शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाला संघटनांचाही पाठिंबा

By | Updated: December 8, 2020 04:18 IST

टाळेबंदी काळात शेतकरी विरोधात केलेल्या कायद्यामुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हे काळे कायदे रद्द होण्यासाठी सर्व शेतकरी ...

टाळेबंदी काळात शेतकरी विरोधात केलेल्या कायद्यामुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हे काळे कायदे रद्द होण्यासाठी सर्व शेतकरी एकवटले असून, त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत मंगळवारचा देशव्यापी संप यशस्वी करण्यात येणार आहे. या संपासाठी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, आयटकचे अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, किसान सभेचे अ‍ॅड. बन्सी सातपुते, कॉ. एल. एम. डांगे, कॉ. बाबा आरगडे, सिटूचे कॉ. महेबूब सय्यद, संताराम लोणकर, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, राजेंद्र लांडे, प्रशांत म्हस्के, श्रमिक शेतकरी संघटनेचे राजेंद्र बावके, जीवन सुरडे, मनपा कर्मचारी युनियनचे अनंत लोखंडे, साखर कामगार युनियनचे आनंद वायकर, विडी कामगार युनियनच्या भारती न्यालपेल्ली, शिक्षकेत्तर संघटनेचे भाऊसाहेब थोटे, अंगणवाडी सेविका संघटनेच्या शोभा तरोटे आदि प्रयत्नशील आहेत.

-------------

संपासाठी नगर जिल्ह्यासह राज्य आणि देशभर विविध संघटनांनी, राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. पालेभाज्या, फळे, दूध तसेच इतर पुरवठा बंद करण्यासह बाजार समित्याही बंद ठेवण्याबाबत आवाहन केले आहे. याशिवाय शहरातील इतर बाजारपेठा आणि वाहतूकही बंद ठेवण्याबाबत आवाहन केले असून सर्वांनी या बंदला पाठिंबा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी संघटनांसह इतर पदाधिकारी तहसीलदार किंवा आपापल्या स्थानिक प्रशासनाला केंद्र शासनाच्या निषेधाचे निवेदन देतील.

- डॉ. अजित नवले, सरचिटणीस, भारतीय किसान सभा

--------------------

भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नाही. नवीन कायदे रद्द झाल्यास शेतकरी व्यापारस्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होईल. दिल्लीतील आंदोलन पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या फायद्याचे असले तरी देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. सरकारने या आंदोलनाच्या दबावामुळे नवीन कृषी सुधारणा कायदे मागे घेतले तर पुढील पन्नास वर्षे तरी कोणताही राजकीय पक्ष शेती व्यापाराला स्वातंत्र्य देण्याचे धाडस करणार नाही. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समित्या व एमएसपी सुरू राहणार आहे, मग आता आंदोलन सुरु ठेवण्याचे कारण नाही. कायदेच रद्द करा ही मागणी अत्यंत चुकीची आहे.

- अनिल घनवट, अध्यक्ष, शेतकरी संघटना