शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
3
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
4
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
5
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
6
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
8
'या' आयपीओचं बंपर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी ९ टक्क्यांचा नफा, गुंतवणूकदार मालामाल
9
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
10
Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
11
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
12
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
13
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
14
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?
15
गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय; आता कोट्यवधींची मालकीण
16
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
17
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
18
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
19
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
20
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  

संडे Motivation - ..अन् मांजरी गाव बनले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 11:24 IST

तालुक्यातील पूर्व भागाला मुळा नदी जीवनदायीनी ठरली आहे़ मांजरी येथे ग्रामस्थांनी एकजुटीतून वाळू उपसा रोखला आहे. स्थानिक ग्रामस्थांना बांधकामासाठी वाळूची गरज निर्माण झाल्यानंतर बैलगाडीतून वाळू वाहून नेली जाते़

भाऊसाहेब येवले राहुरी : तालुक्यातील पूर्व भागाला मुळा नदी जीवनदायीनी ठरली आहे़ मांजरी येथे ग्रामस्थांनी एकजुटीतून वाळू उपसा रोखला आहे. स्थानिक ग्रामस्थांना बांधकामासाठी वाळूची गरज निर्माण झाल्यानंतर बैलगाडीतून वाळू वाहून नेली जाते़ त्यामुळे हे गाव पाणीदार बनले आहे.मुळा नदीच्या पूर्व भागात अथांग वाळू साठा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्क ा बसतो़ मांजरीसह परिसरातील गावकरीही अभिमानाने वाळू उपसू दिली जात नसल्याचे छातीवर हात ठेऊन सांगतात़ येथील शेतकऱ्यांनी थेट औरंगाबाद खंडपीठात जाऊन वाळूला विरोध केला़ दरवर्षी शासकीय परिपत्रक ग्रामपंचायतीकडे येते़ गावकरी एकमताने वाळू उचलायची नाही, असे म्हणणे मांडतात़ सर्वानुमते ठराव पारीत होतो़ त्यामुळे पूर्व भागात वाळूचा लिलाव होत नाही. त्यामुळे एक पिढीपासून वाळू नदीपात्रात मोत्यासारखी दिसत आहे़ वाळू जपली तर आपण जिवंत राहू याची खात्री गावक -यांना पटली आहे़त्यामुळे गावातील वाळू गावातच राहिली पाहिजे अशी ग्रामस्थांची धारणा झाली आहे़ गावाच्या परिसरात बांधकामासाठी वाळू लागल्यास नियम ठरवून देण्यात आला आहे़ चारचाकी वाहनातून वाळू वाहतूक नाही़ केवळ बैलगाडीने वाळू वाहण्याची परवानगी आहे़ त्यामुळे मर्यादीत स्वरूपात वाळूचा उपसा सुरू आहे. मुळा नदी पात्रातील वाळू न उचलल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे़ परिसरात वाळू उचलण्याचे गुंडांनी केलेले प्रयत्न हाणून पडले आहे़ लष्करालादेखील येथील ग्रामस्थांनी वाळू उचलू दिली नव्हती, त्यामुळे वाळू उचलेगिरी करणा-यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे़ गावक-यांचा वाळू उपसा करण्यास इतका विरोध आहे की कुणी चारचाकी घेऊन नदीपात्रात आले की सर्व गावकरी जमा होतात़गावक-यांची एकी पाहून कुणीही वाळू उचलीत नाही़ आपले वाहन जाळण्याची भीती असल्याने अलिकडील काळात कुणीही वाळू उचलण्याचा साहस करीत नसल्याचे चित्र आहे़वाळू उचलण्याच्या लिलावाला गावकरी ग्रामसभेत विरोध करतात़ वाळू संदर्भात ग्रामस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे़ गाव वाचवयाचे असेल तर वाळ उचलू द्यायची नाही हे ग्रामस्थांचे धोरण आहे़ दररोज दहा ते बारा बैलगाड्या वाळू उचलली जाते़ त्याचा काहीही परिणाम होत नाही़ -विठ्ठल विटनोर, सरपंच, मांजरीवाळू सुरक्षित असल्यानेच विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी टिकून आहे़ पिकांना दिलासा मिळाला आहे़ जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़ वाळू घरगुती कामापुरती वापरली जाते़ त्यामुळे गावाचा फायदा होत आहे. - कृशाराम जाधव, शेतकरी

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी