शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात यंदा ८ लाख हेक्टरवर ऊस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:31 IST

यंदा महाराष्ट्रात ८ लाख २२ हजार हेक्टरवर ऊस शिल्लक आहे़ या उसाच्या गाळपासाठी राज्यातील १६१ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी आॅनलाईन प्रस्ताव पाठविले आहेत.

भाऊसाहेब येवले ।  राहुरी : यंदा महाराष्ट्रात ८ लाख २२ हजार हेक्टरवर ऊस शिल्लक आहे. या उसाच्या गाळपासाठी राज्यातील १६१ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी आॅनलाईन प्रस्ताव पाठविले आहेत. यंदा फक्त ५१८ लाख मेट्रिक टन उसाची उपलब्धता होण्याची शक्यता असल्याने ऊस टंचाईचे सावट आहे.गेल्यावर्षी ११ लाख ६२ हजार हेक्टरवर  ९४७ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध झाला होता. गेल्या वर्षी राज्यात १९५ साखर कारखाने सुरू होते़ यंदा परवाना घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऊस उपलब्धता कमी झाल्यास किती कारखाने चालू शकतात. याबाबत शंका आहे़ यंदा चांगला पाऊस पडल्याने या महिन्याअखेर ऊस लागवडीला मोठ्या प्रमाणावर सुरूवात होणार आहे. शेतात पाणी असल्याने ऊस लागवडीला विलंब होत आहे. आगामी दोन वर्षे मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न कायम राहणार आहे. आवश्यक त्या प्रमाणावर साखर उत्पादन करून इथेनॉल निर्मितीवर भर दिला. तरच साखर कारखाने अडचणीतून बाहेर पडू शकतील अशी परिस्थिती आहे.अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १६ साखर कारखान्यांनी आॅनलाईन प्रस्ताव परवान्यासाठी  साखर आयुक्त पुणे यांच्याकडे पाठविले आहेत़. जिल्ह्यातील सरासरी ऊस क्षेत्र १ लाख २० हेक्टर आहे. यंदा जिल्ह्यात अंदाजे ७० हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे़.यंदा राज्यात कमी ऊस आहे. त्यामुळे सुरु झालेले कारखानेही अल्प कालावधीसाठी चालतील. आतापर्यंत १६१ कारखान्यांनी गाळपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत, असे साखर संचालक दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAhmednagarअहमदनगर