शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पोलीस अधीक्षकांनी केली वाळूतस्करांची नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 11:40 IST

जिल्ह्यातील गुन्हेगारीचे मूळ ठरणाऱ्या वाळूतस्करांना जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी चांगलाच चाप लावला आहे़

अहमदनगर : जिल्ह्यातील गुन्हेगारीचे मूळ ठरणाऱ्या वाळूतस्करांना जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी चांगलाच चाप लावला आहे़ नदीपात्रासह रस्त्यांवर दिवसरात्र पेट्रोलिंग वाढवून वाळूतस्करांची नाकाबंदी केली आहे़ अवैध वाळूउपसा करताना कुणी आढळले तर कडक कारवाई केली जात असल्याने सध्या जिल्ह्यातील वाळूतस्कर अंडरग्राउंड झाले आहेत़सिंधू यांनी नगरचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम त्यांनी जिल्ह्यातील अवैध वाळूउपशाबाबत माहिती संकलित केली़ आॅक्टोबर २०१८ पासून जिल्ह्यातील एकाही वाळूठेक्याचा अधिकृत लिलाव झालेला नसताना खुलेआम वाळूतस्करी होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली़ याबाबत सिंधू यांनी जिल्ह्यातील वाळूतस्करी बंद करण्याचे पोलिसांना आदेश दिले़ ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळूतस्करी आढळून येईल तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली़ अधीक्षकांच्या या आदेशामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी वाळूतस्करांचा चक्का जाम केला आहे़अवैध वाळूउपसा व वाहतूक करताना कुणी आढळून आले तर थेट कारवाई केली जात आहे़ वाळूतस्करीविरोधात पोलिसांनीसुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे वाळूतस्कर चांगलेच धास्तावले आहेत़वाळूतस्करीविरोधात ‘लोकमत’ची मोहीमजिल्ह्यातील वाळूतस्करीविरोधात ‘लोकमत’ने गेल्या दोन वर्षांपासून वृत्तमालिका प्रकाशित करून या विषयाला वाचा फोडली आहे़ वाळूतस्करीमुळे उजाड झालेले नदीपात्र, पर्यावरणाचा ºहास, खालावलेली पाणीपातळी, वाळूतस्करांकडून वारंवार ग्रामस्थ व महसूल पथकांवर होणारे हल्ले, वाळूवाहतूक करणाºया वाहनांमुळे झालेले अपघात ते वाळूतस्करांमुळे जिल्ह्यात एकूणच वाढलेली गुन्हेगारी यावर प्रकाश टाकला आहे़कोरड्या नदीपात्रांवर आता पोलिसांचा वॉचउन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच नदीपात्र कोरडे होतात़ कोरडे पडलेल्या नदीपात्रात वाळूउपसा करण्यासाठी तस्करांची झुंबड उडायची़ स्थानिक पोलीस आणि महसूल विभागातील अधिकारीही याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करायचे़ त्यामुळे नदीपात्रात खडक लागेपर्यंत हे तस्कर वाळूउपसा करून पर्यावरणाचा मोठा ºहास करत होते़ गेल्या महिनाभरापासून पोलिसांनी नदीपात्र परिसरात पेट्रोलिंग वाढविल्याने वाळूउपसा थांबला आहे़पोलीस अधिकाऱ्यांनी लिहून दिले प्रतिज्ञापत्रवाळूतस्करीत भागिदारी अथवा वाळूतस्करांशी कुणा पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचे हितसंबंध आढळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे़ काही पोलीस अधिकाºयांनी तर पोलीस अधीक्षकांना प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे़ ‘आमचा व आमच्या नातेवाईकांचा वाळू वाहतुकीशी काहीही संबंध नाही तसेच माझ्या वा माझ्या नातेवाईकांच्या नावावर असलेले वाहन वाळू वाहतुकीसाठी वापरले जात नाही’ अशा आशयाचा मजकूर या प्रतिज्ञापत्रात आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस