शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

संडे स्पेशल मुलाखत : वाळू उपसा हवा, पण प्रमाणात - बी.एन.शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 15:48 IST

सध्या जिल्ह्यातील नद्यांतून प्रचंड वाळूउपसा सुरू आहे.

चंद्रकांत शेळकेसध्या जिल्ह्यातील नद्यांतून प्रचंड वाळूउपसा सुरू आहे. याचा थेट परिणाम पाण्याची पातळी खालावून दुष्काळावर होत आहे. त्यामुळे या वाळूउपशाचे दुष्परिणाम, उपाय, तसेच पर्यावरणावर होणारे परिणाम यासंदर्भात हवामानतज्ज्ञ व पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. बी. एन. शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद.प्रश्न : वाळूउपशामुळे पर्यावरणावर काय परिणाम होतो?उत्तर : वाळूउपसा करणे गैर नाही. परंतु तो प्रमाणात हवा. पुराचे पाणी नदीपात्रातून बाहेर जाऊ नये म्हणून आवश्यक वाळूउपसा करून नदीची खोली प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणारे अतिप्रमाणातील पाणी सहज पुढे जाण्यास मदत होते. परंतु वाळूचा अतिउपसा पर्यावरणाला घातक आहे. वाळूमध्ये नदीपात्रातील पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे आवश्यक वाळू पात्रात असेल तर पावसाळ्यात येणारे पाणी वाळूतून परिसरातील विहिरी, बंधाऱ्यांत साठते. तसेच जमिनीखालची पाणीपातळी राखून ठेवली जाते. नदीत वाळूच नसेल तर येणारे पाणी सरळ पुढे निघून जाईल. परिणामी नदीपात्राशेजारील परिसरातील पाणी पातळी खालावेल. नगर जिल्ह्यातून गोदावरी, मुळा, प्रवरा, घोड, भीमा अशा मोठ्या नद्या वाहतात. त्यातील वाळूमुळे परिसरातील पाणीपातळी नेहमी इतर भागापेक्षा जास्तच असते. परंतु जर अतिवाळूउपसा झाला तर या भागातील पाणी इतर भागापेक्षा एकदम कमी होते.प्रश्न : वाळूउपशामुळे निसर्गावर थेट परिणाम होतो का?उत्तर : वाळूउपशामुळे निसर्गावर थेट परिणाम होतो. वाळूउपशामुळे नदीपात्रातील ईको सिस्टीम विस्कळीत होते. उदा. नदीतील मासे, खेकडे, साप वाळूउपशातून उद्ध्वस्त होतात. त्यामुळे त्यांची अन्नसाखळी तुटते. हे किटक किंवा प्राणी नष्ट झाल्याने त्याचा परिणाम परिसरातील पिकांवर रोगराई पडण्यावर होतो. त्यामुळे हे प्राणी जगले पाहिजेत. त्याचा शेतकºयांना फायदाच आहे.प्रश्न : वाळूला काही पर्याय आहे का?उत्तर : वाळूचा उपयोग बांधकामासाठीच होतो. सध्या ग्रामीण भागात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वाळू वापरली जाते. परंतु शहरी भागात बांधकामासाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. वाळूऐवजी खडकापासून तयार केलेली भुकटी (क्रश सँड) बांधकामात वापरली जाते. याशिवाय बगॅसपासून तयार केलेले ब्लॉकही वापरात आहेत. त्यामुळे भिंती उष्णतारोधक बनतात आणि त्याचे वजनही कमी असते. पूर्वी मोठ्या प्रमाणात लाकूडतोड व्हायची व या लाकडाचा वापर जळणासाठी व्हायचा. परंतु गेल्या दहा वर्षांत घरगुती गॅसचे प्रमाण वाढल्याने सध्या लाकूडतोड आपोआपच आटोक्यात आली आहे. तसे वाळूचे हे पर्याय आणखी मोठ्या प्रमाणात वापरले गेले तर वाळूउपसाही आपसूकच आटोक्यात येईल.प्रश्न : भारताबाहेरही वाळूचा उपयोग होतो का?उत्तर : भारताबाहेर वाळूचा उपयोग होतो, मात्र त्याचे प्रमाण खूप कमी आहे. जपानसारख्या देशात तर वाळू वापरलीच जात नाही. तेथे भूकंपाचे प्रमाण जास्त आहे. वाळूच्या भिंती जड असतात. त्यामुळे जपान किंवा इतर भूकंपप्रवण देशांमध्ये बांधकामात वाळूऐवजी स्टील किंवा लाकडाच्या लगद्यापासून तयार केलेल्या विटांचा वापर करतात.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय