शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदा उदंड होणार साखर; नगर जिल्ह्यात ऊस उत्पादन दुपटीने वाढले

By मिलिंदकुमार साळवे | Updated: November 10, 2017 18:22 IST

सन २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी अहमदनगर जिल्ह्यात १ लाख ४ हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे. साखर सहसंचालक कार्यालयाने मे महिन्यात ही आकडेवारी नोंदविली होती. त्यानंतर सातत्याने जोरदार पाऊस झाल्यामुळे या आकडेवारीत आणखीच भर पडणार आहे.

अहमदनगर : एकेकाळी साखरेचे आगार असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दसºयाच्या सुमारास साखर कारखानदारीची भट्टी पेटल्यानंतर दिवाळीनंतर १ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगामास सुरूवात झाली आहे. यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट ऊस असल्याने जिल्ह्यात या हंगामात उदंड साखर उत्पादन होणार आहे.जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी २२ कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळपासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. एफ. आर. पी.पोटी अब्जावधीची थकबाकी थकविल्याने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे साईकृपा खासगी कारखाने आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यातील देवदैठण येथील कारखाना सुरू होत असताना हिरडगाव येथील दुसरा कारखाना मात्र एफ. आर.पी. च्या प्रलंबित प्रकरणामुळे गाळप परवाना मिळू शकलेला नाही. सन २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी अहमदनगर जिल्ह्यात १ लाख ४ हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे. साखर सहसंचालक कार्यालयाने मे महिन्यात ही आकडेवारी नोंदविली होती. त्यानंतर सातत्याने जोरदार पाऊस झाल्यामुळे या आकडेवारीत आणखीच भर पडणार आहे. मे महिन्यातील ऊस उपलब्धतेच्या आकडेवारीनुसार अहमदनगर जिल्ह्यात ७८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा प्राथमिक अंदाज होता. हा अंदाज सततच्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मागे पडून आता १ लाख मेट्रिक टनाहून अधिक उसाचे गाळप होईल, असा साखर सहसंचालक कार्यालयाचा नवा अंदाज आहे. दरवर्षी दसºयाच्या आसपास सुरू होणारा गळीत हंगाम यावर्षी उशिराने १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हंगाम उशिरा सुरू केल्यामुळे कारखान्यांना आहे त्याच क्षेत्रात मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध झाला आहे. पावसामुळे ऊस उत्पादन वाढले आहे.गेल्या हंगामात सन २०१६-१७ मध्ये ६५ हजार हेक्टर एवढाच ऊस उपलब्ध होता. त्यापासून ३५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. यावर्षी ऊस दुप्पटीहून अधिक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. तर साखर जवळपास तीन ते चार पटीने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीरामपूरचा अशोक, कोपरगावचा संजीवनी, काळे, श्रीगोंदा, कुकडी, नेवाशाचा ज्ञानेश्वर, मुळा, पाथर्डीचा वृद्धेश्वर, अकोल्याचा अगस्ती, संगमनेरचा थोरात, खासगीमध्ये राहुरीचा प्रसाद, पारनेरचा पियुश, कर्जतचा अंबालिका, क्रांती, शेवगावचा गंगामाई, श्रीगोंद्याचा साईकृपा (देवदैठण) हे कारखाने सुरू झाले आहेत. केदारेश्वर कारखान्याची पहिली मोळी गव्हाणीत पडली आहे.

परवान्यासाठी तनपुरेची लढाई सुरूच

राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला असला, तरी अजून गाळप कारखाना मिळण्यासाठी या कारखान्याच्या संचालक मंडळाची कायदेशीर व राजकीय लढाई सुरू आहे. सहकार आयुक्त व सहकारमंत्र्यांसोबत सुनावणी होऊन या कारखान्याच्या गाळप परवान्याचा निर्णय मार्गी लागणार आहे.

मागील हंगाम सर्वांत नीच्चांकी

गेल्या साखर हंगामात राज्यात ३७३. १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून ४२०.०१ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. २०१२-१३ पासून गेल्या वर्षाचा २०१६-१७ चा हंगाम अहमदनगर विभागाच्या दृष्टीने सर्वांत कमी ऊस व साखर उत्पादन झाल्यामुळे नीच्चांकी ठरला. यावर्षीच्या हंगामात संगमनेरच्या युटेक या नव्या खासगी कारखान्याची भर पडली आहे. जवळपास २२ कारखान्यांतून जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा तिप्पटीहून जास्त साखर तयार होईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने