्यासाठी येथील लोक तो डोक्यावर घेऊन पायी नगरला विक्रीसाठी येत. नंतर सायकलींचा वापर सुरू झाला. आता वाहतुकीची साधने उपलब्ध झाल्याने रोजचा तयार झालेला ताजा खवा नगर शहरात विक्रीसाठी येतो. रांजणीच्या खव्याला शहरातच नाही तर पुण्या मुंबईला सुद्धा मागणी असल्याने येथील खवा लगेच विकला जातो.गावात साधारण ८० टक्के कुटुंबे खवा घरीच तयार करतात. गायीच्या दुधापासून तयार झालेला खवा गुलाबजामून बनविण्यासाठी तर म्हशीच्या दुधापासून तयार झालेल्या खव्याचा उपयोग पेढे, बर्फी बनविण्यासाठी केला जातो. खवा बनविण्याची प्रथा प्रत्येक घरात असल्याने सारे गाव याच कामात गुंतले आहे. गावात साधारण ४०० किलो खव्याचे दररोज उत्पादन होते. महिन्याला १२ हजार किलो खवा गावात तयार होतो.सध्या १६० ते २०० रूपयांपर्यंत भाव आहे. लग्नसराईत हेच दर वाढतात. यातून गावाला महिन्याला साधारण २० लाखांचे उत्पन्न मिळते.आमच्या आजोबांच्या काळापासून आम्ही घरी खवा तयार करतो. दररोज आम्ही १० ते १५ किलो खव्याचे उत्पादन घेतो. त्यातून रोजचे किमान २ हजार रूपयांचे उत्पन्न मिळते. यासाठी मात्र साºया घराला राबावे लागते.- -ईश्वर जरे, खवा उत्पादक शेतकरी,रांजणी.नैसर्गिकरीत्या येथे खवा तयार केला जातो. यात कोणीच कसलीही भेसळ करीत नाही. यामुळे येथील खव्याची चव इतर खव्यापेक्षा वेगळी व अस्सल गावरान आहे. सारे गाव खवा तयार करण्याचा व्यवसाय करते. यामुळे गावाचे अर्थकारण खव्यावर अवलंबून आहे.-बाळासाहेब चेमटे, सरपंच ,रांजणी.असा तयार होतो खवाघरात साधी भट्टी तयार करून त्यात लाकडाचा जाळ तयार केला जातो. मोठी कढई भट्टीवर ठेऊन त्यात दूध आटविले जाते. गायीच्या ५ लिटर दुधापासून १ किलो खवा तयार होतो. तर म्हशीच्या ३ लिटर दुधापासून १ किलो खवा तयार होतो. यासाठी घरातील मनुष्यबळ दिवसभर राबत असते. खवा बनविण्यासाठी यंत्र आले असले तरी गावकरी साध्या पारंपरिक पद्धतीनेच खवा तयार करतात.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर