शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

संडे स्पेशल : देशप्रेमाच्या जागृतीसाठी दोन जवानांची सायकल वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 11:40 IST

पर्यावरण रक्षणासाठी विविध संदेश देत भारतीय नौदलात कार्यरत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील दोन जवानांनी बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करीत महाराष्ट्रासह गोवा राज्यात भ्रमंती केली आहे.

सचिन नन्नवरे

मिरी : पर्यावरण रक्षणासाठी विविध संदेश देत भारतीय नौदलात कार्यरत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील दोन जवानांनी बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करीत महाराष्ट्रासह गोवा राज्यात भ्रमंती केली आहे.नौसेनेच्या आयएनएस विराट या युद्धनौकेवर अभियंता असणारे मिरी (ता. पाथर्डी) येथील जवान सतीश धरम व हिवरेबाजार (ता. नगर) येथील शिवाजी ठाणगे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील अजय मोरे व शरद बोरस्ते तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतीक शहा व सिद्धार्थ कांबळे या सहा जवानांनी अवघ्या बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार करीत पर्यावरण संवर्धनाचे विविध संदेश देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली.या जवानांनी खास सायकलवरून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी सुटी काढून मुंबई येथील गेट वे आॅफ इंडिया येथून या भ्रमंतीला सुरूवात केली. मुंबईपासून अलिबाग, मुरूड, जंजिरा, आगरदांडा,वेळात या मार्गे गोव्यातून कोल्हापूर मार्गे सातारा, पुणे व लोणावळ्यावरून पुन्हा मुंबई येथील गेट वे आॅफ इंडिया येथे या सायकलवारीची सांगता झाली. या दरम्यान त्यांनी इंधन बचतीचा मुख्य संदेशासह, प्रदूषणमुक्त भारत, झाडे लावा-झाडे जगवा यासह विविध संदेश दिले. या भ्रमंतीमध्ये विविध गावातील नागरिकांनी केलेल्या स्वागतामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली. हा सायकल प्रवास आपण पुढेही सुरू ठेवणार असल्याचे या जवानांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रवासासाठी आम्ही समाजसेवी संस्थेकडे विचारणा केली होती. परंतु त्यांनी कोणतीही आर्थिक मदत न देता अनेक जाचक अटी घातल्या. त्यामुळे या प्रवासासाठी आलेला सुमारे एक लाख रूपयांचा खर्च सर्वांनी स्वखर्चाने केल्याचे त्यांनी सांगितले.प्रवासादरम्यान वाचविले अपघातग्रस्तांचे प्राणप्रवासादरम्यान कोकणातील काशिद घाटात एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला होता. तेव्हा वैद्यकीय माहिती असलेले हिवरेबाजार येथील जवान शिवाजी ठाणगे यांनी वेळीच प्रथमोपचार करून अपघातग्रस्तांना रूग्णालयात दाखल केल्याने जखमींचे प्राण वाचल्याचे समाधान वाटत असल्याचे जवानांनी अभिमानाने सांगितले.जुलै २०१९ मध्ये सेवानिवृत्त होत आहे. निवृत्तीनंतर पर्यटनाच्या हंगामानुसार महाराष्ट्रभर सायकलवर प्रवास करून सायकल चालवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देणार आहे. सायकल चालविल्याने आरोग्य निरोगी राहत असल्याने दररोज सायकल चालविणे गरजेचे आहे. - सतीश धरम, भारतीय नौदलातील अभियंता.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर