शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांना सुटेना मुख्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 17:24 IST

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊनही अनेक कर्मचारी मुख्यालय सोडायला तयार नाहीत़ बदल्या होऊनही विभाग प्रमुखांच्या आशीर्वादाने पूर्वीच्याच विभागात अनेक कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत़

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊनही अनेक कर्मचारी मुख्यालय सोडायला तयार नाहीत़ बदल्या होऊनही विभाग प्रमुखांच्या आशीर्वादाने पूर्वीच्याच विभागात अनेक कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत़ मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नरमाईची भूमिका का घेतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे़जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी ठराविक कर्मचाºयांच्या बदल्यांबाबत कठोर भूमिका घेतली तर काही कर्मचाºयांच्या बाबतीत मवाळ धोरण स्वीकारले़ बदल्या होऊनही अनेक कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत़ काही कर्मचारी अजूनही पूर्वीच्याच विभागात काम करत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्याही निदर्शनास आले आहे़ त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी विभाग प्रमुखांना पत्र पाठवून बदली झालेल्या कर्मचाºयांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करावे, अशा सूचना दिल्या़ तसेच बदल्या झालेले किती कर्मचारी हजर झाले, याबाबतचा अहवालही मागितला आहे़ एक कर्मचारी न्यायालयात गेल्यामुळे तो कर्मचारी वगळता इतरांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होणे आवश्यक होते़ मात्र, विभाग प्रमुखांच्या आशीर्वादामुळे बदली होऊनही अनेक कर्मचारी पूर्वीच्या जागेवर ठाण मांडून आहेत़ याबाबत सीईओ माने यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही़‘सेवा उपलब्ध’ता रद्द करण्याचा प्रस्तावएकदा बदली झाल्यानंतर कर्मचाºयांना प्रतिनियुक्ती देणे विभागीय आयुक्तांच्या हाती असल्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेत ‘सेवा उपलब्ध’तेचा पायंडा पाडला आहे़ त्याचा लाभ घेत अनेक कर्मचाºयांना सोयीची ठिकाणे देण्यात आली़ ही बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर आता या कर्मचाºयांच्या ‘सेवा उपलब्ध’ता रद्द करण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे समजते़ मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी या प्रस्तावावर अद्याप सही केलेली नाही़ त्यामुळे हा प्रस्तावही सध्या थंड बस्त्यात पडला आहे़बदलीच्या ठिकाणी किती कर्मचारी रुजू झाले, याचा अहवाल विभागप्रमुखांकडे मागितला आहे़ तसेच बदली झालेल्या कर्मचाºयांना तत्काळ कार्यमुक्त करावे, अशा सूचनाही विभाग प्रमुखांना दिल्या आहेत़ सेवा उपलब्धता रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे़-वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा़प्ऱवि़)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद