शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत : वाळू उपसा हवा, पण प्रमाणात - बी.एन.शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 15:48 IST

सध्या जिल्ह्यातील नद्यांतून प्रचंड वाळूउपसा सुरू आहे.

चंद्रकांत शेळकेसध्या जिल्ह्यातील नद्यांतून प्रचंड वाळूउपसा सुरू आहे. याचा थेट परिणाम पाण्याची पातळी खालावून दुष्काळावर होत आहे. त्यामुळे या वाळूउपशाचे दुष्परिणाम, उपाय, तसेच पर्यावरणावर होणारे परिणाम यासंदर्भात हवामानतज्ज्ञ व पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. बी. एन. शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद.प्रश्न : वाळूउपशामुळे पर्यावरणावर काय परिणाम होतो?उत्तर : वाळूउपसा करणे गैर नाही. परंतु तो प्रमाणात हवा. पुराचे पाणी नदीपात्रातून बाहेर जाऊ नये म्हणून आवश्यक वाळूउपसा करून नदीची खोली प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणारे अतिप्रमाणातील पाणी सहज पुढे जाण्यास मदत होते. परंतु वाळूचा अतिउपसा पर्यावरणाला घातक आहे. वाळूमध्ये नदीपात्रातील पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे आवश्यक वाळू पात्रात असेल तर पावसाळ्यात येणारे पाणी वाळूतून परिसरातील विहिरी, बंधाऱ्यांत साठते. तसेच जमिनीखालची पाणीपातळी राखून ठेवली जाते. नदीत वाळूच नसेल तर येणारे पाणी सरळ पुढे निघून जाईल. परिणामी नदीपात्राशेजारील परिसरातील पाणी पातळी खालावेल. नगर जिल्ह्यातून गोदावरी, मुळा, प्रवरा, घोड, भीमा अशा मोठ्या नद्या वाहतात. त्यातील वाळूमुळे परिसरातील पाणीपातळी नेहमी इतर भागापेक्षा जास्तच असते. परंतु जर अतिवाळूउपसा झाला तर या भागातील पाणी इतर भागापेक्षा एकदम कमी होते.प्रश्न : वाळूउपशामुळे निसर्गावर थेट परिणाम होतो का?उत्तर : वाळूउपशामुळे निसर्गावर थेट परिणाम होतो. वाळूउपशामुळे नदीपात्रातील ईको सिस्टीम विस्कळीत होते. उदा. नदीतील मासे, खेकडे, साप वाळूउपशातून उद्ध्वस्त होतात. त्यामुळे त्यांची अन्नसाखळी तुटते. हे किटक किंवा प्राणी नष्ट झाल्याने त्याचा परिणाम परिसरातील पिकांवर रोगराई पडण्यावर होतो. त्यामुळे हे प्राणी जगले पाहिजेत. त्याचा शेतकºयांना फायदाच आहे.प्रश्न : वाळूला काही पर्याय आहे का?उत्तर : वाळूचा उपयोग बांधकामासाठीच होतो. सध्या ग्रामीण भागात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वाळू वापरली जाते. परंतु शहरी भागात बांधकामासाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. वाळूऐवजी खडकापासून तयार केलेली भुकटी (क्रश सँड) बांधकामात वापरली जाते. याशिवाय बगॅसपासून तयार केलेले ब्लॉकही वापरात आहेत. त्यामुळे भिंती उष्णतारोधक बनतात आणि त्याचे वजनही कमी असते. पूर्वी मोठ्या प्रमाणात लाकूडतोड व्हायची व या लाकडाचा वापर जळणासाठी व्हायचा. परंतु गेल्या दहा वर्षांत घरगुती गॅसचे प्रमाण वाढल्याने सध्या लाकूडतोड आपोआपच आटोक्यात आली आहे. तसे वाळूचे हे पर्याय आणखी मोठ्या प्रमाणात वापरले गेले तर वाळूउपसाही आपसूकच आटोक्यात येईल.प्रश्न : भारताबाहेरही वाळूचा उपयोग होतो का?उत्तर : भारताबाहेर वाळूचा उपयोग होतो, मात्र त्याचे प्रमाण खूप कमी आहे. जपानसारख्या देशात तर वाळू वापरलीच जात नाही. तेथे भूकंपाचे प्रमाण जास्त आहे. वाळूच्या भिंती जड असतात. त्यामुळे जपान किंवा इतर भूकंपप्रवण देशांमध्ये बांधकामात वाळूऐवजी स्टील किंवा लाकडाच्या लगद्यापासून तयार केलेल्या विटांचा वापर करतात.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय