शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

कोविड काळात वाढल्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST

श्रीरामपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तरुणांचा रोजगार नष्ट झाला. त्यामुळे येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच ...

श्रीरामपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तरुणांचा रोजगार नष्ट झाला. त्यामुळे येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच महिन्यात तीन तरुणांच्या आत्महत्येचे प्रकार समोर आले.

श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या हद्दीमध्ये तीन तरुणांनी आत्महत्या केल्या. यात गोंधव‌णी येथील परिसरातील राजेंद्र रावसाहेब शेळके (वय ३९) या तरुणाचा समावेश होता. बांधकाम क्षेत्रात मजुरीचे तो काम करत होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये हा व्यवसाय विस्कळीत झाल्याने रोजगार मंदावला. त्यातून शेळके याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. दुसरी घटना बेलापूर येथे घडली. प्रवरा नदीपात्रात शंकर उत्तम गलांडे (वय ३१) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. पढेगाव येथील शंकर हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. आत्महत्येपूर्वी नदीच्या पुलावर त्याने मोटारसायकल लावलेली होती. मोटारसायकलवर असलेल्या पिशवीत त्याचे ओळखपत्र व कुटुंबीयांचे मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी मिळून आली. त्यावरून शंकर याची ओळख पटली.

तिसऱ्या घटनेत पढेगाव रेल्वे स्थानकाजवळ नेवासे येथील भारत मोहन बर्डे (वय ४०) यांचा मृतदेह सापडला. तो मजुरीचे काम करत होता. त्यानेही लॉकडाऊनमुळे आत्महत्या केली.

कोविड संकटामुळे तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम घडून आला. स्वातंत्र्य उपभोगण्याचा मूलभूत अधिकार लॉकडाऊनमुळे संपुष्टात आला. प्रवास तसेच मनोरंजनाच्या सवयींना मुरड घालावी लागली. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीशी जुळवून घेण्यात तरुणांना अपयश आले. परिणामी त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.

आर्थिक अरिष्ट ओढवल्याने कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण झाले. त्यातूनही आत्महत्या घडल्या.

----------

हे दिवस जातील...

कोविडच्या संकटाने जगभर हाहाकार उडविला. दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले. मात्र, आता परिस्थितीत काहीसा सुधार झाला आहे. व्यापार चक्र पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे हे वाईट दिवस जातील, अशी सकारात्मक भावना रूजवावी लागणार आहे.

-----------

मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात...

निराशेमध्ये गेलेल्या तरुणांसाठी समुपदेशन ही काळाची गरज आहे. कोविडमुळे अचानकपणे झालेला जीवनातील बदल मानवणारा नाही. मात्र, व्यक्तीच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर केल्यास त्यातून मार्ग काढता येईल.

- डॉ. संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभाप्रमुख, बोरावके महाविद्यालय.

---------