शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

संडे स्पेशल मुलाखत : वाळू उपसा हवा, पण प्रमाणात - बी.एन.शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 15:48 IST

सध्या जिल्ह्यातील नद्यांतून प्रचंड वाळूउपसा सुरू आहे.

चंद्रकांत शेळकेसध्या जिल्ह्यातील नद्यांतून प्रचंड वाळूउपसा सुरू आहे. याचा थेट परिणाम पाण्याची पातळी खालावून दुष्काळावर होत आहे. त्यामुळे या वाळूउपशाचे दुष्परिणाम, उपाय, तसेच पर्यावरणावर होणारे परिणाम यासंदर्भात हवामानतज्ज्ञ व पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. बी. एन. शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद.प्रश्न : वाळूउपशामुळे पर्यावरणावर काय परिणाम होतो?उत्तर : वाळूउपसा करणे गैर नाही. परंतु तो प्रमाणात हवा. पुराचे पाणी नदीपात्रातून बाहेर जाऊ नये म्हणून आवश्यक वाळूउपसा करून नदीची खोली प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणारे अतिप्रमाणातील पाणी सहज पुढे जाण्यास मदत होते. परंतु वाळूचा अतिउपसा पर्यावरणाला घातक आहे. वाळूमध्ये नदीपात्रातील पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे आवश्यक वाळू पात्रात असेल तर पावसाळ्यात येणारे पाणी वाळूतून परिसरातील विहिरी, बंधाऱ्यांत साठते. तसेच जमिनीखालची पाणीपातळी राखून ठेवली जाते. नदीत वाळूच नसेल तर येणारे पाणी सरळ पुढे निघून जाईल. परिणामी नदीपात्राशेजारील परिसरातील पाणी पातळी खालावेल. नगर जिल्ह्यातून गोदावरी, मुळा, प्रवरा, घोड, भीमा अशा मोठ्या नद्या वाहतात. त्यातील वाळूमुळे परिसरातील पाणीपातळी नेहमी इतर भागापेक्षा जास्तच असते. परंतु जर अतिवाळूउपसा झाला तर या भागातील पाणी इतर भागापेक्षा एकदम कमी होते.प्रश्न : वाळूउपशामुळे निसर्गावर थेट परिणाम होतो का?उत्तर : वाळूउपशामुळे निसर्गावर थेट परिणाम होतो. वाळूउपशामुळे नदीपात्रातील ईको सिस्टीम विस्कळीत होते. उदा. नदीतील मासे, खेकडे, साप वाळूउपशातून उद्ध्वस्त होतात. त्यामुळे त्यांची अन्नसाखळी तुटते. हे किटक किंवा प्राणी नष्ट झाल्याने त्याचा परिणाम परिसरातील पिकांवर रोगराई पडण्यावर होतो. त्यामुळे हे प्राणी जगले पाहिजेत. त्याचा शेतकºयांना फायदाच आहे.प्रश्न : वाळूला काही पर्याय आहे का?उत्तर : वाळूचा उपयोग बांधकामासाठीच होतो. सध्या ग्रामीण भागात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वाळू वापरली जाते. परंतु शहरी भागात बांधकामासाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. वाळूऐवजी खडकापासून तयार केलेली भुकटी (क्रश सँड) बांधकामात वापरली जाते. याशिवाय बगॅसपासून तयार केलेले ब्लॉकही वापरात आहेत. त्यामुळे भिंती उष्णतारोधक बनतात आणि त्याचे वजनही कमी असते. पूर्वी मोठ्या प्रमाणात लाकूडतोड व्हायची व या लाकडाचा वापर जळणासाठी व्हायचा. परंतु गेल्या दहा वर्षांत घरगुती गॅसचे प्रमाण वाढल्याने सध्या लाकूडतोड आपोआपच आटोक्यात आली आहे. तसे वाळूचे हे पर्याय आणखी मोठ्या प्रमाणात वापरले गेले तर वाळूउपसाही आपसूकच आटोक्यात येईल.प्रश्न : भारताबाहेरही वाळूचा उपयोग होतो का?उत्तर : भारताबाहेर वाळूचा उपयोग होतो, मात्र त्याचे प्रमाण खूप कमी आहे. जपानसारख्या देशात तर वाळू वापरलीच जात नाही. तेथे भूकंपाचे प्रमाण जास्त आहे. वाळूच्या भिंती जड असतात. त्यामुळे जपान किंवा इतर भूकंपप्रवण देशांमध्ये बांधकामात वाळूऐवजी स्टील किंवा लाकडाच्या लगद्यापासून तयार केलेल्या विटांचा वापर करतात.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय