शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यात यंदा ८ लाख हेक्टरवर ऊस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:31 IST

यंदा महाराष्ट्रात ८ लाख २२ हजार हेक्टरवर ऊस शिल्लक आहे़ या उसाच्या गाळपासाठी राज्यातील १६१ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी आॅनलाईन प्रस्ताव पाठविले आहेत.

भाऊसाहेब येवले ।  राहुरी : यंदा महाराष्ट्रात ८ लाख २२ हजार हेक्टरवर ऊस शिल्लक आहे. या उसाच्या गाळपासाठी राज्यातील १६१ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी आॅनलाईन प्रस्ताव पाठविले आहेत. यंदा फक्त ५१८ लाख मेट्रिक टन उसाची उपलब्धता होण्याची शक्यता असल्याने ऊस टंचाईचे सावट आहे.गेल्यावर्षी ११ लाख ६२ हजार हेक्टरवर  ९४७ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध झाला होता. गेल्या वर्षी राज्यात १९५ साखर कारखाने सुरू होते़ यंदा परवाना घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऊस उपलब्धता कमी झाल्यास किती कारखाने चालू शकतात. याबाबत शंका आहे़ यंदा चांगला पाऊस पडल्याने या महिन्याअखेर ऊस लागवडीला मोठ्या प्रमाणावर सुरूवात होणार आहे. शेतात पाणी असल्याने ऊस लागवडीला विलंब होत आहे. आगामी दोन वर्षे मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न कायम राहणार आहे. आवश्यक त्या प्रमाणावर साखर उत्पादन करून इथेनॉल निर्मितीवर भर दिला. तरच साखर कारखाने अडचणीतून बाहेर पडू शकतील अशी परिस्थिती आहे.अहमदनगर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १६ साखर कारखान्यांनी आॅनलाईन प्रस्ताव परवान्यासाठी  साखर आयुक्त पुणे यांच्याकडे पाठविले आहेत़. जिल्ह्यातील सरासरी ऊस क्षेत्र १ लाख २० हेक्टर आहे. यंदा जिल्ह्यात अंदाजे ७० हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे़.यंदा राज्यात कमी ऊस आहे. त्यामुळे सुरु झालेले कारखानेही अल्प कालावधीसाठी चालतील. आतापर्यंत १६१ कारखान्यांनी गाळपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत, असे साखर संचालक दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAhmednagarअहमदनगर