शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

यंदा उदंड होणार साखर; नगर जिल्ह्यात ऊस उत्पादन दुपटीने वाढले

By मिलिंदकुमार साळवे | Updated: November 10, 2017 18:22 IST

सन २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी अहमदनगर जिल्ह्यात १ लाख ४ हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे. साखर सहसंचालक कार्यालयाने मे महिन्यात ही आकडेवारी नोंदविली होती. त्यानंतर सातत्याने जोरदार पाऊस झाल्यामुळे या आकडेवारीत आणखीच भर पडणार आहे.

अहमदनगर : एकेकाळी साखरेचे आगार असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दसºयाच्या सुमारास साखर कारखानदारीची भट्टी पेटल्यानंतर दिवाळीनंतर १ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगामास सुरूवात झाली आहे. यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट ऊस असल्याने जिल्ह्यात या हंगामात उदंड साखर उत्पादन होणार आहे.जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी २२ कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळपासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. एफ. आर. पी.पोटी अब्जावधीची थकबाकी थकविल्याने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे साईकृपा खासगी कारखाने आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यातील देवदैठण येथील कारखाना सुरू होत असताना हिरडगाव येथील दुसरा कारखाना मात्र एफ. आर.पी. च्या प्रलंबित प्रकरणामुळे गाळप परवाना मिळू शकलेला नाही. सन २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी अहमदनगर जिल्ह्यात १ लाख ४ हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे. साखर सहसंचालक कार्यालयाने मे महिन्यात ही आकडेवारी नोंदविली होती. त्यानंतर सातत्याने जोरदार पाऊस झाल्यामुळे या आकडेवारीत आणखीच भर पडणार आहे. मे महिन्यातील ऊस उपलब्धतेच्या आकडेवारीनुसार अहमदनगर जिल्ह्यात ७८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा प्राथमिक अंदाज होता. हा अंदाज सततच्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मागे पडून आता १ लाख मेट्रिक टनाहून अधिक उसाचे गाळप होईल, असा साखर सहसंचालक कार्यालयाचा नवा अंदाज आहे. दरवर्षी दसºयाच्या आसपास सुरू होणारा गळीत हंगाम यावर्षी उशिराने १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हंगाम उशिरा सुरू केल्यामुळे कारखान्यांना आहे त्याच क्षेत्रात मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध झाला आहे. पावसामुळे ऊस उत्पादन वाढले आहे.गेल्या हंगामात सन २०१६-१७ मध्ये ६५ हजार हेक्टर एवढाच ऊस उपलब्ध होता. त्यापासून ३५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. यावर्षी ऊस दुप्पटीहून अधिक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. तर साखर जवळपास तीन ते चार पटीने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीरामपूरचा अशोक, कोपरगावचा संजीवनी, काळे, श्रीगोंदा, कुकडी, नेवाशाचा ज्ञानेश्वर, मुळा, पाथर्डीचा वृद्धेश्वर, अकोल्याचा अगस्ती, संगमनेरचा थोरात, खासगीमध्ये राहुरीचा प्रसाद, पारनेरचा पियुश, कर्जतचा अंबालिका, क्रांती, शेवगावचा गंगामाई, श्रीगोंद्याचा साईकृपा (देवदैठण) हे कारखाने सुरू झाले आहेत. केदारेश्वर कारखान्याची पहिली मोळी गव्हाणीत पडली आहे.

परवान्यासाठी तनपुरेची लढाई सुरूच

राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला असला, तरी अजून गाळप कारखाना मिळण्यासाठी या कारखान्याच्या संचालक मंडळाची कायदेशीर व राजकीय लढाई सुरू आहे. सहकार आयुक्त व सहकारमंत्र्यांसोबत सुनावणी होऊन या कारखान्याच्या गाळप परवान्याचा निर्णय मार्गी लागणार आहे.

मागील हंगाम सर्वांत नीच्चांकी

गेल्या साखर हंगामात राज्यात ३७३. १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून ४२०.०१ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. २०१२-१३ पासून गेल्या वर्षाचा २०१६-१७ चा हंगाम अहमदनगर विभागाच्या दृष्टीने सर्वांत कमी ऊस व साखर उत्पादन झाल्यामुळे नीच्चांकी ठरला. यावर्षीच्या हंगामात संगमनेरच्या युटेक या नव्या खासगी कारखान्याची भर पडली आहे. जवळपास २२ कारखान्यांतून जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा तिप्पटीहून जास्त साखर तयार होईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने