शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत : राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा धूळ चारू : भानुदास बेरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:15 IST

गत लोकसभा निवडणुकीत देशाने मोदी लाट पाहिली आहे. यावेळेस तर ही लाट अधिक तीव्र आहे.

अहमदनगर : गत लोकसभा निवडणुकीत देशाने मोदी लाट पाहिली आहे. यावेळेस तर ही लाट अधिक तीव्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला याही निवडणुकीत आम्ही धुळ चारु, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.तुम्ही कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे गेलात?मोदी व फडणवीस सरकारने जनहिताच्या अनेक योजना राबविल्या. राष्टÑीय महामार्ग, जलसिंचन, जलयुक्त शिवार, आरोग्य, शेती या क्षेत्रात भरीव कामे झाले. राष्टÑीय सुरक्षिततेच्या मुद्यावर मोदी सरकारने ठाम भूमिका घेतली. हे सर्व मुद्दे आम्ही प्रचारात जनतसमोर मांडले आहेत. मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान हवेत हा आमचा प्रमुख मुद्दा होता.तुमची प्रचाराची पद्धत काय होती?आम्ही सुरुवातीला कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा घेतला. नंतर तालुका मेळावे घेतले. त्यानंतर गावोगावी प्रचारासाठी पोहोचलो. घरोघर आम्ही संदेश पोहोचविला.जिल्ह्यातील काय मुद्दे प्रचारात होते?प्रलंबित जलसिंचन योजनांबाबत आम्ही बोललो. तुकाई, साकळाई या योजनांना प्राधान्य देण्याचे आम्ही सांगितले आहे. शिर्डीत आम्ही निळवंडे कालव्यांचा प्रश्न मांडत आहोत.शिवसेनेची साथ कशी आहे?आमची युती ही मनापासून आहे. नगरला सेना व शिर्डीत आम्ही त्यांच्या प्रचारात पूर्णत: सक्रीय आहोत. नगरला आमदार अनिल राठोड, विजय औटी यांनी खूप मेहनत घेतली आहे. शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली आहे.तुम्ही उमेदवार आयात केल्याचा आरोप झाला.तसे काही नाही. राजकारणात अशी बेरीज करावी लागते. तो पक्षीय निर्णय आहे. सर्व कार्यकर्ते ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे आहेत.दिलीप गांधींसह सर्वजण सक्रीयविद्यमान खासदार दिलीप गांधी नाराज नाहीत. ते प्रचारात सक्रीय आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी उत्तम काम केले. भाजपमध्ये प्रत्येक जण राष्टÑहित व पक्षाला महत्त्व देतो. सर्व भाजप एकसंध आहे. भाजप, सेना व विखेंची यंत्रणा अशी सर्व ताकद एकत्र झाली आहे. विखे यांना मोठा राजकीय वारसा असल्याने भाजपची ताकद वाढली. मी अध्यक्ष झाल्यापासून सर्व निवडणुका जिंकत आलो आहे. पालकमंत्री, आमचे सर्व आमदार यांनी मोठी विकासकामे केली आहेत. भूजलपातळीबाबत तर जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला. त्यामुळे विजय आमचाच आहे याची खात्री आहे.मोदी लाट तर आहेच. सुजय विखे यांचे शिक्षण व त्यांची प्रतिमा हीही आमची बलस्थाने आहेत. त्यामुळे नगरला पुन्हा भाजपचाच खासदार होणार. भाजपचा कार्यकर्ता हा बुथपर्यंत सक्रीय असतो. निवडणुकीपूर्वीच आपण जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व तयारी केली होती. सुजय विखे यांनीही प्रचारात खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे नगरच्या यशाबाबत आम्हाला चिंता नाही. मोठ्या फरकाने आम्ही जिंकू. - भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019