शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

संडे स्पेशल मुलाखत : राष्ट्रवादी काँग्रेस नगरला इतिहास घडविणार : राजेंद्र फाळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:24 IST

लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात लाट आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे राष्टÑवादी नगरला इतिहास घडवेल.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात लाट आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे राष्टÑवादी नगरला इतिहास घडवेल. नगरचा निकाल हा धक्कादायक असेल, असे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.

तुम्ही कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे गेलात?मोदी सरकारने दिलेली आश्वासने व नंतर केलेली फसवणूक यावरच आम्ही प्रचारात भर दिला आहे. शेतकरी, कामगार, नोकरदार, युवक, महिला, दलित, मुुस्लिम हे सर्व घटक अडचणीत आहेत. लोक महागाईने त्रस्त आहेत. हेच आम्ही प्रचारात जनतेसमोर मांडले.

तुमची प्रचाराची पद्धत काय होती?आम्ही काही गावांत मोठ्या सभा घेतल्या. त्यानंतर गावोगावी व घरोघर जाऊन प्रचार केला. आमच्या उमेदवाराकडे प्रचारासाठी कमी वेळ होता. असे असताना दिवसरात्र एक करुन संग्राम जगताप हे ग्रामीण भागात खेडोपाडी पोहोचले. त्यांचा संपर्क चांगला आहे.

कॉंग्रेस प्रचारात सक्रीय होती का?राधाकृष्ण विखे यांच्या विरोधातील सर्व कॉंग्रेस आमच्यासोबत एकदिलाने होती. आमच्यापेक्षाही त्यांनी ताकद लावून प्रचार केला.राधाकृष्ण विखे प्रचारात नव्हते. आम्ही त्याबाबत कॉंग्रेसकडे तक्रार केली आहे. अशोक चव्हाण यांनी त्यांना विचारणा करायला हवी. विखेंनी आघाडीचा धर्म तोडला. त्यांनी भाजपला साथ दिली. तसे करायचे होते तर त्यांनी विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. पण तसेही केले नाही. त्यांच्यासोबत आता आम्ही जिल्हा परिषदेच्या सत्तेत राहणार नाहीत. विखेंनी जरी नगरला आघाडी धर्म पाळला नसला तरी शिर्डीत आम्ही कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार आहोत.

निवडणुकीचे काय चित्र राहील?निकाल पहा. राष्टÑवादीच विजयी होईल. प्रचारात एक सुप्त लाट आम्हाला दिसली आहे.सर्वच तालुक्यात आम्ही भक्कमनगर मतदारसंघात राष्टÑवादीची ताकद आहे. महापालिका निवडणुकीत आम्ही जाहीर प्रचार न करताही १८ नगरसेवक निवडून आले. भाजपने जिल्हा परिषद व नगर महापालिका या दोन्ही निवडणुकांत ‘फोर्टी प्लस’चा नारा दिला होता. त्याचे काय झाले हे जिल्ह्याने पाहिले आहे. १४ च्या वर जागा त्यांना महापालिकेत मिळू शकल्या नाहीत. याहीवेळी तो चमत्कार घडेल. नगर व श्रीगोंद्यात आमचा आमदार आहे. पारनेर, कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डीतही आमची चांगली बांधणी आहे. शेतकरी, व्यापारी, युवक, महिला हे सर्व घटक आमच्या सोबत आहेत.राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांच्या रुपाने तरुण चेहरा दिला आहे. त्यांच्यात नम्रता आहे. तरुणांचे जाळे त्यांच्या पाठिशी आहे. ते चमत्कार घडवतील. . नगरला भाजपच्या उमेदवारांनी स्वत: मोदी व भाजप किती वाईट आहे हे सांगितलेले आहे. आमचा बहुतांश प्रचार त्यांनीच केलेला होता. निवडणुकीत मोदींच्या विरोधात लाट आहे. स्वत: भाजपचे कार्यकर्ते देखील खासगीत ही बाब मान्य करतात. -राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019