शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अपघातग्रस्तांना मदत : शासन देणार बक्षीस, जिल्ह्यातून पहिला प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 11:17 IST

अपघातग्रस्तांना मदत केली तर नाहक पोलिसांची कटकट मागे लागेल या मानसिकतेतून बहुतांशी जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्यांकडे कानाडोळा करून पुढे जातात.  एमआयडीसी पोलिसांनी मात्र अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे अशी शिफारस करत एक सकारात्मक संदेश दिला आहे.

अहमदनगर : अपघातग्रस्तांना मदत केली तर नाहक पोलिसांची कटकट मागे लागेल या मानसिकतेतून बहुतांशी जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्यांकडे कानाडोळा करून पुढे जातात.  एमआयडीसी पोलिसांनी मात्र अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे अशी शिफारस करत एक सकारात्मक संदेश दिला आहे.नगर तालुक्यातील शिंगवेनाईक येथे २५ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता शिर्डी येथून नगरच्या दिशेने येणाºया प्रवासी बसचा अपघात झाला. ही बस रस्त्यावरच आडवी पडल्याने यामध्ये ३४ प्रवासी अडकून पडले़ यातील बहुतांशी जण गंभीर जखमी झालेले होते. ही घटना समजताच शिंगवे नाईक येथील सरपंच सुनील को-हाळे, उपसरपंच सुनील जाधव यांच्यासह विजय जाधव, रावसाहेब जाधव व अनिल डोळस हे तत्काळ घटनास्थळी आले. या ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. तसेच याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह सहाय्यक निरीक्षक गोरे, सहाय्यक फौजदार गोसावी, कॉन्स्टेबल ढाकणे, काळे, गावडे, पांढरकर, मणिकेरी व कोळपे शिंगवेनाईक येथे दाखल झाले़ यावेळी ग्रामस्थ व पोलीस पथकाने बसमध्ये अडकलेल्या ३४ प्रवाशांना बाहेर काढले़ जखमींना नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जे प्रवासी जखमी झाले नव्हते त्यांची शिंगवे नाईक येथे तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. क्रेनद्वारे रस्त्यात पडलेली बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातसमयी तत्काळ मदत कार्य करून जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणा-या या पाच ग्रामस्थांना शासनाच्या अध्यादेशानुसार मदत मिळावी, असा प्रस्ताव सहाय्यक निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला आहे. अधीक्षकांमार्फत हा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. अशी आहे बक्षीस योजनाअपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत यासाठी शासनाने २०१४ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार अपघातग्रस्तांना मदत करणा-या व्यक्ती, संस्था, समूह यांना ५० हजार ते दीड लाख रूपयांपर्यंत बक्षीस देण्यात येते. अपघात घडल्यानंतर एक महिन्याच्या आत बक्षिसाची मागणी करणारा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, वाहतूक शाखेचे निरीक्षक यांच्यामार्फत पाठविणे बंधनकारक आहे. प्रस्ताव गेल्यानंतर मार्च अखेरपर्यंत शासनाकडून संबंधितांना हे बक्षीस दिले जाते. अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने बहुतांशी जणांचा रस्त्यावरच प्राण जातो. अपघाताची घटना निदर्शनास आल्यानंतर तेथून जाणा-या प्रवाशांनी अथवा परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, जखमींना मदत करावी, त्यांना रूग्णालयात दाखल करावे अशी अपेक्षा असते. बहुतांशी जण अशावेळी मदतही करतात तर काही नागरिक मदत करत नाहीत. अशा घटनांबाबत समाजात एक सकारात्मक संदेश जावा, अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी अपघातग्रस्तांना मदत करणा-या शिंगवेनाईक येथील ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे, यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.- विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी ठाणे 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस