शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

संडे Motivation - ..अन् मांजरी गाव बनले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 11:24 IST

तालुक्यातील पूर्व भागाला मुळा नदी जीवनदायीनी ठरली आहे़ मांजरी येथे ग्रामस्थांनी एकजुटीतून वाळू उपसा रोखला आहे. स्थानिक ग्रामस्थांना बांधकामासाठी वाळूची गरज निर्माण झाल्यानंतर बैलगाडीतून वाळू वाहून नेली जाते़

भाऊसाहेब येवले राहुरी : तालुक्यातील पूर्व भागाला मुळा नदी जीवनदायीनी ठरली आहे़ मांजरी येथे ग्रामस्थांनी एकजुटीतून वाळू उपसा रोखला आहे. स्थानिक ग्रामस्थांना बांधकामासाठी वाळूची गरज निर्माण झाल्यानंतर बैलगाडीतून वाळू वाहून नेली जाते़ त्यामुळे हे गाव पाणीदार बनले आहे.मुळा नदीच्या पूर्व भागात अथांग वाळू साठा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्क ा बसतो़ मांजरीसह परिसरातील गावकरीही अभिमानाने वाळू उपसू दिली जात नसल्याचे छातीवर हात ठेऊन सांगतात़ येथील शेतकऱ्यांनी थेट औरंगाबाद खंडपीठात जाऊन वाळूला विरोध केला़ दरवर्षी शासकीय परिपत्रक ग्रामपंचायतीकडे येते़ गावकरी एकमताने वाळू उचलायची नाही, असे म्हणणे मांडतात़ सर्वानुमते ठराव पारीत होतो़ त्यामुळे पूर्व भागात वाळूचा लिलाव होत नाही. त्यामुळे एक पिढीपासून वाळू नदीपात्रात मोत्यासारखी दिसत आहे़ वाळू जपली तर आपण जिवंत राहू याची खात्री गावक -यांना पटली आहे़त्यामुळे गावातील वाळू गावातच राहिली पाहिजे अशी ग्रामस्थांची धारणा झाली आहे़ गावाच्या परिसरात बांधकामासाठी वाळू लागल्यास नियम ठरवून देण्यात आला आहे़ चारचाकी वाहनातून वाळू वाहतूक नाही़ केवळ बैलगाडीने वाळू वाहण्याची परवानगी आहे़ त्यामुळे मर्यादीत स्वरूपात वाळूचा उपसा सुरू आहे. मुळा नदी पात्रातील वाळू न उचलल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे़ परिसरात वाळू उचलण्याचे गुंडांनी केलेले प्रयत्न हाणून पडले आहे़ लष्करालादेखील येथील ग्रामस्थांनी वाळू उचलू दिली नव्हती, त्यामुळे वाळू उचलेगिरी करणा-यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे़ गावक-यांचा वाळू उपसा करण्यास इतका विरोध आहे की कुणी चारचाकी घेऊन नदीपात्रात आले की सर्व गावकरी जमा होतात़गावक-यांची एकी पाहून कुणीही वाळू उचलीत नाही़ आपले वाहन जाळण्याची भीती असल्याने अलिकडील काळात कुणीही वाळू उचलण्याचा साहस करीत नसल्याचे चित्र आहे़वाळू उचलण्याच्या लिलावाला गावकरी ग्रामसभेत विरोध करतात़ वाळू संदर्भात ग्रामस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे़ गाव वाचवयाचे असेल तर वाळ उचलू द्यायची नाही हे ग्रामस्थांचे धोरण आहे़ दररोज दहा ते बारा बैलगाड्या वाळू उचलली जाते़ त्याचा काहीही परिणाम होत नाही़ -विठ्ठल विटनोर, सरपंच, मांजरीवाळू सुरक्षित असल्यानेच विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी टिकून आहे़ पिकांना दिलासा मिळाला आहे़ जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़ वाळू घरगुती कामापुरती वापरली जाते़ त्यामुळे गावाचा फायदा होत आहे. - कृशाराम जाधव, शेतकरी

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी