शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
2
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
3
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
4
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
5
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
6
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
7
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
8
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
9
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
10
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
11
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
12
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
13
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
14
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
15
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
16
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
17
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
18
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
19
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'

अहमदनगर जिल्ह्यात हुमणीने कुरतडला ३६ हजार हेक्टरवरील ऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 11:09 IST

पावसाअभावी आधीच खुंटलेली वाढ, हलकी जमीन आणि पावसाने दिलेली ओढ, यामुळे उसाच्या मुळाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

अण्णा नवथरअहमदनगर : पावसाअभावी आधीच खुंटलेली वाढ, हलकी जमीन आणि पावसाने दिलेली ओढ, यामुळे उसाच्या मुळाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३६ हजार हेक्टरक्षेत्रावरील उसाने मान टाकली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला आहे़ शासन त्यावर काय करते, याकडे ऊस उत्पादक शेतक-यांचे लक्ष लागले आहे.ऊसाचा गळीप हंगाम दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पावसाने ओढ दिल्याने उसाच्या पिकाची अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. त्यामुळे यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ६७ हजार हेक्टरवर ऊसाची लागवड झाली. त्यापैकी ३३ हजार ७४० हेक्टर क्षेत्रावरील ऊस हुमणीने कुरतडल्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना नुकताच सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने तो पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविला आहे. हुमणी अळी प्रशासकीय यंत्रणेला नवीन असेल, पण शेतक-यांसाठी ती नवीन नाही़ यापूर्वीही हुमणी अळीने ऊसाचे फड फस्त केल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडलेल्या आहेत. परंतु, शेतक-यांना सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. सरकारकडूनही त्याची दखल घेतली गेली नाही. शेतक-यांना हा भुर्दंड सोसावा लागतो़ यावर्षी ओरड झाल्याने प्रशसकिय यंत्रणेने मनावर घेतले. पण, सरकार त्याची दखल घेणार का हा खरा प्रश्न आहे.कमी पाऊस पडल्यास हुमणीचा उसावर प्रादुर्भाव होतो. यंदा पावसाचे ६० दिवस कोरडे गेले़ याची कल्पना जिल्ह्यातील सर्व कृषी यंत्रणांना होती. या यंत्रणांनी काय उपाययोजना केल्या ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. हुमणीने मुळ्या कुरतडल्याने जिल्ह्यातील निम्मा ऊस उन्मळून पडला आहे. त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गाळपावर होईल. नुकसानीचे प्रमाण वाढल्यानंतर सर्व कृषी यंत्रणा बांधाकडे धावल्या़ परंतु, ही अळी जमिनीत वाढत असल्याने तिचा बंदोबस्त करणे, म्हणावे तेवढे सोपे नाही. कारण ही अळी जमिनतच जन्माला येते आणि मुळ्या खाऊन मोठी होते. त्यामुळे जमिनीत पाय पसरल्यानंतर तिला रोखणे सर्वांच्याच अवाक्याबाहेरचे आहे.कृषी विभाग, विद्यापीठ, विज्ञान केंद्रांची यंत्रणा गाफीलजिल्ह्यात कृषी विभाग, राहुरी कृषी विद्यापीठ आणि जोडीला दोन विज्ञान केंद्र जिल्ह्यात आहेत. असे असताना जिल्ह्यातील शेतक-यांवर नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ ओढावली असून, वेळ निघून गेल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. परंतु, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने नुकसान टाळणे अशक्य आहे.प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनामे करण्यास नकारजिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, कोरपरगाव, राहुरी, राहाता, श्रीगोंदा तालुक्यांमधील हुमणीने कुरतडलेल्या उसाचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांकडून ग्रामसेवक, तलाठी तहसीलदार यांच्याकडे होत आहे. परंतु, सरकारचा आदेश नसल्याचे कारण पुढे करत पंचनामे करण्यास ते नकार देत आहेत. जिल्ह्यातील शेतक-यांनी ‘लोकमत’ कार्यालयाशी संपर्क साधून ही माहिती दिली.कृषी यंत्रणांचे वराती मागून घोडेहुमणी कीड व्यवस्थापनाच्या कार्यशाळा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सुरू आहेत. कार्यशाळा घेण्याची जणू काही स्पर्धाच तालुका कृषी यंत्रणामध्ये लागली आहे. मात्र त्यातून आता काही साध्य होईल, असे वाटत नाही. कारण हुमणी अळीचे उसाच्या मुळावर खाऊन टाकल्या आहेत. अळी येणार नाही, याची काळजी कृषी विभाग, कारखाने, विद्यपीठ आणि विज्ञान केंद्रांकडून घेणे अपेक्षित होते़. पण, तसे झाले नाही. अळी आल्यानंतर कृषी यंत्रणा कार्यशाळेचे घोडे दामटत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषदahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय