शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

अपघातग्रस्तांना मदत : शासन देणार बक्षीस, जिल्ह्यातून पहिला प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 11:17 IST

अपघातग्रस्तांना मदत केली तर नाहक पोलिसांची कटकट मागे लागेल या मानसिकतेतून बहुतांशी जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्यांकडे कानाडोळा करून पुढे जातात.  एमआयडीसी पोलिसांनी मात्र अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे अशी शिफारस करत एक सकारात्मक संदेश दिला आहे.

अहमदनगर : अपघातग्रस्तांना मदत केली तर नाहक पोलिसांची कटकट मागे लागेल या मानसिकतेतून बहुतांशी जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्यांकडे कानाडोळा करून पुढे जातात.  एमआयडीसी पोलिसांनी मात्र अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे अशी शिफारस करत एक सकारात्मक संदेश दिला आहे.नगर तालुक्यातील शिंगवेनाईक येथे २५ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता शिर्डी येथून नगरच्या दिशेने येणाºया प्रवासी बसचा अपघात झाला. ही बस रस्त्यावरच आडवी पडल्याने यामध्ये ३४ प्रवासी अडकून पडले़ यातील बहुतांशी जण गंभीर जखमी झालेले होते. ही घटना समजताच शिंगवे नाईक येथील सरपंच सुनील को-हाळे, उपसरपंच सुनील जाधव यांच्यासह विजय जाधव, रावसाहेब जाधव व अनिल डोळस हे तत्काळ घटनास्थळी आले. या ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. तसेच याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह सहाय्यक निरीक्षक गोरे, सहाय्यक फौजदार गोसावी, कॉन्स्टेबल ढाकणे, काळे, गावडे, पांढरकर, मणिकेरी व कोळपे शिंगवेनाईक येथे दाखल झाले़ यावेळी ग्रामस्थ व पोलीस पथकाने बसमध्ये अडकलेल्या ३४ प्रवाशांना बाहेर काढले़ जखमींना नगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जे प्रवासी जखमी झाले नव्हते त्यांची शिंगवे नाईक येथे तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. क्रेनद्वारे रस्त्यात पडलेली बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातसमयी तत्काळ मदत कार्य करून जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणा-या या पाच ग्रामस्थांना शासनाच्या अध्यादेशानुसार मदत मिळावी, असा प्रस्ताव सहाय्यक निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला आहे. अधीक्षकांमार्फत हा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. अशी आहे बक्षीस योजनाअपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत यासाठी शासनाने २०१४ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार अपघातग्रस्तांना मदत करणा-या व्यक्ती, संस्था, समूह यांना ५० हजार ते दीड लाख रूपयांपर्यंत बक्षीस देण्यात येते. अपघात घडल्यानंतर एक महिन्याच्या आत बक्षिसाची मागणी करणारा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, वाहतूक शाखेचे निरीक्षक यांच्यामार्फत पाठविणे बंधनकारक आहे. प्रस्ताव गेल्यानंतर मार्च अखेरपर्यंत शासनाकडून संबंधितांना हे बक्षीस दिले जाते. अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने बहुतांशी जणांचा रस्त्यावरच प्राण जातो. अपघाताची घटना निदर्शनास आल्यानंतर तेथून जाणा-या प्रवाशांनी अथवा परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, जखमींना मदत करावी, त्यांना रूग्णालयात दाखल करावे अशी अपेक्षा असते. बहुतांशी जण अशावेळी मदतही करतात तर काही नागरिक मदत करत नाहीत. अशा घटनांबाबत समाजात एक सकारात्मक संदेश जावा, अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी अपघातग्रस्तांना मदत करणा-या शिंगवेनाईक येथील ग्रामस्थांना शासनाकडून बक्षीस मिळावे, यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.- विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी ठाणे 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस