शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

संडे Motivation : रेवडी उद्योगाचा सुवर्णमहोत्सव : प्रसिद्ध मढीच्या यात्रेने गाठली पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 15:20 IST

श्रीक्षेत्र मढी (ता.पाथर्डी) येथील राज्यभर ख्याती असलेला महायात्रोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. या यात्रेत खास मान असलेली रेवडी बनविण्याच्या उद्योगाने मढी-तिसगाव रस्त्यालगतच्या उत्पादन केंद्रांवरील रेवडी बनविण्यास वेग आला आहे.

चंद्रकांत गायकवाडतिसगाव : श्रीक्षेत्र मढी (ता.पाथर्डी) येथील राज्यभर ख्याती असलेला महायात्रोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. या यात्रेत खास मान असलेली रेवडी बनविण्याच्या उद्योगाने मढी-तिसगाव रस्त्यालगतच्या उत्पादन केंद्रांवरील रेवडी बनविण्यास वेग आला आहे. यंदाचा पन्नासावा यात्रोत्सव असल्याने यात्रेसोबतच रेवडी उद्योगानेही सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.रेवडी व्यावसायिकांची यंदाची ही पन्नासावी मढी यात्रा आहे.आयुर्वेदात महत्त्वाचे मानल्या गेलेला बहुगुणी गूळ व तीळ (हावरी),फुटाण्याचे पीठ यापासून रेवडी बनविण्याची परंपरा आजही टिकून आहे. आकर्षक बांगडीच्या आकाराची गोल, भाकरीच्या आकाराची रेवडी आता पेढेवजा आकारात नव्या बदलात रूपांतरीत झाली आहे.कानिफनाथ देवस्थानचे सचिव सुधीर मरकड म्हणाले,नवसपूर्ती व देवालय परिसरातील आनंदोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने कानिफनाथ समाधी मंदिरावर रेवडी उधळण्याची परंपरा आहे. यात्रा उन्हाळ्यात असल्याने आरोग्याच्या दृष्टीने ही रेवडी थंडावा देऊन पचनासाठी पूरक ठरते. त्यामुळे आरोग्य व धार्मिकता अशा दोन्ही भावनेतून रेवडीची उच्चांकी खरेदी येथे होते.सरपंच भगवान मरकड म्हणाले, मढी-तिसगाव रस्त्यालगतच्या रेवडी उत्पादकांमुळे आमच्या गावची सर्वदूर ओळख पसरली आहे.दरवर्षी ४० टन रेवडीची निर्मितीगणीभाई शेख सध्या थकले असले तरी त्यांच्या अर्धांगिनी साहीबजान व मुलगा बाबूलाल रेवडीच्या उत्पादनात अग्रस्थानी आहेत. त्यांच्या मिलन रेवडी सेंटरमधील रेवडीला सर्वदूर मागणी व ओळख निर्माण झाल्याने या रेवडीचा मढी यात्रोत्सवात सर्वाधिक बोलबाला असतो. तिसगाव शहरातील अहमद शेख, गणीभाई शेख, नसीर शेख व शरद भुजबळ अशा चार व्यावसायिकांच्या उत्पादन केंद्रांवर दरवर्षी किमान ३८ ते ४० टन रेवडीची निर्मिती होते.कशी बनते रेवडीरेवडीची पाककृती सांगताना बाबूलाल शेख म्हणाले, तयार फुटाणे विकत घेऊन त्याचे पीठ करायचे. वितळविलेल्या गुळाच्या पाकात त्याचे मिश्रण करून ते हाताने कडक होईपर्यंत ओढायचे. नंतर त्याच्या विविध आकाराच्या रेवड्या करून त्यास तीळ (हावरी)लावायची, अशी रेवडी बनविण्याची पद्धती आहे. सध्या मात्र गूळ फोडणे, रेवडी मिश्रण ओढणे यासाठी मशिनरी घेतली आहे. जळण म्हणून आजही आम्ही लाकूडच वापरत आहोत. त्यामुळे रेवडीची चव अजूनही टिकून आहे. केवळ मढी यात्रा नजरेसमोर ठेऊनच तीन ते चार महिन्यांच्या कालखंडात रेवडीचे उत्पादन केले जाते. वर्षभर इतर मिठाई विकण्याचे काम केले जाते.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर