शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

अपघातग्रस्तांना मदत : शासन देणार बक्षीस, जिल्ह्यातून पहिला प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 11:17 IST

अपघातग्रस्तांना मदत केली तर नाहक पोलिसांची कटकट मागे लागेल या मानसिकतेतून बहुतांशी जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्यांकडे कानाडोळा करून पुढे जातात.  एमआयडीसी पोलिसांनी मात्र अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे अशी शिफारस करत एक सकारात्मक संदेश दिला आहे.

अहमदनगर : अपघातग्रस्तांना मदत केली तर नाहक पोलिसांची कटकट मागे लागेल या मानसिकतेतून बहुतांशी जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्यांकडे कानाडोळा करून पुढे जातात.  एमआयडीसी पोलिसांनी मात्र अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे अशी शिफारस करत एक सकारात्मक संदेश दिला आहे.नगर तालुक्यातील शिंगवेनाईक येथे २५ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता शिर्डी येथून नगरच्या दिशेने येणाºया प्रवासी बसचा अपघात झाला. ही बस रस्त्यावरच आडवी पडल्याने यामध्ये ३४ प्रवासी अडकून पडले़ यातील बहुतांशी जण गंभीर जखमी झालेले होते. ही घटना समजताच शिंगवे नाईक येथील सरपंच सुनील को-हाळे, उपसरपंच सुनील जाधव यांच्यासह विजय जाधव, रावसाहेब जाधव व अनिल डोळस हे तत्काळ घटनास्थळी आले. या ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. तसेच याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह सहाय्यक निरीक्षक गोरे, सहाय्यक फौजदार गोसावी, कॉन्स्टेबल ढाकणे, काळे, गावडे, पांढरकर, मणिकेरी व कोळपे शिंगवेनाईक येथे दाखल झाले़ यावेळी ग्रामस्थ व पोलीस पथकाने बसमध्ये अडकलेल्या ३४ प्रवाशांना बाहेर काढले़ जखमींना नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जे प्रवासी जखमी झाले नव्हते त्यांची शिंगवे नाईक येथे तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. क्रेनद्वारे रस्त्यात पडलेली बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातसमयी तत्काळ मदत कार्य करून जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणा-या या पाच ग्रामस्थांना शासनाच्या अध्यादेशानुसार मदत मिळावी, असा प्रस्ताव सहाय्यक निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला आहे. अधीक्षकांमार्फत हा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. अशी आहे बक्षीस योजनाअपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत यासाठी शासनाने २०१४ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार अपघातग्रस्तांना मदत करणा-या व्यक्ती, संस्था, समूह यांना ५० हजार ते दीड लाख रूपयांपर्यंत बक्षीस देण्यात येते. अपघात घडल्यानंतर एक महिन्याच्या आत बक्षिसाची मागणी करणारा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, वाहतूक शाखेचे निरीक्षक यांच्यामार्फत पाठविणे बंधनकारक आहे. प्रस्ताव गेल्यानंतर मार्च अखेरपर्यंत शासनाकडून संबंधितांना हे बक्षीस दिले जाते. अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने बहुतांशी जणांचा रस्त्यावरच प्राण जातो. अपघाताची घटना निदर्शनास आल्यानंतर तेथून जाणा-या प्रवाशांनी अथवा परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, जखमींना मदत करावी, त्यांना रूग्णालयात दाखल करावे अशी अपेक्षा असते. बहुतांशी जण अशावेळी मदतही करतात तर काही नागरिक मदत करत नाहीत. अशा घटनांबाबत समाजात एक सकारात्मक संदेश जावा, अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी अपघातग्रस्तांना मदत करणा-या शिंगवेनाईक येथील ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे, यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.- विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी ठाणे 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस