शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

संडे स्पेशल : देशप्रेमाच्या जागृतीसाठी दोन जवानांची सायकल वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 11:40 IST

पर्यावरण रक्षणासाठी विविध संदेश देत भारतीय नौदलात कार्यरत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील दोन जवानांनी बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करीत महाराष्ट्रासह गोवा राज्यात भ्रमंती केली आहे.

सचिन नन्नवरे

मिरी : पर्यावरण रक्षणासाठी विविध संदेश देत भारतीय नौदलात कार्यरत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील दोन जवानांनी बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करीत महाराष्ट्रासह गोवा राज्यात भ्रमंती केली आहे.नौसेनेच्या आयएनएस विराट या युद्धनौकेवर अभियंता असणारे मिरी (ता. पाथर्डी) येथील जवान सतीश धरम व हिवरेबाजार (ता. नगर) येथील शिवाजी ठाणगे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील अजय मोरे व शरद बोरस्ते तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतीक शहा व सिद्धार्थ कांबळे या सहा जवानांनी अवघ्या बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार करीत पर्यावरण संवर्धनाचे विविध संदेश देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली.या जवानांनी खास सायकलवरून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी सुटी काढून मुंबई येथील गेट वे आॅफ इंडिया येथून या भ्रमंतीला सुरूवात केली. मुंबईपासून अलिबाग, मुरूड, जंजिरा, आगरदांडा,वेळात या मार्गे गोव्यातून कोल्हापूर मार्गे सातारा, पुणे व लोणावळ्यावरून पुन्हा मुंबई येथील गेट वे आॅफ इंडिया येथे या सायकलवारीची सांगता झाली. या दरम्यान त्यांनी इंधन बचतीचा मुख्य संदेशासह, प्रदूषणमुक्त भारत, झाडे लावा-झाडे जगवा यासह विविध संदेश दिले. या भ्रमंतीमध्ये विविध गावातील नागरिकांनी केलेल्या स्वागतामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली. हा सायकल प्रवास आपण पुढेही सुरू ठेवणार असल्याचे या जवानांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रवासासाठी आम्ही समाजसेवी संस्थेकडे विचारणा केली होती. परंतु त्यांनी कोणतीही आर्थिक मदत न देता अनेक जाचक अटी घातल्या. त्यामुळे या प्रवासासाठी आलेला सुमारे एक लाख रूपयांचा खर्च सर्वांनी स्वखर्चाने केल्याचे त्यांनी सांगितले.प्रवासादरम्यान वाचविले अपघातग्रस्तांचे प्राणप्रवासादरम्यान कोकणातील काशिद घाटात एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला होता. तेव्हा वैद्यकीय माहिती असलेले हिवरेबाजार येथील जवान शिवाजी ठाणगे यांनी वेळीच प्रथमोपचार करून अपघातग्रस्तांना रूग्णालयात दाखल केल्याने जखमींचे प्राण वाचल्याचे समाधान वाटत असल्याचे जवानांनी अभिमानाने सांगितले.जुलै २०१९ मध्ये सेवानिवृत्त होत आहे. निवृत्तीनंतर पर्यटनाच्या हंगामानुसार महाराष्ट्रभर सायकलवर प्रवास करून सायकल चालवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देणार आहे. सायकल चालविल्याने आरोग्य निरोगी राहत असल्याने दररोज सायकल चालविणे गरजेचे आहे. - सतीश धरम, भारतीय नौदलातील अभियंता.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर