शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

संडे स्पेशल मुलाखत : राष्ट्रवादी काँग्रेस नगरला इतिहास घडविणार : राजेंद्र फाळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:24 IST

लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात लाट आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे राष्टÑवादी नगरला इतिहास घडवेल.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात लाट आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे राष्टÑवादी नगरला इतिहास घडवेल. नगरचा निकाल हा धक्कादायक असेल, असे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.

तुम्ही कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे गेलात?मोदी सरकारने दिलेली आश्वासने व नंतर केलेली फसवणूक यावरच आम्ही प्रचारात भर दिला आहे. शेतकरी, कामगार, नोकरदार, युवक, महिला, दलित, मुुस्लिम हे सर्व घटक अडचणीत आहेत. लोक महागाईने त्रस्त आहेत. हेच आम्ही प्रचारात जनतेसमोर मांडले.

तुमची प्रचाराची पद्धत काय होती?आम्ही काही गावांत मोठ्या सभा घेतल्या. त्यानंतर गावोगावी व घरोघर जाऊन प्रचार केला. आमच्या उमेदवाराकडे प्रचारासाठी कमी वेळ होता. असे असताना दिवसरात्र एक करुन संग्राम जगताप हे ग्रामीण भागात खेडोपाडी पोहोचले. त्यांचा संपर्क चांगला आहे.

कॉंग्रेस प्रचारात सक्रीय होती का?राधाकृष्ण विखे यांच्या विरोधातील सर्व कॉंग्रेस आमच्यासोबत एकदिलाने होती. आमच्यापेक्षाही त्यांनी ताकद लावून प्रचार केला.राधाकृष्ण विखे प्रचारात नव्हते. आम्ही त्याबाबत कॉंग्रेसकडे तक्रार केली आहे. अशोक चव्हाण यांनी त्यांना विचारणा करायला हवी. विखेंनी आघाडीचा धर्म तोडला. त्यांनी भाजपला साथ दिली. तसे करायचे होते तर त्यांनी विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. पण तसेही केले नाही. त्यांच्यासोबत आता आम्ही जिल्हा परिषदेच्या सत्तेत राहणार नाहीत. विखेंनी जरी नगरला आघाडी धर्म पाळला नसला तरी शिर्डीत आम्ही कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार आहोत.

निवडणुकीचे काय चित्र राहील?निकाल पहा. राष्टÑवादीच विजयी होईल. प्रचारात एक सुप्त लाट आम्हाला दिसली आहे.सर्वच तालुक्यात आम्ही भक्कमनगर मतदारसंघात राष्टÑवादीची ताकद आहे. महापालिका निवडणुकीत आम्ही जाहीर प्रचार न करताही १८ नगरसेवक निवडून आले. भाजपने जिल्हा परिषद व नगर महापालिका या दोन्ही निवडणुकांत ‘फोर्टी प्लस’चा नारा दिला होता. त्याचे काय झाले हे जिल्ह्याने पाहिले आहे. १४ च्या वर जागा त्यांना महापालिकेत मिळू शकल्या नाहीत. याहीवेळी तो चमत्कार घडेल. नगर व श्रीगोंद्यात आमचा आमदार आहे. पारनेर, कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डीतही आमची चांगली बांधणी आहे. शेतकरी, व्यापारी, युवक, महिला हे सर्व घटक आमच्या सोबत आहेत.राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांच्या रुपाने तरुण चेहरा दिला आहे. त्यांच्यात नम्रता आहे. तरुणांचे जाळे त्यांच्या पाठिशी आहे. ते चमत्कार घडवतील. . नगरला भाजपच्या उमेदवारांनी स्वत: मोदी व भाजप किती वाईट आहे हे सांगितलेले आहे. आमचा बहुतांश प्रचार त्यांनीच केलेला होता. निवडणुकीत मोदींच्या विरोधात लाट आहे. स्वत: भाजपचे कार्यकर्ते देखील खासगीत ही बाब मान्य करतात. -राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019