शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड काळात वाढल्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST

श्रीरामपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तरुणांचा रोजगार नष्ट झाला. त्यामुळे येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच ...

श्रीरामपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तरुणांचा रोजगार नष्ट झाला. त्यामुळे येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच महिन्यात तीन तरुणांच्या आत्महत्येचे प्रकार समोर आले.

श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या हद्दीमध्ये तीन तरुणांनी आत्महत्या केल्या. यात गोंधव‌णी येथील परिसरातील राजेंद्र रावसाहेब शेळके (वय ३९) या तरुणाचा समावेश होता. बांधकाम क्षेत्रात मजुरीचे तो काम करत होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये हा व्यवसाय विस्कळीत झाल्याने रोजगार मंदावला. त्यातून शेळके याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. दुसरी घटना बेलापूर येथे घडली. प्रवरा नदीपात्रात शंकर उत्तम गलांडे (वय ३१) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. पढेगाव येथील शंकर हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. आत्महत्येपूर्वी नदीच्या पुलावर त्याने मोटारसायकल लावलेली होती. मोटारसायकलवर असलेल्या पिशवीत त्याचे ओळखपत्र व कुटुंबीयांचे मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी मिळून आली. त्यावरून शंकर याची ओळख पटली.

तिसऱ्या घटनेत पढेगाव रेल्वे स्थानकाजवळ नेवासे येथील भारत मोहन बर्डे (वय ४०) यांचा मृतदेह सापडला. तो मजुरीचे काम करत होता. त्यानेही लॉकडाऊनमुळे आत्महत्या केली.

कोविड संकटामुळे तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम घडून आला. स्वातंत्र्य उपभोगण्याचा मूलभूत अधिकार लॉकडाऊनमुळे संपुष्टात आला. प्रवास तसेच मनोरंजनाच्या सवयींना मुरड घालावी लागली. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीशी जुळवून घेण्यात तरुणांना अपयश आले. परिणामी त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.

आर्थिक अरिष्ट ओढवल्याने कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण झाले. त्यातूनही आत्महत्या घडल्या.

----------

हे दिवस जातील...

कोविडच्या संकटाने जगभर हाहाकार उडविला. दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले. मात्र, आता परिस्थितीत काहीसा सुधार झाला आहे. व्यापार चक्र पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे हे वाईट दिवस जातील, अशी सकारात्मक भावना रूजवावी लागणार आहे.

-----------

मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात...

निराशेमध्ये गेलेल्या तरुणांसाठी समुपदेशन ही काळाची गरज आहे. कोविडमुळे अचानकपणे झालेला जीवनातील बदल मानवणारा नाही. मात्र, व्यक्तीच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर केल्यास त्यातून मार्ग काढता येईल.

- डॉ. संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभाप्रमुख, बोरावके महाविद्यालय.

---------